शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘पाटण’मध्ये तिसऱ्या पर्यायाची चाचपणी

By admin | Updated: July 9, 2014 00:03 IST

मुख्यमंत्री गट सक्रिय : हिंदुराव अन् चव्हाण यांच्या हालचालीकडे साऱ्यांचेच लक्ष

बाळासाहेब रोडे - सणबूर , पाटण तालुक्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट सक्रिय झाला आहे. त्याद्वारे विधानसभेसाठी तिसऱ्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे. यामुळे हिंदुराव पाटील व राहुल चव्हाण यांच्या हालचालीकडे साऱ्यांचे लक्ष्य लागले आहे.तालुक्यात अनेक वर्षांपासून देसाई व पाटणकर गटांतर्गत राजकारण चालत आले अहो. येथे पक्षीय राजकारणाला थारा मिळाला नाही. दोन गटांतर्गत हा तालुका विखुरला होता. मात्र, १९९९ पासून तालुक्यात खऱ्या अर्थाने पक्षीय राजकारणाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीपासून विक्रमसिंह पाटणकर यांनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी घेतली. यामुळे तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस शिल्लक राहणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. अनेक जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस तालुक्यात राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पडत्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंद्दे समर्थक हिंदुराव पाटील यांनी काँग्रेसची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेऊन काँग्रेसला नवसंजिवनी देण्यासाठी प्रयत् न केले. यासाठी त्यांनी तालुक्यातील प्रत्येक विभागात जाऊन कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. १९९९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. म्हणून खचून न जाता त्यांनी पक्ष वाढविण्यास प्राधान्य दिले. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वत: व पक्षाचे अस्तित्व दाखवून दिले. एवढ्यावरच न थांबता हिंदुराव पाटील यांनी पंचायत समितीत काँग्रेसचा सभापतीही करुन दाखविला. शंभुराज देसाई यांनी पाटण तालुका विकास आघाडीची स्थापना करुन काँग्रेसची युती केली. व पाटणकरांची पंचायत समितीवरील सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत हिंदुराव पाटील यांनी सावध पवित्रा घेऊन शंभुराज देसाई यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये ते यशस्वीही झाले. तेव्हापासून हिंदुराव पाटील तालुक्यात ‘किंग मेकर’ची भूमिका बजावत आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदुराव पाटील यांची भूमिका काय असणार आहे, याकडे आतापासूनच तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे. पाटण तालुक्यात सध्या शंभुराज देसाई व विक्रमसिंह पाटणकर यांचा कलगितुरा आरोप प्रत्यारोपाला उधाण आले आहे. तालुक्यातील राजकारण केवळ नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपावर न थांबता पंचायत समितीतील कामावरुन अधिकाऱ्यांनाही त्यात ओढले जात आहे. त्यामुळे येथील जनता केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.