शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

Phaltan Doctor Death: शूरांच्या साताऱ्यातील लोकप्रतिनिधींचे ‘मौन’; संवेदनशीलतेपेक्षा राजकारण झाले महत्त्वाचे

By सचिन काकडे | Updated: November 3, 2025 16:25 IST

चिखलफेक करण्यात रस

सचिन काकडेसातारा : फलटण येथे घडलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या निंदनीय घटनेने अवघे समाजमन हेलावले आहे. तरीही या गंभीर विषयावर साताऱ्यातील लोकप्रतिनिधींनी बाळगलेले मौन अत्यंत धक्कादायक आहे. हे मौन पाहून शूरांच्या जिल्ह्यात संवेदनशीलता हरवली आहे की, त्यांना फक्त राजकारणच महत्त्वाचे वाटते, असा संतप्त प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ माजली. या गंभीर आणि क्लेशकारक घटनेची दखल घेत विविध सामाजिक संस्था आणि संघटना आक्रमक झाल्या. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मंत्रालयाबाहेर आंदोलने झाली, पीडित महिलेच्या गावात निषेध मोर्चे निघाले. राज्यभरातील राजकीय व्यक्तींनीही या घटनेचा तीव्र निषेध करत दुःख व्यक्त केले.या सगळ्या घडामोडींमध्ये एक अत्यंत खटकणारी बाब समोर आली आहे, ती म्हणजे सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे मौन. खासदार उदयनराजे भोसले यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना हा विषय गांभीर्याचा वाटत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया तर दूरच; पण किमान त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी साधी मागणी करण्याची संवेदनशीलता कोणी दाखवलेली नाही.

चिखलफेक करण्यात रस...विशेष म्हणजे, ज्या फलटण तालुक्यात ही घटना घडली, त्याच तालुक्यात मूळ विषयाला बगल देत या विषयाचे गलिच्छ राजकारण सुरू झाले आहे. पीडितेला न्याय मिळण्याऐवजी, लोकप्रतिनिधी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत आणि जुने वाद व वादाची प्रकरणे नव्याने समोर आणली जात आहेत.

नागरिकांनाच पडले प्रश्न?

  • या सर्व घडामोडी पाहता साताऱ्यातील लोकप्रतिनिधींची संवेदनशीलता नेमकी कुठे हरपली आहे?
  • इतक्या संवेदनशील प्रश्नावर व्यक्त न होणे, हे सातारकरांच्या पचनी पडलेले नाही.
  • श्रेयवादासाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे लोकप्रतिनिधी गप्प का आहेत.
  • राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते निष्पक्ष तपासाची मागणी का करीत नाहीत.
English
हिंदी सारांश
Web Title : Phaltan Doctor Death: Satara leaders' silence over tragedy raises questions.

Web Summary : Satara leaders face criticism for their silence on the Phaltan doctor's suicide. Only MP Udayanraje Bhosale spoke up, while others prioritize political squabbles over justice and investigation. Citizens question their lost sensitivity.