शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बनपुरी-पाटीलवाडीत कोरोनाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:40 IST

ढेबेवाडी : कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना, जनतेतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने बनपुरी आणि रुवले या दोन्ही ...

ढेबेवाडी : कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना, जनतेतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने बनपुरी आणि रुवले या दोन्ही गावात तब्बल छत्तीस कोरोना बाधित रुग्ण सापडले. यामुळे प्रशासनासह गावकऱ्यांचीही झोपच उडाली आहे.

दरम्यान, या रुग्णांच्या संपर्कातील मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून कोरोना तपासणीसाठी सहकार्य होत नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

ढेबेवाडी विभागात बहुतेक गावात कोरोनाने शिरकाव केल्याने, आता गावातील कोरोना दक्षता समित्या पूर्ण क्षमतेने कार्यरत होणे गरजेचे आहे. अनेक गावांमध्ये या समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शासनाच्या नियमांची पायमल्ली करत कोरोनाला निमंत्रण देत आहेत.

विभागातील मोठे कार्यक्षेत्र असलेल्या बनपुरी अंतर्गत येणारी कंकवाडी, देसाई वस्ती, चांदेकरवस्ती येथे कोरोनाने थैमान घातले आहे. तीन छोट्या वस्त्यांमध्ये २७ कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्या संपर्कात अनेक जण आले असूनही ते लोक कोरोना चाचणी करण्यासाठी प्रतिसाद देत नाहीत. यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागानेही हात टेकले आहेत. अति संपर्कातील लोकांचे करायचे काय, असे संकट निर्माण झाले आहे.

त्याचबरोबर, रुवले (पाटीलवाडी) येथे छोट्याशा वस्तीत दहा कोरोना रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच वस्तीतील एकाचा चार दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यूही झाला होता. यामुळे आरोग्य विभागाने स्वतंत्र यंत्रणा लावून गावातील लोकांमध्ये जागृती केली.

झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाबरोबरच गावकऱ्यांनीही सामोरे जाण्याची गरज असताना समाजातील काही घटकांचा अपेक्षित प्रतिसादच मिळत नसल्याने, कोरोनाचा भडका उडण्याची भीती काही आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली.

चाकरमान्यांचा लोंढा गावाकडे...

या विभागातील गावागावातील घरटी एक-दोन कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबई पुण्यासह इतर शहरामध्ये वास्तव्यास असतात. आता लॉकडाऊन झाल्याने आणि व्यवसाय बंद झाल्याने अनेकांनी गावाकडे धाव घेतली. त्याच्यातून ही संसर्ग वाढल्याचे बोलले जात आहे.