शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

खासदार निधी वापरण्याची माहितीच नाही; नरेंद्र पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:42 IST

कºहाड : ‘लोकसभा मतदार संघात खासदार अनेक माध्यमातून विकासकामे करू शकतो. परंतु साताऱ्याच्या विद्यमान खासदारांना खासदार निधी कसा वापरायचा, ...

कºहाड : ‘लोकसभा मतदार संघात खासदार अनेक माध्यमातून विकासकामे करू शकतो. परंतु साताऱ्याच्या विद्यमान खासदारांना खासदार निधी कसा वापरायचा, याचीही माहिती नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत जिल्ह्याचा विकास रोखणारा खासदार बदलण्याची वेळ आली आहे,’ अशी टीका शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली.पाटील यांनी गुरुवारी जावळी तालुक्यातील २६ गावांचा प्रचार दौरा पूर्ण केला. त्यावेळी त्यांनी गावोगावी जाऊन आपल्या उमेदवारीमागील भूमिका स्पष्ट केली.नरेंद्र पाटील म्हणाले, ‘सर्वसामान्य मतदारही आता टीव्ही, फोनच्या माध्यमातून आपल्या लोकप्रतिनिधीला पाहत असतात. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने जागरुकपणे आपल्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. साताऱ्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी दहा वर्षांत काहीही कामे केली नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा पाच वर्षे संधी द्यायची का? याचा मतदारांनी फेरविचार करावा. मूलभूत सुविधांच्या अभावी आज तुमची मुले कधी तरी गावी येत असतात. परंतु तुम्ही निष्क्रिय लोकप्रतिनिधी निवडून देणे न थांबवल्यास तुमची नातवंडे या ठिकाणी कधीच येणार नाहीत.’ते पुढे म्हणाले की, ‘१९९५ मध्ये जावळीचा आमदार शिवसेनेचा होता तर १९९६ मध्ये सातारा लोकसभेचा खासदार शिवसेनेचा होता. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात वाहत असणाºया परिवर्तनाच्या वाºयातही जावळीला महत्त्वाची भूमिका निभावायची आहे. मी ही एक माथाडी असल्यामुळे माथाडींच्या समस्या मला माहिती आहेत. दिवंगत अण्णासाहेब पाटील यांना नेहमीच जावळी खोºयाने साथ दिली होती. त्यामुळे त्यांच्या वारसाला लोकसभेवर लोकप्रतिनिधी म्हणून पाठवण्यासाठी माथाडी मोलाचे योगदान देतील, यात शंकाच नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने जावळी विभागातील धरणांची काम पूर्ण न केल्यामुळे शेतीस पाणी पोहोचू शकत नाही. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची कामेही अपुरी ठेवण्यात आली होती. त्यामुळे येथील बळीराजा अडचणीत आला आहे.’ेत्यांना दुसºया कामांसाठी वेळच नाही...विद्यमान खासदार मतदार संघातील बहुतेक गावांमध्ये मत मागण्यासाठीही पोहोचत नाहीत. त्यांना सातारा शहर, टोलनाके, एमआयडीसीमधील उद्योजकांना अडचणीत आणणे यातून दुसºया कामांसाठी वेळच मिळत नाही. मागण्यांचे निवेदन देताना माझी कोणाला भीतीही वाटणार नाही, अशा शब्दांत नरेंद्र पाटील यांनी जोरदार टीका केली.