शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खासदार निधी वापरण्याची माहितीच नाही; नरेंद्र पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 22:42 IST

कºहाड : ‘लोकसभा मतदार संघात खासदार अनेक माध्यमातून विकासकामे करू शकतो. परंतु साताऱ्याच्या विद्यमान खासदारांना खासदार निधी कसा वापरायचा, ...

कºहाड : ‘लोकसभा मतदार संघात खासदार अनेक माध्यमातून विकासकामे करू शकतो. परंतु साताऱ्याच्या विद्यमान खासदारांना खासदार निधी कसा वापरायचा, याचीही माहिती नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत जिल्ह्याचा विकास रोखणारा खासदार बदलण्याची वेळ आली आहे,’ अशी टीका शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली.पाटील यांनी गुरुवारी जावळी तालुक्यातील २६ गावांचा प्रचार दौरा पूर्ण केला. त्यावेळी त्यांनी गावोगावी जाऊन आपल्या उमेदवारीमागील भूमिका स्पष्ट केली.नरेंद्र पाटील म्हणाले, ‘सर्वसामान्य मतदारही आता टीव्ही, फोनच्या माध्यमातून आपल्या लोकप्रतिनिधीला पाहत असतात. त्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधीने जागरुकपणे आपल्या मतदारांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. साताऱ्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी दहा वर्षांत काहीही कामे केली नाहीत. त्यामुळे त्यांना पुन्हा पाच वर्षे संधी द्यायची का? याचा मतदारांनी फेरविचार करावा. मूलभूत सुविधांच्या अभावी आज तुमची मुले कधी तरी गावी येत असतात. परंतु तुम्ही निष्क्रिय लोकप्रतिनिधी निवडून देणे न थांबवल्यास तुमची नातवंडे या ठिकाणी कधीच येणार नाहीत.’ते पुढे म्हणाले की, ‘१९९५ मध्ये जावळीचा आमदार शिवसेनेचा होता तर १९९६ मध्ये सातारा लोकसभेचा खासदार शिवसेनेचा होता. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात वाहत असणाºया परिवर्तनाच्या वाºयातही जावळीला महत्त्वाची भूमिका निभावायची आहे. मी ही एक माथाडी असल्यामुळे माथाडींच्या समस्या मला माहिती आहेत. दिवंगत अण्णासाहेब पाटील यांना नेहमीच जावळी खोºयाने साथ दिली होती. त्यामुळे त्यांच्या वारसाला लोकसभेवर लोकप्रतिनिधी म्हणून पाठवण्यासाठी माथाडी मोलाचे योगदान देतील, यात शंकाच नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने जावळी विभागातील धरणांची काम पूर्ण न केल्यामुळे शेतीस पाणी पोहोचू शकत नाही. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची कामेही अपुरी ठेवण्यात आली होती. त्यामुळे येथील बळीराजा अडचणीत आला आहे.’ेत्यांना दुसºया कामांसाठी वेळच नाही...विद्यमान खासदार मतदार संघातील बहुतेक गावांमध्ये मत मागण्यासाठीही पोहोचत नाहीत. त्यांना सातारा शहर, टोलनाके, एमआयडीसीमधील उद्योजकांना अडचणीत आणणे यातून दुसºया कामांसाठी वेळच मिळत नाही. मागण्यांचे निवेदन देताना माझी कोणाला भीतीही वाटणार नाही, अशा शब्दांत नरेंद्र पाटील यांनी जोरदार टीका केली.