शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

पाणी अडविण्याची हिंंमत रामराजेंमध्ये नाही

By admin | Updated: May 17, 2017 23:13 IST

पाणी अडविण्याची हिंंमत रामराजेंमध्ये नाही

लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा : ‘नीरा-देवघर धरणाचे पाणी यापूर्वीच वीर धरणात सोडले गेले आहे. वीर धरणाच्या कालव्याद्वारे ते केवळ बारामतीला पळवले जात आहे. आठ दिवसांपूर्वी नीरा-देवघरचे पाणी वाघोशीपर्यंत आणल्याचा डांगोरा पिटला गेला. मात्र, हे पाणी शेतकऱ्यांसाठी नव्हे तर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सोडले गेले होते. वास्तविक, नीरा-देवघरच्या पाण्याची आग्रही मागणी आमदार मकरंद पाटील व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर करू शकत नाहीत. कारण, हे पाणी ज्यांना चाललंय त्यांना अडविण्याची हिंमत यांच्यात नाही,’ असा घणाघात जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड . बाळासाहेब बागवान यांनी केला.खंडाळा येथील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘रामराजेंनी पाण्याबाबत खंडाळकरांचा विश्वासघात केला आहे. नीरा-देवघरचे पाणी तातडीने खंडाळा तालुक्यातील शेतीसाठी सोडावे अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन उभारणार आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘नीरा-देवघरचे पाणी मार्च २०१६ पर्यंत कामे पूर्ण करून पोहोचवावे, असा न्यायालयाचा आदेश राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाला होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पाणी देणे बंधनकारक असल्याने पाणी सोडण्यात आले.मात्र, त्यात पाणी पूजनासाठी श्रेयवाद उफाळला. आमदारांनी पाणी पूजन केले तेव्हा तर कालव्याचे पाणीही बंद झाले होते. वाजतगाजत पाणी आल्याचा डांगोरा पिटून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकली जात आहे.’ यामुळे खरच शेतीला पाणी मिळाले का? याचा विचार करणे गरजेचे आहे. पाणी आणलं म्हणता मग चालू का ठेवले नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तर आमदार हे श्रेय घेण्यासाठीच पाणी पूजनाला आले होते, अशी टीका शामराव धायगुडे यांनी केली.सध्या खंडाळा तालुक्यात शेतीला पाणी नाही. जनावरांना आणि पिण्याच्या पाण्याचीही टंचाई अनेक गावांतून आहे. असे असताना न्यायालयात पाण्यासाठी आमचे प्रयत्न पूर्ण ताकदीने सुरू आहेत हे दाखविण्यासाठी केलेलं नाटक आहे. त्यामुळे जनतेने सावध राहावे. नीरा-देवघर प्रकल्पात विस्थापित होणाऱ्या कुटुंबांना आणण्यासाठी रामराजेच मुराळी होते. मात्र, त्यांना मूलभूत सुविधा पुरविताना त्यावेळी जलसंपदा मंत्री असतानाही वाऱ्यावर सोडले. पुनर्वसित लोकांच्या जमिनींना पाणी देण्याची जबाबदारी सरकारची नाही, असेही यांनीच स्पष्ट केल्याचे सांगितले. नीरा-देवघरचे एक टीएमसी पाणी उपसा करून धोम-बलकवडी कालव्याद्वारे फलटण माळशिरसला नेण्याचा घाट सरकार दरबारी घातला जात आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील जनतेची फसवणूक केली जात असल्याचे सांगून नीरा-देवघरचे पाणी सोडावे, अशी मागणीही त्यांनी केली. पाणी न मिळाल्यास मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे स्पष्ट केले. पत्रकार परिषदेस माजी सभापती एस. वाय. पवार, शामराव धायगुडे, अशोक डोईफोडे उपस्थित होते.