शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
3
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
4
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
5
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
6
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
7
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
8
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
9
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
10
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
11
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
12
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
13
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
14
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
15
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
16
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
17
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
18
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
19
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
20
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...

खासदार निधी वापरण्याची माहितीच नाही; नरेंद्र पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:42 IST

कºहाड : ‘लोकसभा मतदार संघात खासदार अनेक माध्यमातून विकासकामे करू शकतो. परंतु साताऱ्याच्या विद्यमान खासदारांना खासदार निधी कसा वापरायचा, ...

कºहाड : ‘लोकसभा मतदार संघात खासदार अनेक माध्यमातून विकासकामे करू शकतो. परंतु साताऱ्याच्या विद्यमान खासदारांना खासदार निधी कसा वापरायचा, याचीही माहिती नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत जिल्ह्याचा विकास रोखणारा खासदार बदलण्याची वेळ आली आहे,’ अशी टीका शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली.पाटील यांनी गुरुवारी जावळी तालुक्यातील २६ गावांचा प्रचार दौरा पूर्ण केला. त्यावेळी त्यांनी गावोगावी जाऊन आपल्या उमेदवारीमागील भूमिका स्पष्ट केली.नरेंद्र पाटील म्हणाले, ‘सर्वसामान्य मतदारही आता टीव्ही, फोनच्या माध्यमातून आपल्या लोकप्रतिनिधीला पाहत असतात. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने जागरुकपणे आपल्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. साताऱ्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी दहा वर्षांत काहीही कामे केली नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा पाच वर्षे संधी द्यायची का? याचा मतदारांनी फेरविचार करावा. मूलभूत सुविधांच्या अभावी आज तुमची मुले कधी तरी गावी येत असतात. परंतु तुम्ही निष्क्रिय लोकप्रतिनिधी निवडून देणे न थांबवल्यास तुमची नातवंडे या ठिकाणी कधीच येणार नाहीत.’ते पुढे म्हणाले की, ‘१९९५ मध्ये जावळीचा आमदार शिवसेनेचा होता तर १९९६ मध्ये सातारा लोकसभेचा खासदार शिवसेनेचा होता. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात वाहत असणाºया परिवर्तनाच्या वाºयातही जावळीला महत्त्वाची भूमिका निभावायची आहे. मी ही एक माथाडी असल्यामुळे माथाडींच्या समस्या मला माहिती आहेत. दिवंगत अण्णासाहेब पाटील यांना नेहमीच जावळी खोºयाने साथ दिली होती. त्यामुळे त्यांच्या वारसाला लोकसभेवर लोकप्रतिनिधी म्हणून पाठवण्यासाठी माथाडी मोलाचे योगदान देतील, यात शंकाच नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने जावळी विभागातील धरणांची काम पूर्ण न केल्यामुळे शेतीस पाणी पोहोचू शकत नाही. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची कामेही अपुरी ठेवण्यात आली होती. त्यामुळे येथील बळीराजा अडचणीत आला आहे.’ेत्यांना दुसºया कामांसाठी वेळच नाही...विद्यमान खासदार मतदार संघातील बहुतेक गावांमध्ये मत मागण्यासाठीही पोहोचत नाहीत. त्यांना सातारा शहर, टोलनाके, एमआयडीसीमधील उद्योजकांना अडचणीत आणणे यातून दुसºया कामांसाठी वेळच मिळत नाही. मागण्यांचे निवेदन देताना माझी कोणाला भीतीही वाटणार नाही, अशा शब्दांत नरेंद्र पाटील यांनी जोरदार टीका केली.