शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
4
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
5
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
6
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
7
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
8
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
9
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
10
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
12
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
13
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
14
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
15
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
16
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
17
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
18
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
19
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
20
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

...तर ‘सह्याद्री’विरोधात रस्त्यावर उतरु

By admin | Updated: June 10, 2014 02:15 IST

धैर्यशील कदम : दुसरा हप्ता ५०० रुपयाने देण्याची मागणी

कऱ्हाड : साखरेचे वाढलेले दर, कारखान्यावर नसलेले कोणतेही भांडवली कर्ज, केंद्र सरकारने दिलेली बिनव्याजी रक्कम या पार्श्वभूमीवर सह्याद्रि साखर कारखान्याने उसाचा दुसरा ५०० रुपयांनी शेतकरी सभासदांना द्यावा. अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा कऱ्हाड उत्तरचे युवा नेते धैर्यशील कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. पत्रकात म्हटले आहे की, सध्या साखरेचे दर ३१०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत गेले आहेत. सह्याद्रि कारखान्याने अंदाजे १४ लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. सरासरी उतारा १२ टक्के एवढा धरल्यास एक टन ऊसापासून १२०० किलो साखर तयार होते. सध्याचा साखरेचा दर ३१०० रुपये प्रति क्विंटल लक्षात घेता एक टन ऊसापासून ३७५० रुपयांची साखर तयार होते. तोडणी व वाहतूक असा सर्व खर्च ८०० रुपये प्रति टन धरला तर शेतकऱ्यांना २९२० रुपये प्रतिटन मिळायला हवेत. सह्याद्रि कारखाना मद्यविक्री, बगॅस विक्री व अल्कोहोलचीही विक्री करतो या सर्व उपपदार्थाच्या विक्रीतील नफा लक्षात घेतला तर चालु हंगामात सह्याद्रिने ३५०० रुपयांचा अंतिम दर द्यावा. तसेच ५०० रुपयांनी दुसरा हप्ता सभासद शेतकऱ्यांना द्यावा, अशी आमची मागणी आहे. याशिवाय केंद्र सरकारने कारखान्यांना मदत म्हणून प्रतिक्विंटल ३३० रुपये बिनव्याजी दिले आहेत. त्यामुळे साखर साठवणुकीत ३०० रुपये व्याजाची बचत झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुसरा हप्ता ५०० रुपयांनी देणे कारखान्याला जड नाही. कारखाना नेतृत्वाने इथल्या सभासद शेतकऱ्यांचे हित जपावे. इतर कारखान्यांच्या दराची तुलना त्यांनी करु नये. गेल्या वेळी एका नेत्याच्या दबावाला पडून त्यांनी शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान केले होते. शेतकऱ्यांनी स्वकष्टाने कारखाना उर्जितावस्थेत आणला आहे. पदरमोड करुन विस्तारवाढीचे नाहक कर्ज फेडलेले आहे. त्यामुळेच आज कारखाना कर्जमुक्त झाला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना दुसरा हप्ता ५०० रुपये मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांचा तो हक्क आहे. आमची मागण मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडू असा इशारा यांनी दिला. (प्रतिनिधी)