शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

Lok Sabha Election 2019 खासदारांना चिठ्ठी लिहून देणारा कोणी मिळाला नसावा: नरेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:54 IST

सातारा : ‘साताऱ्याच्या खासदारांना २३ प्रश्न विचारले होते, एकाचेही उत्तर अद्यापही मिळालेले नाही. १० वर्षे खासदार राहिलेल्यांना चिठ्ठी लिहून ...

सातारा : ‘साताऱ्याच्या खासदारांना २३ प्रश्न विचारले होते, एकाचेही उत्तर अद्यापही मिळालेले नाही. १० वर्षे खासदार राहिलेल्यांना चिठ्ठी लिहून देणारा कोणी मिळाला नसावा, असे वाटते. यावरून ते किती कार्यक्षम आहेत, हेही दिसत असून, लोकांशी निगडित प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत,’ असा घणाघाती हल्ला शिवसेनेचे उमेदवर नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंवर नाव न घेता पुन्हा एकदा केला.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक विजय काटवटे, धनंजय जांभळे आदी उपस्थित होते.शिवसेनेचे उमेदवार पाटील म्हणाले, ‘छत्रपती म्हणून साताºयाच्या खासदारांना विरोध नाही; पण ते योग्य लोकप्रतिनिधी नाहीत. तर खासदारांच्या जवळचीच माणसे उमेदवाराला पळवून नेतात. हे काय योग्य नाही. आज खासदारांकडूनच अपमानित झालेले लोकही त्यांच्याच जवळ आहेत. त्या लोकांनाही हे कसे पटते समजत नाही. सातारा नगरपरिषदेत तर सर्व गोंधळाचाच कारभार सुरू आहे. खासदारांनी निवडणुकीसाठी कार्यालय घेतलंय. त्याचा कर भरला नसल्याचं समोर आलं आहे. मुख्याधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा. पालिकेतील अंधाधुंद कारभाराचा मुख्यमंत्र्यांच्या सभेत चांगलाच समाचार घेतला जाणार आहे.’ खासदारांच्या माणसांच्या माध्यमातून पोलिसांवरही दबाव आणला जात आहे, असा आरोप करून पाटील पुढे म्हणाले, ‘राज ठाकरेंनी साताºयात सभा घेतली. त्यावेळी त्यांच्या भाषणात मोदी द्वेषच होता. येथील उमेदवाराबद्दल ते काहीच बोलले नाहीत. ठाकरे हे चांगले व्यंगचित्रकार आहेत. त्यांनी इथल्या उमेदवाराबद्दल बोलले असते तर चांगले झाले असते.’माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचाही आशीर्वाद घेतला आणि त्यांनीही मला दिला. या निवडणुकीत कोण-कोण पाठीशी आहे, हे सांगणे आता बरोबर नाही, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.मिशीपेक्षा दाढी चांगली...पत्रकार परिषदेत आमचं ठरलंय अन् मिशी व कॉलरबद्दल नरेंद्र पाटील यांना बोलतं केलं. त्यावेळी पाटील यांनी कॉलर का मिशी चांगली तुम्हीच ठरवा. मर्दाची शान ही मिशी असते. दाढी ठेवणं हे तर अधिकच चांगलं असतं, असंही सांगितले. यावर उपस्थित राजकीय पदाधिकाºयांबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याच नावाने चर्चा सुरू झाली अन् हा एक डिवचण्याचाच प्रकार होता, असंही समोर आलं.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक