शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

सरपंच झालं की मृत्यू... छे हो, असं काहीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : गावात चेष्टेतून बोललेल्या विषयाचा धागा पकडून प्रसारमाध्यमांद्वारे महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गाव ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : गावात चेष्टेतून बोललेल्या विषयाचा धागा पकडून प्रसारमाध्यमांद्वारे महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गाव जगप्रसिद्ध झाले. गावचे सरपंचपद स्वीकारणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होतो म्हणून चार पंचवार्षिक गावचे सरपंचपद रिक्त राहिलं, अशा अफवा पुढं आल्या. पात्र उमेदवार नसल्याने हे पद रिक्त राहिले, ही वस्तुस्थिती ग्रामस्थांनी सांगितली. गावात अंधश्रद्धेचा बाजार कोणीच मांडत नाही, माध्यमांनीही आता हे बास करावं, अशी आर्जव ‘लोकमत’कडे ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सरपंच झालं की मृत्यू होतो, ही अफवा कोणीतरी माध्यमांपर्यंत पोहोचवली अन्‌ कॅमेरामनची पावले महाबळेश्वर तालुक्यातील राजपुरी गावाकडे वळली. ‘लोकमत’ टीमने या अंधश्रद्धेमागे खरं कारण काय याचा शोध घेतला आणि हाती आली अफवेमागील रिॲलिटी! महाबळेश्वर तालुक्यात राजपुरी हे सुमारे बाराशे ते तेराशे लोकसंख्येचं पाचगणीपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर, डोंगरउतारावर वसलेलं हे नेटकं गाव. स्टॉबेरीच्या उत्पादनामुळे गाव तसं बऱ्यापैकी सुधारलेले असलं तरीही गावाचा बाज अद्यापही कायम. या गावचे सरपंचपद स्वीकारणाऱ्याचा मृत्यू होतो, ही कांडी गावात पिकली. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला हवा मिळाली आणि कानोकानी ती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचली. तोपर्यंत सरपंचपदाची निवड झाली आणि गावची सून शीतल विश्वास राजपुरे या सरपंचपदी विराजमान झाल्या.

राजपुरी गावाला भेट देऊन ‘लोकमत’ने ग्रामस्थांसह नूतन सरपंच शीतल राजपुरे यांच्याशीही संवाद साधला. त्यावेळी या अंधश्रद्धेमागील गोष्टीचा उलगडा झाला. सरपंच म्हणून काम केलेल्या व्यक्तींचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. यातील एकाचा सरपंचपदावर असताना मृत्यू झाला आहे. गेले तब्बल ४ टर्म सरपंचपद रिक्त होते. या काळात गावचे तत्कालीन उपसरपंचच गावाचा कारभार पहात. यावेळी निवडणुकीनंतर महिला आरक्षणामुळे शीतल राजपुरे यांना संधी मिळाली आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली.

योगायोगामुळे काही गोष्टी घडल्या. त्यामुळे कोणी गैरसमजातून अफवा पसरवली असावी. तथापि, असं काहीही नसल्याचे ग्रामस्थ गंगाधर राजपुरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, तर पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि सलग सरपंचपद रिक्त राहणे या दोन गोष्टींचा कोणी रिकामटेकड्याने विनाकारण संबंध जोडून वावड्या उठवल्या. त्यामुळे ही अफवा माध्यमांपर्यंत पोहोचली. प्रत्यक्षात गावात असं काही मानलं जात नाही, असे बाळू भिकू राजपुरे व इतर काही ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

चौकट . . .

कृपया गावची बदनामी नको!

गावात चेष्टेतून सुरू झालेला हा विषय माध्यमांपर्यंत पोहोचला. गावात श्रद्धा जोपासणारे ग्रामस्थ आहेत, पण मृत्यू होईल म्हणून सरपंचपद रिक्त ठेवण्याची मानसिकता ग्रामस्थांची नाही. माध्यम प्रतिनिधींना ग्रामस्थांनी याबाबत सविस्तराने माहिती दिली, पण तरीही माध्यमांतून याचा विपर्यास झाला. याबाबत गावाबाहेर राहणाऱ्या अनेकांनी गाव कारभाऱ्यांना सुनावलेही. निव्वळ तांत्रिक बाबींमुळे सरपंचपद रिक्त राहिले, त्याचा कोणत्याही अंधश्रद्धेशी संबंध नाही, असं गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

कोट :

मी आस्तिक आहे, पण सरपंचपद स्वीकारल्यानंतर काही वाईट घडते, हे मला मान्य नाही. माझ्या कुटुंबातही कोणी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. त्यामुळे सरपंचपदाची संधी मिळाली त्यावेळी व आजही मी मोकळेपणाने काम करत आहे. अफवा किंवा अंधश्रद्धेचा गावावर मागमूसही नाही.

- शीतल विश्वास राजपुरे,

सरपंच राजपुरी, महाबळेश्वर

चौकट :

पद रिक्त राहण्याची हकीकत!

ग्रामपंचायतीच्या ४ पंचवार्षिक निवडणुकांत सरपंच पदासाठी आरक्षण पडले. या चारही वेळा त्या आरक्षणासाठी पात्र उमेदवार सदस्यांमध्ये नव्हता. त्यामुळेच सरपंचपद रिक्त राहिल्याचे राजपुरीचे माजी उपसरपंच व विद्यमान पोलीसपाटील अजय शंकर राजपुरे यांनी सांगितले. ‘ज्यांचा मृत्यू झाला तो वार्धक्य अथवा आजारपणामुळे झाला आहे. मृत्यूच्या दुर्दैवी घटनेचा आणि सरपंचपदाचा अर्थाअर्थी संबंध नाही. या केवळ वावड्या उठवल्या गेल्या,’ असेही राजपुरे यांनी स्पष्ट केले.