शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

पारदर्शकता आहे...विद्यार्थ्यांनी पाऊल पुढे टाकावेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 23:53 IST

राजेश चव्हाण : कोल्हापूर कृषी महाविद्यालय, राहुरी कृषी विद्यापीठानं घडवलं; एम.एस्सी. अ‍ॅग्रीनंतर तहसीलदारपदाला गवसणी

सागर गुजर -- सातारा --स्पर्धा परीक्षेसाठी जीव तोडून मेहनत घेणाऱ्यांना प्रशासनात हमखास संधी आहे. या परीक्षेत पारदर्शकताही तितकीच आहे. अभ्यासातील सातत्य आणि परिश्रमावरील विश्वास या दोन गोष्टी प्रशासनात येऊ पाहणाऱ्या जिगरबाज तरुणांना रोखू शकत नाहीत, असं अनुभवसिद्ध सूत्र साताऱ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी सांगितलं.बारामती तालुक्यातील डोरलेवाडी हे मूळगाव असणाऱ्या राजेश चव्हाण यांनी सातत्यपूर्ण अभ्यास व निरीक्षणाच्या जोरावर तहसीलदारपद मिळविले आहे. या यशामध्ये कोल्हापूर कृषी महाविद्यालय आणि राहुरी कृषी विद्यापीठाचा मोठा वाटा असल्याचे ते अभिमानाने सांगत होते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांप्रमाणेच त्यांनाही बालपणी विटी-दांडू, गोट्या असे खेळ खेळण्याची आवड होती. विहिरी, कॅनॉलमध्ये पोहायचे, घरच्या शेतात गरज असेल तेव्हा राबायचे, असेच त्यांचे बालपण व शालेय जीवनातील प्रसंग होते. त्यांचे वडील मोतीराम चव्हाण हे डोरलेवाडीतील पहिलेच पदवीधर! वडील पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये माध्यमिक शिक्षक असल्याने राजेश चव्हाण यांचे शिक्षण पुणे, बारामती येथील विविध विद्यालयांमध्ये झाले. पहिली ते सहावीपर्यंत ते वाणेवाडी या गावात शिकले. सातवी ते आठवीपर्यंत इंदापूर तालुक्यातील कळस येथे त्यांचे शिक्षण झाले. वडील ज्या ठिकाणी बदलून जात, त्या गावातील शाळेत त्यांना प्रवेश घ्यावा लागत होता. शैक्षणिक गुणवत्ता चांगली असल्याने वडिलांनी त्यांना वालचंदनगर येथील वर्धमान विद्यालयात प्रवेश घ्यायला लावला. परिसरातील चांगल्या दर्जाची शाळा म्हणून या शाळेचा नावलौकिक होता. नववी व दहावी ही दोन वर्षे या शाळेतच काढली. दहावीला ८७ टक्के गुण मिळाले. बारावीची परीक्षा त्यांनी बारामतीमधील तुळजाराम चतूरचंद सायन्स कॉलेजमधून केली. यानंतर वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी असे दोनच पर्याय सायन्सची मुले निवडत असत; मात्र राजेश चव्हाण यांनी बी.एसस्सी. अ‍ॅग्री करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयात मन लावून त्यांनी बी.एसस्सी. पूर्ण केली. एम.एसस्सी. अ‍ॅग्रीसाठी त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला. राहुरी कृषी विद्यापीठात आल्यानंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले. आयुष्यातील ध्येय निश्चित झाली. मुलाखतीचे तंत्र, गु्रप डिस्कशन, प्रश्नपत्रिकांचा सराव असं रोजचं काम सुरू होतं. पहाटे पाच वाजता उठायचे. रात्री दहा वाजेपर्यंत अभ्यास करायचा, असा नित्यनेम सुरू झाला. २००० मध्ये ते एम.एसस्सी. अ‍ॅग्री झाले. दोन वर्षे त्यांनी मन लावून एमपीएससीचा अभ्यास केला. २००१ मध्ये त्यांनी नायब तहसीलदार पदाची परीक्षा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांक उत्तीर्ण केली. सांगली, वाई, वडगाव मावळ या ठिकाणी प्रशासकीय सेवा बजावल्यानंतर ते साताऱ्यात तहसीलदार म्हणून रुजू झाले. आपण स्वत: कृषी पदवीधर असल्याने शेती करणाऱ्यांविषयी आत्मीयता कायम राहिली आहे. राजस्व अभियानाच्या माध्यमातून काम करत असताना खूप आनंद होतो. पाणंद रस्ते, शेतामध्ये जोडणारे रस्ते तयार करत असताना रस्त्यांची किती गरज आहे, हे लक्षात आले. शेती संदर्भातील कामे करत असताना फार समाधान मिळत असल्याचे ते सांगतात. कृषी पदवी घेतल्याचे सार्थक या निमित्तानं झालं आहे. पत्नी शीतल या दिव्या व मुग्धा या दोन मुलींची विशेष काळजी घेतात. प्रशासकीय कामाच्या व्यापामुळे कुटुंबाकडं त्याच लक्ष देतात. संयम ठेवा, यश तुमचेच!स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना संयम महत्त्वाचा असतो. जे ध्येय मनात बाळगले आहे, त्या ध्येयाच्या दिशेने जाताना आळस, थकवा, कौटुंबिक परिस्थिती, वाढते वय या बाबी त्रासदायक ठरतात; मात्र अभ्यासावर लक्ष ठेवून वाटचाल केल्यास शंभर टक्के यश मिळते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांनी काही झाले तरी ध्येयाची दिशा बदलता कामा नये, असे राजेश चव्हाण सांगतात.ग्रुप डिस्कशनमुळे सर्व सोपेराहुरी येथील कृषी एकता मंचचे मुलांच्या एमपीएससी परीक्षेतील यशामध्ये मोठा वाटा आहे. या मंचने प्रशस्त हॉल उपलब्ध करून दिला आहे. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रश्नपत्रिकांचा सराव तसेच मुलाखतीसाठी लागणारे तंत्र आम्हाला शिकविले. मुलाखतीला सामोरे जाताना मनात थोडी चलबिचल राहणे साहजिक असले तरी गु्रप डिस्कशनच्या प्रभावी माध्यमामुळे आमचा आत्मविश्वास वाढल्याचे चव्हाण यांनी सांगितले.