शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आहे उशाला; पण देता येईना पिकाला !

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

कऱ्हाड तालुक्यातील स्थिती: ‘मनरेगा’च्या दीडशे विहिरींना वीजजोडणीची प्रतीक्षा; पाणी असूनही करपताहेत पिके, हेलपाट्याने शेतकरी हतबल

कऱ्हाड : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कऱ्हाड तालुक्यात सन २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षांत ४३३ विहिरी खोदण्यात आल्या. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, त्यापैकी १४७ विहिरींना अद्यापही वीजजोडणीची प्रतीक्षा आहे. यंदा दुष्काळाची तीव्रता भयानक आहे. अशाच स्थितीत विहिरीत पाणी असूनही उपसा होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. तर वीज जोडणीसाठी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांकडे हेलपाटे घालून शेतकरी हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहेत.भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. त्यामुळे शेतीच्या पाण्यासाठी लागणारे वीज कनेक्शन तातडीने देण्याची घोषणा नेहमीच होते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अनुभव मात्र वेगळेच येताना दिसतात. सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना (मनरेगा) ची चर्चा सगळ्याच पातळीवर जोरदार सुरू आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याचे सरकार सांगते. मात्र, प्रत्यक्षात नुसते डबरे काढून उपयोग नाही. तर पाणी उपसासाठी वीज कनेक्शनही लागते हे कोण लक्षात घेणार ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांतून विचारला जाऊ लागला आहे.कऱ्हाड तालुक्यात गेल्या दोन वर्षांत ४३३ विहिरींची खुदाई करण्यात आली. त्या सर्व विहिरींना शासनाचे पूर्ण अनुदानही देण्यात आले आहे. विहिरींची खुदाई, बांधकाम असे सर्व काम पूर्ण झाले असून, त्यांना वीज कनेक्शन देण्यासाठीची यादी महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडे सादर करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनीही त्यासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आवश्यक रक्कमही वीजवितरण कंपनीकडे भरली आहे. पैकी २८६ विहिरींना वीज कनेक्शन मिळाले. मात्र, १४७ विहिरींना अद्याप वीजवितरण कंपनीने वीज कनेक्शनच दिलेले नाही.दरम्यान, वीज कनेक्शनसाठी शेतकऱ्यांनी सुरुवातीला पंचायत समितीमध्ये हेलपाटे घालायला सुरुवात केले. तेथून त्यांना, ‘आम्ही विद्युत महामंडळाकडे वीज कनेक्शन द्या, असा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडेच चौकशी करा.’ असे उत्तर मिळते. मात्र, वीजवितरण कार्यालयात गेल्यानंतर तेथे त्यांची कोणी दखल घेतली जात नाही. उलट उडावाउडवीचीच उत्तरे मिळतात. त्यामुळे या कार्यालयामध्ये वीज कनेक्शसाठी हेलपाटे घालून शेतकरी हतबल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.यंदा कृष्णा-कोयनेच्या काठावर वसलेल्या कऱ्हाड तालुक्यालाही उन्हाळाची चांगलीच झळ बसू लागली आहे. तालुक्यातील ५९ गावांत पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असून, ही गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. नदी, ओढ्याकाठच्या विहिरींना थोडेसे पाणी असले तरी इतरत्र असलेल्या विहिरींनी तळ गाठला आहे. पिके कशी जगवायची याची शेतकऱ्यांना चिंता पडली आहे. याउलट तालुक्यातील १४७ विहिरींना वीज कनेक्शन नसल्याने गेल्या दीड वर्षापासून त्यातील पाणीसाठी वापराविना पडून आहे. त्यामुळे ‘पाणी आहे उशाला; पण देता येईना पिकाला’ अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे.याबाबत संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांचे पर्यायाने कृषीप्रधान राष्ट्राचे होणारे नुकसान रोखावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (प्रतिनिधी)पत्रव्यवहाराची जुगलबंदीदरम्यान, वीज कनेक्शनसाठी शेतकरांचा रेटा वाढल्याने गटविकास अधिकाऱ्यांनी वीजवितरणच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून वीज कनेक्शनची मागणी केली. मात्र, त्याला, ‘मनरेगा’ अंतर्गत असलेल्या विहिरींना वीज कनेक्शन देण्यासाठी लागणाऱ्या वेगळ्या निधीची तरतूद उपलब्ध नाही. आपण जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा करून हा निधी महावितरणकडे वर्ग करण्याकरिता पत्र व्यवहार करावा, असे शासकीय उत्तर कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे. या पत्रव्यवहाराच्या जुगलबंदीत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हाल मात्र सुरू आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटना ही नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रभागी असते. कऱ्हाड तालुक्यातील ‘मनरेगा’ अंतर्गत वीज कनेक्शन न मिळालेल्या शेतकऱ्यांची माहिती घेतली आहे. त्यांना बरोबर घेऊन वीज कनेक्शनसाठी लवकरच वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. त्यातून मार्ग न निघाल्यास आम्ही रस्त्यावर उतरण्यास मागे-पुढे पाहणार नाही.- सचिन नलवडेतालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,कऱ्हाड उत्तर