शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी आमदारांच्या गणतीत येळगावकर नव्हतेच!

By admin | Updated: July 7, 2014 23:03 IST

जिल्हाध्यक्ष : आमदारांच्या कार्यपध्दतीवर होते आतून नाराज

सातारा : भाजपच्या पठडीत तयार झालेल्या डॉ. दिलीपराव येळगावकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस कधी मानवलीच नाही आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनीही जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना कधी गणतीत धरलेच नाहीे. मंत्री शशिकांत शिंदे आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर वगळता राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. परिणामी वारंवार नाराज झालेल्या येळगावकरांना अखेर राष्ट्रवादीला रामराम करत पुन्हा स्वगृही परतावे लागले आहे. दरम्यान, येळगावकरांच्या जाण्यामुळे माण, कोरेगाव आणि कऱ्हाड उत्तर या तीन मतदार संघांतील काही गावांत राष्ट्रवादी बॅकफूटवर जाऊ शकते. येळगावकरांनी राष्ट्रवादी सोडण्यामागे दुष्काळी पाणीप्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष हे कारण दिले असले तरी अन्य कारणे देखील दुर्लक्षून चालणार नाहीत. आक्रमक चेहरा म्हणूून ओळख असलेल्या येळगावकरांना खटावच्या जनतेने एकदा आमदार म्हणून स्वीकारले. त्यांचा आमदारकीचा कालावधी त्यांच्या विविध प्रकारच्या आंदोलनामुळे गाजला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यांना माणमध्ये पराभूत व्हावे लागले. या राजकीय कालखंडात त्यांच्यासमोर असंख्य अडचणी निर्माण झाल्या. अडचणीच्या काळात मदत म्हणून त्यांना राष्ट्रवादी हाच एकमेव मार्ग सापडला. मात्र, तत्पूर्वीही त्यांच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी ‘घड्याळ’ हातात बांधले होते. ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची ‘विदूषक’ म्हणून हेटाळणी केली त्याच राष्ट्रवादीत कालांतराने येळगावकरही डेरेदाखल झाले. दरम्यानच्या काळात त्यांची आक्रमकता पाहून आणि शशिकांत शिंदे मंत्रिपदी विराजमान झाले आणि जिल्हाध्यक्षपदाची माळ येळगावकरांच्या गळ्यात पडली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी, विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांकडून काही प्राथमिक अपेक्षा ठेवल्या होत्या. त्यांच्या अपेक्षा पक्षवाढीच्या असल्यातरी राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला येळगावकर आणि शिस्तबद्धपणा मान्य नव्हता. येळगावकरांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात शिस्तीला दिलेले प्राधान्य बेशिस्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधी मानवलेच नाही. संबंधित आमदारांनी अथवा विविध सेलचे अध्यक्ष अथवा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भागात एखादा मेळावा लावला तर त्याची कल्पना जिल्हाध्यक्ष म्हणून द्यायला हवी, निमंत्रित करायला हवे, अशी अपेक्षा येळगावकरांची होती. मात्र, मंत्री शशिकांत शिंदे आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर वगळता राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ही बाब येळगावकरांच्या नेहमीच जिव्हारी लागली होती. तशी खंत त्यांनी मंत्री शिंदे आणि रामराजे यांच्याकडेही व्यक्त केली होती. परिणामी येळगावकर ज्या-ज्यावेळी नाराज व्हायचे, त्या-त्यावेळी हे दोघेही त्यांची समजूत काढत होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि त्यांनी राष्ट्रवादीने दिलेली गाडी कार्यालयाच्या ताब्यात दिली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तरी ते गाडी कार्यालयातून नेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी गाडी नेली नाही. गोपीनाथ मुंडे ग्रामीणविकास मंत्री झाल्यानंतर त्यांना भाजपमध्ये येण्याचा निरोप देण्यात आला होता. मात्र, मुंडे यांच्या निधनामुळे त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला.