शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बनपुरी-पाटीलवाडीत कोरोनाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:40 IST

ढेबेवाडी : कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना, जनतेतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने बनपुरी आणि रुवले या दोन्ही ...

ढेबेवाडी : कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असताना, जनतेतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने बनपुरी आणि रुवले या दोन्ही गावात तब्बल छत्तीस कोरोना बाधित रुग्ण सापडले. यामुळे प्रशासनासह गावकऱ्यांचीही झोपच उडाली आहे.

दरम्यान, या रुग्णांच्या संपर्कातील मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून कोरोना तपासणीसाठी सहकार्य होत नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती आरोग्य विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

ढेबेवाडी विभागात बहुतेक गावात कोरोनाने शिरकाव केल्याने, आता गावातील कोरोना दक्षता समित्या पूर्ण क्षमतेने कार्यरत होणे गरजेचे आहे. अनेक गावांमध्ये या समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, शासनाच्या नियमांची पायमल्ली करत कोरोनाला निमंत्रण देत आहेत.

विभागातील मोठे कार्यक्षेत्र असलेल्या बनपुरी अंतर्गत येणारी कंकवाडी, देसाई वस्ती, चांदेकरवस्ती येथे कोरोनाने थैमान घातले आहे. तीन छोट्या वस्त्यांमध्ये २७ कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्या संपर्कात अनेक जण आले असूनही ते लोक कोरोना चाचणी करण्यासाठी प्रतिसाद देत नाहीत. यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागानेही हात टेकले आहेत. अति संपर्कातील लोकांचे करायचे काय, असे संकट निर्माण झाले आहे.

त्याचबरोबर, रुवले (पाटीलवाडी) येथे छोट्याशा वस्तीत दहा कोरोना रुग्ण सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच वस्तीतील एकाचा चार दिवसांपूर्वी कोरोनाने मृत्यूही झाला होता. यामुळे आरोग्य विभागाने स्वतंत्र यंत्रणा लावून गावातील लोकांमध्ये जागृती केली.

झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाबरोबरच गावकऱ्यांनीही सामोरे जाण्याची गरज असताना समाजातील काही घटकांचा अपेक्षित प्रतिसादच मिळत नसल्याने, कोरोनाचा भडका उडण्याची भीती काही आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली.

चाकरमान्यांचा लोंढा गावाकडे...

या विभागातील गावागावातील घरटी एक-दोन कुटुंब उदरनिर्वाहासाठी मुंबई पुण्यासह इतर शहरामध्ये वास्तव्यास असतात. आता लॉकडाऊन झाल्याने आणि व्यवसाय बंद झाल्याने अनेकांनी गावाकडे धाव घेतली. त्याच्यातून ही संसर्ग वाढल्याचे बोलले जात आहे.