शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गुरं खात नाहीत, ते खातात माणसं!

By admin | Updated: December 26, 2014 23:54 IST

रेशनिंगचा गहू : दगड, माती, काड्यांचा गोरगरिबांना ‘पौष्टिक’ आहार

सागर गुजर - सातारा -हाडाचा शेतकरी घासातला घास गुरांना देतो. चुकून अयोग्य वस्तू गुरांच्या खाण्यात येऊ नये, याचीही काळजी घेतो; पण आपलं शासन जिवंत माणसांच्या आरोग्याबाबतही उदासीन आहे. गुरेही खात नाहीत असे खडे, मातीमिश्रित गहू रेशनिंगच्या माध्यमातून घराघरांत पोहोचत आहेत. ‘पापी पेट का सवाल है भैय्या,’ म्हणत पोटाची खळगी भरण्यासाठी सामान्य कुटुंबे नाइलाजानं खडे बाजूला करुन गहू दळणाला पाठवत आहे. याच ‘पौष्टिक’ अन्नावर पोसलेले देह काबाडकष्ट करतात, म्हणून त्यांची अशी हेळसांड केली जातेय का, असा सवाल सर्वसामान्यांतून विचारला जात आहे.दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना (शासनाच्या भाषेत प्राधान्य कुटुंबे) दोन रुपये ८0 पैसे प्रतिकिलो दराने महिन्याकाठी ३५ किलो गहू मिळतो. बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी दरात मिळत असल्याने गोरगरीब लोक तोच खरेदी करतात. हा गहू किडका नसला तरी त्यात माती, काड्या, खडेमिश्रित माती, लाकडी काड्या यांचा भरणा आहे. सदर बझार येथील प्राधान्य कुटुंबे सध्या हा गहू स्वच्छ करण्यात गुंतलेली पाहायला मिळतात. हा प्रश्न एकाच ठिकाणचा नसून जिल्ह्यातील नागरिकांना रेशनिंगमधून मिळणाऱ्या धान्याचा हा सार्वत्रिक अनुभव आहे. दरम्यान, याबाबत पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता, ‘वखार महामंडळातील धान्याची तपासणी करुन मगच ते स्वस्त धान्य दुकानदारांकडे पाठविले जाते. त्यातूनही दुकानदारांनी काही आक्षेप घेतल्यास तो गहू शासनाकडे परत केला जातो,’ असं सांगण्यात येतंय. त्यामुळे नेमकं ‘पाणी कुठे मुरतंय’ हे समजेनासं झालंय. दुकानदाराकडे जर अस्वच्छ गहू आला तर तोच कार्डधारकांच्या माथी मारला जातोय, हे स्पष्ट होत आहे. अथवा काही जण त्यात दगड, माती टाकून ‘वजन’ वाढवतात, असंही म्हणायला वाव आहे. पुरवठा विभागाने यात लक्ष घालावे, तसेच छापासत्र राबवून गव्हात खडे मिसळून गरिबांच्या आरोग्यावर उठणाऱ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सामान्य नागरिकांतून होत आहे. जिल्ह्यातील रेशनिंगचा लेखाजोखारेशनिंग परवानाधारक : केरोसीन परवानाधारक : शिधापत्रिकाधारक : प्राधान्य कुटुंबे : रेशनिंगवर धान्य पाठविण्याआधी त्याची तपासणी केली जाते. रेशनिंग दुकानातील निकृष्ट धान्याविषयी तक्रार असल्यास नागरिकांनी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा. संबंधित दुकानदारांवर कारवाई केली जाईल.- शमा ढोक (पवार)जिल्हा पुरवठा अधिकारीमहिन्याकाठी होणारा धान्यपुरवठागहू 5हजार 660 मेट्रिक टनतांदूळ3हजार 900 मेट्रिक टन