शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

...तर ‘सह्याद्री’विरोधात रस्त्यावर उतरु

By admin | Updated: June 10, 2014 02:15 IST

धैर्यशील कदम : दुसरा हप्ता ५०० रुपयाने देण्याची मागणी

कऱ्हाड : साखरेचे वाढलेले दर, कारखान्यावर नसलेले कोणतेही भांडवली कर्ज, केंद्र सरकारने दिलेली बिनव्याजी रक्कम या पार्श्वभूमीवर सह्याद्रि साखर कारखान्याने उसाचा दुसरा ५०० रुपयांनी शेतकरी सभासदांना द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कऱ्हाड उत्तरचे युवा नेते धैर्यशील कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. पत्रकात म्हटले आहे की, सध्या साखरेचे दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत गेले आहेत. सह्याद्रि कारखान्याने अंदाजे १४ लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी उतारा १२ टक्के एवढा धरल्यास एक टन ऊसापासून १२०० किलो साखर तयार होते. सध्याचा साखरेचा दर ३१०० रुपये प्रति क्विंटल लक्षात घेता एक टन ऊसापासून ३७५० रुपयांची साखर तयार होते. तोडणी व वाहतूक असा सर्व खर्च ८०० रुपये प्रति टन धरला तर शेतकऱ्यांना २९२० रुपये प्रतिटन मिळायला हवेत. सह्याद्रि कारखाना मद्यविक्री, बगॅस विक्री व अल्कोहोलचीही विक्री करतो या सर्व उपपदार्थाच्या विक्रीतील नफा लक्षात घेतला तर चालु हंगामात सह्याद्रिने ३५०० रुपयांचा अंतिम दर द्यावा. तसेच ५०० रुपयांनी दुसरा हप्ता सभासद शेतकऱ्यांना द्यावा, अशी आमची मागणी आहे. याशिवाय केंद्र सरकारने कारखान्यांना मदत म्हणून प्रतिक्विंटल ३३० रुपये बिनव्याजी दिले आहेत. त्यामुळे साखर साठवणुकीत ३०० रुपये व्याजाची बचत झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुसरा हप्ता ५०० रुपयांनी देणे कारखान्याला जड नाही. कारखाना नेतृत्वाने इथल्या सभासद शेतकऱ्यांचे हित जपावे. इतर कारखान्यांच्या दराची तुलना त्यांनी करु नये. गेल्या वेळी एका नेत्याच्या दबावाला पडून त्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान केले होते. शेतकऱ्यांनी स्वकष्टाने कारखाना उर्जितावस्थेत आणला आहे. पदरमोड करुन विस्तारवाढीचे नाहक कर्ज फेडलेले आहे. त्यामुळेच आज कारखाना कर्जमुक्त झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता ५०० रुपये मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा तो हक्क आहे. आमची मागण मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यांनी दिला. (प्रतिनिधी)