शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

यशवंतराव चव्हाण यांच्यापासून परंपरा : बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण अन् एकनाथ शिंदे यांनाही मान

By नितीन काळेल | Updated: June 15, 2025 14:48 IST

सातारा जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. तसेच जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातही अग्रेसर राहिलाय.

नितीन काळेल

सातारा जिल्ह्याने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले. तसेच जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणातही अग्रेसर राहिलाय. त्यामुळे जिल्ह्याने राज्याला आतापर्यंत एक-दोन नाही तर चार मुख्यमंत्री दिले आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू झालेली परंपरा बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण ते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली आहे.

सातारा जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० ला झाली. या दिवसापासून ते १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत मुख्यमंत्रिपदी होते. चव्हाण हे कऱ्हाड विधानसभा मतदारसंघातून निवडून येत होते. त्यावेळी चीनने भारतावर आक्रमण केले होते. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवून घेतले. त्यामुळे हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे वर्णन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय राजकारणात गेले तरी त्यांची महाराष्ट्रावर पकड होती. तर बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्यामुळे सातारा जिल्ह्याला दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले. जानेवारी १९८२ मध्ये बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे काही कारणाने मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. तेव्हा पक्षाने बाबासाहेब भोसले यांना संधी दिली. भोसले हे मुंबईतील त्यावेळच्या नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. पण, त्यांना अल्पकाळ मुख्यमंत्रिपदी राहता आले. २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ असा त्यांचा कार्यकाल राहिला. बाबासाहेब भोसले हे मुळेच खटाव तालुक्यातील कलेढोण गावचे.

२००९ मध्ये राज्यात आघाडी सरकार सत्तेवर होते. त्यावेळी काही कारणाने मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे कऱ्हाडच्या पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने मुख्यमंत्रीपद दिले. चव्हाण हे विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्यही नव्हते. नंतर ते विधान परिषदेत निवडून गेले. चव्हाण हे महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री ठरले. तर १० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४ असा त्यांचा कार्यकाल राहिला. चव्हाण हे सातारा जिल्ह्याचे तिसरे मुख्यमंत्री ठरले. तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत उठाव झाला. एकनाथ शिंदे भाजपबरोबर जाऊन मुख्यमंत्री झाले. जवळपास अडीच वर्षे ते मुख्यमंत्रिपदी राहिले. ते ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. पण, ते मूळचे महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब गावचे आहेत. ते गावाला नेहमीच येतात. एकनाथ शिंदे यांच्यामुळे सातारा जिल्ह्याला चाैथ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले आहे.

तिघे काँग्रेसचे; एक सेनेचा, पण पूर्ण वेळ नाही...

सातारा जिल्ह्याने चार मुख्यमंत्री राज्याला दिले. यातील तिघे राष्ट्रीय काँग्रेसचे होते. तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. पण, या चाैघांनाही पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळालेले नाही.

शरद पवारही सातारा जिल्ह्यातील...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीचे. त्यांनीही चार वेळा मुख्यमंत्रीपद मिळवले. पण, पवार हे मूळचे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या नांदवळ गावचे. यामुळे सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मुख्यमंत्री मिळाले, असेच म्हणावे लागेल.