शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

राष्ट्रवादी आमदारांच्या गणतीत येळगावकर नव्हतेच!

By admin | Updated: July 7, 2014 23:03 IST

जिल्हाध्यक्ष : आमदारांच्या कार्यपध्दतीवर होते आतून नाराज

सातारा : भाजपच्या पठडीत तयार झालेल्या डॉ. दिलीपराव येळगावकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस कधी मानवलीच नाही आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनीही जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना कधी गणतीत धरलेच नाहीे. मंत्री शशिकांत शिंदे आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर वगळता राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले. परिणामी वारंवार नाराज झालेल्या येळगावकरांना अखेर राष्ट्रवादीला रामराम करत पुन्हा स्वगृही परतावे लागले आहे. दरम्यान, येळगावकरांच्या जाण्यामुळे माण, कोरेगाव आणि कऱ्हाड उत्तर या तीन मतदार संघांतील काही गावांत राष्ट्रवादी बॅकफूटवर जाऊ शकते. येळगावकरांनी राष्ट्रवादी सोडण्यामागे दुष्काळी पाणीप्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष हे कारण दिले असले तरी अन्य कारणे देखील दुर्लक्षून चालणार नाहीत. आक्रमक चेहरा म्हणूून ओळख असलेल्या येळगावकरांना खटावच्या जनतेने एकदा आमदार म्हणून स्वीकारले. त्यांचा आमदारकीचा कालावधी त्यांच्या विविध प्रकारच्या आंदोलनामुळे गाजला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्यांना माणमध्ये पराभूत व्हावे लागले. या राजकीय कालखंडात त्यांच्यासमोर असंख्य अडचणी निर्माण झाल्या. अडचणीच्या काळात मदत म्हणून त्यांना राष्ट्रवादी हाच एकमेव मार्ग सापडला. मात्र, तत्पूर्वीही त्यांच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी ‘घड्याळ’ हातात बांधले होते. ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची ‘विदूषक’ म्हणून हेटाळणी केली त्याच राष्ट्रवादीत कालांतराने येळगावकरही डेरेदाखल झाले. दरम्यानच्या काळात त्यांची आक्रमकता पाहून आणि शशिकांत शिंदे मंत्रिपदी विराजमान झाले आणि जिल्हाध्यक्षपदाची माळ येळगावकरांच्या गळ्यात पडली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी, विधानसभा मतदारसंघ अध्यक्षांकडून काही प्राथमिक अपेक्षा ठेवल्या होत्या. त्यांच्या अपेक्षा पक्षवाढीच्या असल्यातरी राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला येळगावकर आणि शिस्तबद्धपणा मान्य नव्हता. येळगावकरांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात शिस्तीला दिलेले प्राधान्य बेशिस्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कधी मानवलेच नाही. संबंधित आमदारांनी अथवा विविध सेलचे अध्यक्ष अथवा पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भागात एखादा मेळावा लावला तर त्याची कल्पना जिल्हाध्यक्ष म्हणून द्यायला हवी, निमंत्रित करायला हवे, अशी अपेक्षा येळगावकरांची होती. मात्र, मंत्री शशिकांत शिंदे आणि राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर वगळता राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ही बाब येळगावकरांच्या नेहमीच जिव्हारी लागली होती. तशी खंत त्यांनी मंत्री शिंदे आणि रामराजे यांच्याकडेही व्यक्त केली होती. परिणामी येळगावकर ज्या-ज्यावेळी नाराज व्हायचे, त्या-त्यावेळी हे दोघेही त्यांची समजूत काढत होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि त्यांनी राष्ट्रवादीने दिलेली गाडी कार्यालयाच्या ताब्यात दिली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तरी ते गाडी कार्यालयातून नेतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांनी गाडी नेली नाही. गोपीनाथ मुंडे ग्रामीणविकास मंत्री झाल्यानंतर त्यांना भाजपमध्ये येण्याचा निरोप देण्यात आला होता. मात्र, मुंडे यांच्या निधनामुळे त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला.