शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

माण-खटावची बारामती झालीच नाही

By admin | Updated: August 31, 2015 21:02 IST

येळगावकर : शरद पवारांनी दाखविलेलं स्वप्न फोल ठरल्याची टीका

सातारा : शरद पवार हे माढाचे खासदार झाल्यानंतर त्यांनी माण-खटावला बारामती बनविण्याचं दाखविलेलं स्वप्न फोल ठरल्याची टीका माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केली. त्यांच्या नेतृत्वामुळे दुष्काळी जनता स्वप्नात रमली. तरुणपणात जे जमलं नाही, ते आता उतारवयात करण्याची बुद्धी त्यांना सुचली आहे,’ असा घणाघातही त्यांनी केला. ‘ते शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करत असल्याने आम्ही त्यांचे स्वागत करतो,’ अशी टिप्पणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांवरही जोरदार शरसंधान साधले. ‘सातारा जिल्ह्याच्या वाटणीचे पाणी इतर जिल्ह्यांत पळविले जात असताना जिल्ह्यातील एकाही आमदाराला विरोध करण्याची बुद्धी सुचलेली नाही. आता त्यांच्या नेत्यांच्या मोर्चाला गर्दी जमेना म्हणून उतारवयात खुद्द शरद पवारांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. खटाव-माण तालुक्यांत भयान परिस्थिती असतानाही सांगलीला पाणी पळविण्याचा डाव काहीनी आखला होता. उरमोडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये वर्गणी भरली असूनही त्यांना पाणी मिळत नाही.’ राष्ट्रवादी व काँगे्रस या दोन्ही पक्षांकडे सत्ता सलग १५ वर्षे होती, त्यांना जिल्ह्याचा पाणीप्रश्न सोडविता आला नाही. टेंभू बैठक कऱ्हाडमध्ये सुरू असताना जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एकही आमदार या बैठकीला हजर राहिला नव्हता, यावरूनच त्यांची पाणी प्रश्नावरील गांभीर्य त्यांना नसल्याचे समोर येते. (प्रतिनिधी)दोन्ही तालुक्यांच्या पूर्व भागावर अन्यायमाण-खटाव तालुक्यांच्या पूर्वभागात कुठल्याही पाणी योजनेचं पाणी मिळालेलं नाही, त्या ठिकाणी टेंभू योजनेचं पाणी नेता आलं असतं. कृष्णा नदीची उपनदी असणाऱ्या येरळा नदीच्या खोऱ्यात हा भाग येतो, त्यामुळे रिव्हर बेसीननुसार पाणी वाटप करण्याच्या धोरणाला टेंभू योजनेत हरताळ फासण्यात आला. चारा छावण्यांसाठी खडसेंना निवेदनखटाव-माण तालुक्यांत टंचाई जाहीर करून चारा छावणी सुरू करावी, अशी मागणी महसूल, मदत पुनर्वसन व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले. त्यानंतर खडसेंनी स्वत: या विभागाच्या उपसचिवांना सातारा जिल्ह्यातील टंचाईच्या स्थितीचा अहवाल मागविला. ते स्वत: जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत बोलल्याचे येळगावकर म्हणाले. पाणी पळविण्याचा डाव केबिनमधून!कृष्णा खोरे नियामक मंडळाची बैठक चक्क माजी मंत्री पतंगराव कदमांच्या केबिनमध्ये सुरू होती. या बैठकीत आपण स्वत: गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याचे येळगावकर म्हणाले. या बैठकीतून उरमोडीचे पाणी सांगलीकडे पळविण्याचा डाव आखला जात होता. पिण्यासाठी पाणी नेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले; पण पिण्याच्या पाण्यासाठी ४० किलोमीटरचा कॅनॉल कशासाठी खोदला जात आहे?, असा सवाल या बैठकीत आपण उपस्थित केल्याचे येळगावकर म्हणाले.