शहरं
Join us  
Trending Stories
1
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
2
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
3
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
4
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
5
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
6
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
7
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
8
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
9
"ओढाताणीची स्थिती तरी राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही"; CM फडणवीसांकडून विरोधकांना रोखठोक प्रत्युत्तर
10
सप्तशृंगी गडावर काळाचा घाला; संरक्षक कठडा तोडून कार खोल दरीत कोसळली; ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू
11
इस्रायलनं असं काय केलं की गुडघ्यावर आली आमेरिका? लेबनानकडे करावी लागली विनंतीवजा मागणी, पण...!
12
भयंकर! चांदीच्या कड्यासाठी कापले सासूचे पाय, ५ वर्षांच्या मुलीचीही हत्या; डबल मर्डरने खळबळ
13
Video - मोठा आवाज आला अन् धुराळा उडाला; ५ सेकंदात पत्त्यासारखं कोसळलं ५ मजली हॉटेल
14
हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष नेता नियुक्तीचा संभ्रम कायम; सभापती राम शिंदे म्हणाले, योग्य वेळी निर्णय होणार
15
"विरोधी पक्षनेते असते तर चांगले झाले असते"; पुतिन यांच्यासाठीच्या डिनर डिप्लोमसीवर शशी थरूर यांचे थेट मत
16
ICU मध्ये आईची मृत्यूशी झुंज; तरीही लेकाला मॅनेजरने दिली नाही सुट्टी, मन हेलावून टाकणारी गोष्ट
17
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
18
मिरची स्प्रेद्वारे प्रवाशांवर हल्ला, लंडनमधील विमानतळावर खळबळ, संशयित आरोपी फरार
19
"उपमुख्यमंत्रिपद घटनाबाह्य असेल, तर रद्द करा"; ठाकरेंच्या मागणीवर एकनाथ शिंदे भडकले; म्हणाले, "ही जुनी पोटदुखी आहे"
20
आधुनिक फीचर्ससह भारतात लॉन्च झाली Harley Davidson ची नवीन X440T; किंमत फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

तुडुंब झालेली बनगरवाडी पाण्यासाठी मोताद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 23:12 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जलसंधारणाचं काम झाल्यानंतर गेल्यावर्षी वळवाच्या एकाच पावसात रानमाळं, विहिरी तुडुंब भरलेल्या ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जलसंधारणाचं काम झाल्यानंतर गेल्यावर्षी वळवाच्या एकाच पावसात रानमाळं, विहिरी तुडुंब भरलेल्या बनगरवाडीतील ग्रामस्थांना आज टँकरने पाणीपुरवठा होतोय. तर दुष्काळामुळं शेतकऱ्यांनी छावणी जवळ केलीय. कोणी वसईला मजुरीसाठी तर मेंढपाळ मराठवाड्यात गेलेत. त्यामुळे अर्ध्या गावाने स्थलांतर केल्याचे दिसत आहे.माण तालुक्यातील इतर दुष्काळी गावाप्रमाणेच बनगरवाडी हे एक गाव. हे गावही उंचावर वसलेलं आहे. गावचा परिसर माळरानात मोडणारा. बनगरवाडीची लोकसंख्या १४५८ तर एकूण क्षेत्र १३५१ हेक्टर. त्यापैकी जवळपास ७५० हेक्टर हे बागायतीत मोडते, तर उर्वरित माळरानच. गाव परिसरात १६० विहिरी, मोठे पाझर तलाव ९, माती नालाबांध २, ओढ्यावर सिमेंट बंधारे २ आहेत. या गावातील २५ टक्क्यांहून अधिक ग्रामस्थ मेंढपाळ आहेत.सतत पडणाºया दुष्काळामुळे ग्रामस्थांनी गेल्यावर्षी जलसंधारणाचे काम हाती घेतले. वॉटर कप स्पर्धेअंतर्गत गाव परिसरात काम करण्यात आलं आणि गावच्या या कामाला यशही आलं. बनगरवाडी गावचा वॉटर कप स्पर्धेत तालुक्यात पहिला क्रमांक आला. तर जलसंधारणाच्या कामाच्या दरम्यान गेल्यावर्षी १८ मे रोजी वळवाचा पाऊस झालेला. या पहिल्याच पावसात बनगरवडीतील काही भागातील रानमाळं, शेततळी भरली होती. विहिरी तुडुंब झालेल्या. ओढ्याला पाणी वाहिलेले. त्यानंतर २२ जूनला एकदा पाऊस झाला. त्यामुळे बनगरवाडीला जलसंधारणाचे महत्त्व समजलं. त्यानंतर येथील शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याच्या जोरावर पिके घेऊन चांगले पैसेही मिळवले; पण त्यानंतर मान्सून व परतीचा पाऊस न झाल्याने दुष्काळाचं चित्र निर्माण झालं आहे.सद्य:स्थितीत बनगरवाडीतील अर्ध्याहून अधिक ग्रामस्थ हे स्थलांतरित झालेत. मेंढपाळांनी मराठवाडा जवळ केलाय. शेतकºयांनी छावणीतच मुक्काम ठोकला आहे. तर काहींनी मजुरीसाठी वसई जवळ केलीय. येथील लोक अधिक करून मेंढपाळ आणि मजुरीच करतात. सध्याच्या दुष्काळामुळे परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे स्थलांतराचं प्रमाण वाढलंय. आता घरी फक्त लहान मुलं आणि वृद्ध आहेत. त्यांचीही पाणी मिळवण्यासाठी फरफट सुरू झालीय. दिवसदिवसभर वाट बघूनही टँकर येत नाही. पाणी मिळाले तर ते पुरेसे होत नाही, अशी स्थिती. सर्वांनाच पाण्याचाच एक घोर लागलेला. कधी एकदा पाऊस पडतो, असं होऊन गेलंय.बनगरवाडीतील मुलंही वृद्धांच्या आधाराने कसंबसं दिवस ढकलत आहेत. पाऊस पडल्यानंतरच त्यांची आई-वडिलांबरोबर भेट होईल. तोपर्यंतचा एक-एक दिवस ढकलणं जीवावर येऊन गेलंय.एक कोटीवर उत्पन्नगेल्यावर्षी मे आणि जूनमध्ये दोन पाऊस झाले होते. त्यामुळे गाव परिसरात बºयापैकी पाणीसाठा झाला होता. या पाण्याच्या भरवशावरच शेतकºयांनी विविध पिके, भाजीपाला घेतलेला. त्यातून जवळपास एक कोटीहून अधिक रुपये बनगरवाडीतील शेतकºयांच्या हातात पडलेले; पण आता दूरदूर पाहिले जर हिरवं पीक कोठेही नजरेस पडत नाही, अशी स्थिती आहे.