शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पवारवाडीत तुफान आलंया...काळ्या भुईचं सपानं आलंया!

By admin | Updated: May 22, 2017 17:03 IST

शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग : सावित्रीच्या लेकींकडून पवारवाडीत श्रमदान

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २२ : सातारा जिल्ह्यातील पवार वाडीत शनिवार दि. २0 आणि रविवार दिनांक २१ मे रोजी राष्ट्र सेवा दलातल्या "सावित्रीच्या लेकी "समवेत राज्यभरातून आलेल्या शेकडो राष्ट्र सेवा दल सैनिकांनी श्रमदान केले. श्रमदान करणाऱ्या मध्ये तरुणींची संख्या लक्षणीय होती.मुंबई, पालघर, पनवेल, सिंधुदुर्ग, नासिक, मालेगाव, पुणे, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी, सोलापूर अशा राज्यभरातील सेवादल शाखांमधून कार्यकर्ते श्रमदानासाठी पवार वाडीत दाखल झाले होते. झाडे लावण्यासाठी शेकडो खड्डे त्यांनी खोदले. येत्या पावसाळ्यात तिथं झाडे लावली जाणार आहेत. इचलकरंजीच्या कार्यकर्त्यांनी सीड बँकेच्या माध्यमातून शाळा-शाळा मधून जमा केलेल्या हजारो बिया गावच्या सरपंचांकडे दिल्या.

राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांशी गावकरी मोकळा संवाद करताना दिसत होते.या पुढे स्मार्ट व्हिलेज करण्याचा संकल्प या गावचे तरुण सरपंच राजेंद्र पवार यांनी बोलून दाखविला.जल संधारणाबरोबर या गावातील लोकांचे मनसंधारण या निमित्ताने झाले ही या "सत्यमेव जयते वॉटर कप" स्पर्धेची आणि "राष्ट्र सेवा दला" सारख्या संघटनेचे यश आहे. या शिबिरात श्रमदानाबरोबरच लेक लाडकी अभियानाच्या वर्षा देशपांडे, शाहीर कैलास जाधव, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ अभिजीत वैद्य, तरुण कीर्तनकार सचिन पवार, पवार वाडीचे सरपंच राजेंद्र पवार, वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन माने, पत्रकार अश्विनी सातव, राजा भाऊ अवसक, प्रा. रामदास निकम यांनी दोन दिवस मार्गदर्शन केले. देशा मध्ये धर्माच्या,जातीच्या नावावर जे राजकारण सुरु आहे त्याच्या विरोधात श्रम दाना बरोबरच वैचारिक श्रमदान करण्याची गरज राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ अभिजीत वैद्य यांनी व्यक्त केली. राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम, संजय रेंदाळकर, सचिव नचिकेत कोळपकर , विद्याधर ठाकूर, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत डिग्रजे, छात्र भारतीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दत्ता ढगे, सुनील स्वामी, दामिनी पवार, उषा कोष्टी, वैशाली हुबळे, शोभा स्वामी, श्वेता दिब्रिटो आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. पाणी फौंडेशनच्या या स्पर्धेच्या माध्यमातून बांधावरून गावात सुरु असलेले वाद १00 टक्के मिटले आहेत. जलसंधारणाबरोबर मनसंधारणेचे काम या निमित्ताने झाले.माणसे जोडण्याचे सेवा दलाचे हे काम आम्ही पुढे नेऊ.- राजेंद्र पवार, सरपंच,पवारवाडी, ता.कोरेगाव