शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी आमदारांच्या गणतीत येळगावकर नव्हतेच!

By admin | Updated: July 7, 2014 23:03 IST

जिल्हाध्यक्ष : आमदारांच्या कार्यपध्दतीवर होते आतून नाराज

सातारा : भाजपच्या पठडीत तयार झालेल्या डॉ. दिलीपराव येळगावकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस कधी मानवलीच नाही आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनीही जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना कधी गणतीत धरलेच नाहीे. मंत्री शशिकांत शिंदे आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर वगळता राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. परिणामी वारंवार नाराज झालेल्या येळगावकरांना अखेर राष्ट्रवादीला रामराम करत पुन्हा स्वगृही परतावे लागले आहे. दरम्यान, येळगावकरांच्या जाण्यामुळे माण, कोरेगाव आणि कऱ्हाड उत्तर या तीन मतदार संघांतील काही गावांत राष्ट्रवादी बॅकफूटवर जाऊ शकते. येळगावकरांनी राष्ट्रवादी सोडण्यामागे दुष्काळी पाणीप्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष हे कारण दिले असले तरी अन्य कारणे देखील दुर्लक्षून चालणार नाहीत. आक्रमक चेहरा म्हणूून ओळख असलेल्या येळगावकरांना खटावच्या जनतेने एकदा आमदार म्हणून स्वीकारले. त्यांचा आमदारकीचा कालावधी त्यांच्या विविध प्रकारच्या आंदोलनामुळे गाजला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यांना माणमध्ये पराभूत व्हावे लागले. या राजकीय कालखंडात त्यांच्यासमोर असंख्य अडचणी निर्माण झाल्या. अडचणीच्या काळात मदत म्हणून त्यांना राष्ट्रवादी हाच एकमेव मार्ग सापडला. मात्र, तत्पूर्वीही त्यांच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी ‘घड्याळ’ हातात बांधले होते. ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची ‘विदूषक’ म्हणून हेटाळणी केली त्याच राष्ट्रवादीत कालांतराने येळगावकरही डेरेदाखल झाले. दरम्यानच्या काळात त्यांची आक्रमकता पाहून आणि शशिकांत शिंदे मंत्रिपदी विराजमान झाले आणि जिल्हाध्यक्षपदाची माळ येळगावकरांच्या गळ्यात पडली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी, विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांकडून काही प्राथमिक अपेक्षा ठेवल्या होत्या. त्यांच्या अपेक्षा पक्षवाढीच्या असल्यातरी राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला येळगावकर आणि शिस्तबद्धपणा मान्य नव्हता. येळगावकरांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात शिस्तीला दिलेले प्राधान्य बेशिस्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधी मानवलेच नाही. संबंधित आमदारांनी अथवा विविध सेलचे अध्यक्ष अथवा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भागात एखादा मेळावा लावला तर त्याची कल्पना जिल्हाध्यक्ष म्हणून द्यायला हवी, निमंत्रित करायला हवे, अशी अपेक्षा येळगावकरांची होती. मात्र, मंत्री शशिकांत शिंदे आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर वगळता राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ही बाब येळगावकरांच्या नेहमीच जिव्हारी लागली होती. तशी खंत त्यांनी मंत्री शिंदे आणि रामराजे यांच्याकडेही व्यक्त केली होती. परिणामी येळगावकर ज्या-ज्यावेळी नाराज व्हायचे, त्या-त्यावेळी हे दोघेही त्यांची समजूत काढत होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि त्यांनी राष्ट्रवादीने दिलेली गाडी कार्यालयाच्या ताब्यात दिली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तरी ते गाडी कार्यालयातून नेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी गाडी नेली नाही. गोपीनाथ मुंडे ग्रामीणविकास मंत्री झाल्यानंतर त्यांना भाजपमध्ये येण्याचा निरोप देण्यात आला होता. मात्र, मुंडे यांच्या निधनामुळे त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला.