शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

चोरट्यांनी सोनं चोरलं.. लेकरांनी मन जिंकलं..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 10:52 PM

सातारा : उदयनराजे भोसले यांच्या रॅलीत शिरकाव करून चोरट्यांनी अक्षरश: धुुमाकूळ घातला. एकीकडे हे चोरटे लोकांचे लक्ष नसताना सोनं ...

सातारा : उदयनराजे भोसले यांच्या रॅलीत शिरकाव करून चोरट्यांनी अक्षरश: धुुमाकूळ घातला. एकीकडे हे चोरटे लोकांचे लक्ष नसताना सोनं चोरत होते, तर दुसरीकडे कष्ट करणारी चिमुरडी कार्यकर्त्यांची मनं चोरत होती.साताऱ्यात मंगळवारी काढण्यात आलेल्या रॅलीत चोरट्यांनी सुमारे ३३ तोळे सोने चोरलं. चोरट्यांचा हा प्रकार गुपचूप सुरू असतानाच पोवई नाक्यावर कार्यकर्त्यांच्या पायात पडलेल्या बाटल्या उचलण्याचं काम अवघ्या आठ ते बारा वर्षांची मुले करत होती. रॅलीत पाणी पिऊन झाले की या बाटल्या रस्त्यावर टाकण्यात आल्या. सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच तीन मुलं याठिकाणी आली. हातात मोठं प्लास्टिकचं पोतं घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांच्या पायातील रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या उचलल्या. परस्परांना खुणवून त्यांनी आपापलं कार्यक्षेत्रही निश्चित केलं होतं.राजवाडा, सिटी पोस्ट आणि पोवईनाका येथे आपल्या आईसह ही तीन मुलं फिरत होती. रॅली नाक्यावर पोहोचल्याचा अंदाज घेऊन एकेक मूल पोवई नाक्यावर पोहोचले.याविषयी ‘लोकमत’शी बोलताना त्यांच्यातील सुदेश म्हणाला, ‘उन्हाळ्याच्या दिवसात पाणी वाटतात, हे आम्हाला माहीत आहे. म्हणून आम्ही पाच पोती घेऊन घरातून बाहेर पडलो; पण बाटल्या जास्त मिळाल्या. म्हणून ठेकेदाराकडे तीन पोती रिकामी करून पुन्हा नाक्यावर आलो. ठेकेदार बाटल्या न मोजता एका पोत्याचा हिशोब लावणार. गेल्या तीन तासांत आम्ही ९ पोती भरून रिकाम्या बाटल्या गोळा केल्यात. त्यातून हजार-बाराशे रुपये सहज मिळतील.’ शाळेत जातो का? या प्रश्नावर चटकन उत्तर आलं, ‘आज सकाळीच पेपर होता. परीक्षा दिली, आहार खाल्ला अन् कामाला आलो. एकट्या आईला हे गोळा करणं अवघड झालं असतं ना?’गर्दीतील अनेकांनी आपल्या पायाजवळील रिकाम्या बाटल्या त्यांच्या पोत्यात टाकून त्यांनाही या कामात मदत केली.मिरजेच्या कार्यकर्त्याची सतर्कताया रॅलीत सांगली-मिरज या भागातूनही कार्यकर्ते जमा झाले होते. मिरज येथे सोने-चांदीचे व्यापारी असलेले विक्रम देसाई यांच्या गळ्यातील चेन चोरण्याचा प्रयत्नही शेटे चौक परिसरात झाला; पण गळ्यामागे कोणाचातरी हात आल्याने ते सतर्क झाले. त्यांनी गळ्यातील चेनला हात लावेपर्यंत चेन पेंडंटसह हातात आली. पण गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या खिशातील काही रक्कम मात्र चोरट्यांनी पळविली.एक पोतं बाटल्या अन् दीडशेची जुळणीरॅलीच्या ठिकाणी सुमारे दहा हजार बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यातील अनेकांनी पाणी पिऊन बाटली तिथेच टाकली. या बाटल्या पोत्यात भरून भंगार व्यावसायिक यांच्याकडे विक्रीसाठी नेल्या जातात. एका पोत्याला साधारण दीडशे रुपयांचा भाव मिळण्याचा अंदाज आहे. रणरणत्या उन्हात चार तास काम केल्यानंतर या चारजणांना दीड हजार रुपये मिळतील, अशी खात्री त्यांना होती.