शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तुडुंब झालेली बनगरवाडी पाण्यासाठी मोताद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:12 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जलसंधारणाचं काम झाल्यानंतर गेल्यावर्षी वळवाच्या एकाच पावसात रानमाळं, विहिरी तुडुंब भरलेल्या ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जलसंधारणाचं काम झाल्यानंतर गेल्यावर्षी वळवाच्या एकाच पावसात रानमाळं, विहिरी तुडुंब भरलेल्या बनगरवाडीतील ग्रामस्थांना आज टँकरने पाणीपुरवठा होतोय. तर दुष्काळामुळं शेतकऱ्यांनी छावणी जवळ केलीय. कोणी वसईला मजुरीसाठी तर मेंढपाळ मराठवाड्यात गेलेत. त्यामुळे अर्ध्या गावाने स्थलांतर केल्याचे दिसत आहे.माण तालुक्यातील इतर दुष्काळी गावाप्रमाणेच बनगरवाडी हे एक गाव. हे गावही उंचावर वसलेलं आहे. गावचा परिसर माळरानात मोडणारा. बनगरवाडीची लोकसंख्या १४५८ तर एकूण क्षेत्र १३५१ हेक्टर. त्यापैकी जवळपास ७५० हेक्टर हे बागायतीत मोडते, तर उर्वरित माळरानच. गाव परिसरात १६० विहिरी, मोठे पाझर तलाव ९, माती नालाबांध २, ओढ्यावर सिमेंट बंधारे २ आहेत. या गावातील २५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थ मेंढपाळ आहेत.सतत पडणाºया दुष्काळामुळे ग्रामस्थांनी गेल्यावर्षी जलसंधारणाचे काम हाती घेतले. वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गाव परिसरात काम करण्यात आलं आणि गावच्या या कामाला यशही आलं. बनगरवाडी गावचा वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात पहिला क्रमांक आला. तर जलसंधारणाच्या कामाच्या दरम्यान गेल्यावर्षी १८ मे रोजी वळवाचा पाऊस झालेला. या पहिल्याच पावसात बनगरवडीतील काही भागातील रानमाळं, शेततळी भरली होती. विहिरी तुडुंब झालेल्या. ओढ्याला पाणी वाहिलेले. त्यानंतर २२ जूनला एकदा पाऊस झाला. त्यामुळे बनगरवाडीला जलसंधारणाचे महत्त्व समजलं. त्यानंतर येथील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या जोरावर पिके घेऊन चांगले पैसेही मिळवले; पण त्यानंतर मान्सून व परतीचा पाऊस न झाल्याने दुष्काळाचं चित्र निर्माण झालं आहे.सद्य:स्थितीत बनगरवाडीतील अर्ध्याहून अधिक ग्रामस्थ हे स्थलांतरित झालेत. मेंढपाळांनी मराठवाडा जवळ केलाय. शेतकºयांनी छावणीतच मुक्काम ठोकला आहे. तर काहींनी मजुरीसाठी वसई जवळ केलीय. येथील लोक अधिक करून मेंढपाळ आणि मजुरीच करतात. सध्याच्या दुष्काळामुळे परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे स्थलांतराचं प्रमाण वाढलंय. आता घरी फक्त लहान मुलं आणि वृद्ध आहेत. त्यांचीही पाणी मिळवण्यासाठी फरफट सुरू झालीय. दिवसदिवसभर वाट बघूनही टँकर येत नाही. पाणी मिळाले तर ते पुरेसे होत नाही, अशी स्थिती. सर्वांनाच पाण्याचाच एक घोर लागलेला. कधी एकदा पाऊस पडतो, असं होऊन गेलंय.बनगरवाडीतील मुलंही वृद्धांच्या आधाराने कसंबसं दिवस ढकलत आहेत. पाऊस पडल्यानंतरच त्यांची आई-वडिलांबरोबर भेट होईल. तोपर्यंतचा एक-एक दिवस ढकलणं जीवावर येऊन गेलंय.एक कोटीवर उत्पन्नगेल्यावर्षी मे आणि जूनमध्ये दोन पाऊस झाले होते. त्यामुळे गाव परिसरात बºयापैकी पाणीसाठा झाला होता. या पाण्याच्या भरवशावरच शेतकºयांनी विविध पिके, भाजीपाला घेतलेला. त्यातून जवळपास एक कोटीहून अधिक रुपये बनगरवाडीतील शेतकºयांच्या हातात पडलेले; पण आता दूरदूर पाहिले जर हिरवं पीक कोठेही नजरेस पडत नाही, अशी स्थिती आहे.