शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

‘पाटण’मध्ये तिसऱ्या पर्यायाची चाचपणी

By admin | Updated: July 9, 2014 00:03 IST

मुख्यमंत्री गट सक्रिय : हिंदुराव अन् चव्हाण यांच्या हालचालीकडे साऱ्यांचेच लक्ष

बाळासाहेब रोडे - सणबूर , पाटण तालुक्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा गट सक्रिय झाला आहे. त्याद्वारे विधानसभेसाठी तिसऱ्या पर्यायाची चाचपणी सुरू आहे. यामुळे हिंदुराव पाटील व राहुल चव्हाण यांच्या हालचालीकडे साऱ्यांचे लक्ष्य लागले आहे.तालुक्यात अनेक वर्षांपासून देसाई व पाटणकर गटांतर्गत राजकारण चालत आले अहो. येथे पक्षीय राजकारणाला थारा मिळाला नाही. दोन गटांतर्गत हा तालुका विखुरला होता. मात्र, १९९९ पासून तालुक्यात खऱ्या अर्थाने पक्षीय राजकारणाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीपासून विक्रमसिंह पाटणकर यांनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी घेतली. यामुळे तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस शिल्लक राहणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. अनेक जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस तालुक्यात राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पडत्या काळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंद्दे समर्थक हिंदुराव पाटील यांनी काँग्रेसची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेऊन काँग्रेसला नवसंजिवनी देण्यासाठी प्रयत् न केले. यासाठी त्यांनी तालुक्यातील प्रत्येक विभागात जाऊन कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. १९९९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. म्हणून खचून न जाता त्यांनी पक्ष वाढविण्यास प्राधान्य दिले. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत स्वत: व पक्षाचे अस्तित्व दाखवून दिले. एवढ्यावरच न थांबता हिंदुराव पाटील यांनी पंचायत समितीत काँग्रेसचा सभापतीही करुन दाखविला. शंभुराज देसाई यांनी पाटण तालुका विकास आघाडीची स्थापना करुन काँग्रेसची युती केली. व पाटणकरांची पंचायत समितीवरील सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत हिंदुराव पाटील यांनी सावध पवित्रा घेऊन शंभुराज देसाई यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये ते यशस्वीही झाले. तेव्हापासून हिंदुराव पाटील तालुक्यात ‘किंग मेकर’ची भूमिका बजावत आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदुराव पाटील यांची भूमिका काय असणार आहे, याकडे आतापासूनच तालुक्यातील राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे. पाटण तालुक्यात सध्या शंभुराज देसाई व विक्रमसिंह पाटणकर यांचा कलगितुरा आरोप प्रत्यारोपाला उधाण आले आहे. तालुक्यातील राजकारण केवळ नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपावर न थांबता पंचायत समितीतील कामावरुन अधिकाऱ्यांनाही त्यात ओढले जात आहे. त्यामुळे येथील जनता केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.