शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

तुडुंब झालेली बनगरवाडी पाण्यासाठी मोताद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:12 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जलसंधारणाचं काम झाल्यानंतर गेल्यावर्षी वळवाच्या एकाच पावसात रानमाळं, विहिरी तुडुंब भरलेल्या ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जलसंधारणाचं काम झाल्यानंतर गेल्यावर्षी वळवाच्या एकाच पावसात रानमाळं, विहिरी तुडुंब भरलेल्या बनगरवाडीतील ग्रामस्थांना आज टँकरने पाणीपुरवठा होतोय. तर दुष्काळामुळं शेतकऱ्यांनी छावणी जवळ केलीय. कोणी वसईला मजुरीसाठी तर मेंढपाळ मराठवाड्यात गेलेत. त्यामुळे अर्ध्या गावाने स्थलांतर केल्याचे दिसत आहे.माण तालुक्यातील इतर दुष्काळी गावाप्रमाणेच बनगरवाडी हे एक गाव. हे गावही उंचावर वसलेलं आहे. गावचा परिसर माळरानात मोडणारा. बनगरवाडीची लोकसंख्या १४५८ तर एकूण क्षेत्र १३५१ हेक्टर. त्यापैकी जवळपास ७५० हेक्टर हे बागायतीत मोडते, तर उर्वरित माळरानच. गाव परिसरात १६० विहिरी, मोठे पाझर तलाव ९, माती नालाबांध २, ओढ्यावर सिमेंट बंधारे २ आहेत. या गावातील २५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थ मेंढपाळ आहेत.सतत पडणाºया दुष्काळामुळे ग्रामस्थांनी गेल्यावर्षी जलसंधारणाचे काम हाती घेतले. वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गाव परिसरात काम करण्यात आलं आणि गावच्या या कामाला यशही आलं. बनगरवाडी गावचा वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात पहिला क्रमांक आला. तर जलसंधारणाच्या कामाच्या दरम्यान गेल्यावर्षी १८ मे रोजी वळवाचा पाऊस झालेला. या पहिल्याच पावसात बनगरवडीतील काही भागातील रानमाळं, शेततळी भरली होती. विहिरी तुडुंब झालेल्या. ओढ्याला पाणी वाहिलेले. त्यानंतर २२ जूनला एकदा पाऊस झाला. त्यामुळे बनगरवाडीला जलसंधारणाचे महत्त्व समजलं. त्यानंतर येथील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या जोरावर पिके घेऊन चांगले पैसेही मिळवले; पण त्यानंतर मान्सून व परतीचा पाऊस न झाल्याने दुष्काळाचं चित्र निर्माण झालं आहे.सद्य:स्थितीत बनगरवाडीतील अर्ध्याहून अधिक ग्रामस्थ हे स्थलांतरित झालेत. मेंढपाळांनी मराठवाडा जवळ केलाय. शेतकºयांनी छावणीतच मुक्काम ठोकला आहे. तर काहींनी मजुरीसाठी वसई जवळ केलीय. येथील लोक अधिक करून मेंढपाळ आणि मजुरीच करतात. सध्याच्या दुष्काळामुळे परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे स्थलांतराचं प्रमाण वाढलंय. आता घरी फक्त लहान मुलं आणि वृद्ध आहेत. त्यांचीही पाणी मिळवण्यासाठी फरफट सुरू झालीय. दिवसदिवसभर वाट बघूनही टँकर येत नाही. पाणी मिळाले तर ते पुरेसे होत नाही, अशी स्थिती. सर्वांनाच पाण्याचाच एक घोर लागलेला. कधी एकदा पाऊस पडतो, असं होऊन गेलंय.बनगरवाडीतील मुलंही वृद्धांच्या आधाराने कसंबसं दिवस ढकलत आहेत. पाऊस पडल्यानंतरच त्यांची आई-वडिलांबरोबर भेट होईल. तोपर्यंतचा एक-एक दिवस ढकलणं जीवावर येऊन गेलंय.एक कोटीवर उत्पन्नगेल्यावर्षी मे आणि जूनमध्ये दोन पाऊस झाले होते. त्यामुळे गाव परिसरात बºयापैकी पाणीसाठा झाला होता. या पाण्याच्या भरवशावरच शेतकºयांनी विविध पिके, भाजीपाला घेतलेला. त्यातून जवळपास एक कोटीहून अधिक रुपये बनगरवाडीतील शेतकºयांच्या हातात पडलेले; पण आता दूरदूर पाहिले जर हिरवं पीक कोठेही नजरेस पडत नाही, अशी स्थिती आहे.