शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

लॉकडाऊनमुळे पाठ्यपुस्तके अद्यापही विद्यार्थ्यांकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मागील शैक्षणिक वर्षात सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात येणार आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मागील शैक्षणिक वर्षात सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात येणार आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये शाळाच बंद असल्यामुळे आणि परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झाल्याने ही पाठ्यपुस्तके अद्याप विद्यार्थ्यांकडेच आहेत. दरम्यान, १५ जूननंतरही ही पुस्तके शाळा जमा करून घेऊ शकेल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली आहे.

पर्यावरणाच्या दृष्टीने तसेच खर्च वाचविण्याच्या विचाराने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पुस्तकांची छपाई यंदा कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या शैक्षणिक वर्षात सुस्थितीत असलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांना संच पुन्हा घेण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, लॉकडाऊन आणि शाळा बंद असल्यामुळे पालकांना पुस्तकं देणं आणि शिक्षकांना घेणं शक्य होत नसल्याने हे संच अद्याप जमा करून घेतले गेले नाहीत.

शासकीय व अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी मे महिन्यात पुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदणी केली जाते. गेल्या वर्षी शाळा सुरू झाल्या नाहीत, तरीही जून व जुलै महिन्यातच विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पुरविण्यात आली होती. ती पुस्तके सुस्थितीत असतील, असे गृहित धरून यंदा सुस्थितील पुस्तके पुनर्वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षी निकाल लागण्याच्या दिवशी किंवा शाळेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून पुस्तके परत घेतली जातात. यंदा मात्र शाळा बंद होत्या. परिणामी पुस्तके शाळांमध्ये परत आली नाहीत. शिक्षकांनी घरोघरी जाऊन पुस्तके वाटप केली तसेच पुस्तकेही परत घेण्यासाठी गेले तरीही कोरोनामुळे ते शक्य होईल, याबाबत शंका आहे.

कोविडमुळे मागणीत घट होण्याची शक्यता

पुस्तकांची शैक्षणिक वर्षातील मागणी ही त्यांच्या मागील वर्षीच्या एकूण विद्यार्थी संख्येनुसार होत असते. यंदा या मागणीत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाचा पूर्ण अभ्यास ऑनलाईन पध्दतीने झाल्यामुळे पुस्तकांचा किती आणि कसा वापर केला गेला आणि ती सुस्थितीत असतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थी संख्येतही घट होण्याची शक्यता असल्याने मागणीत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पालक म्हणतात...

माझ्या मुलाला दिलेली पुस्तके दुसऱ्या विद्यार्थ्यांच्या उपयोगाला यावीत, त्यांनीही शिक्षण घेऊन गुणवंत व्हावे, यासाठी शाळांनी पुस्तके मागितलेली आहेत. मात्र, कोविड परिस्थिती सगळ्यांनाच माहिती असल्याने पुस्तके परत करण्यासाठी शाळा सुरू होण्याची वाट पाहावी लागेल.

- नितीन शिर्के, पालक

पुस्तके पुनर्वापराच्या पर्यायामुळे पर्यावरणाची हानी रोखली जाणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे यंदा पुस्तकांचा वापर मर्यादितच झाला. त्यामुळे ही पुस्तके सुस्थितीत आहेत. त्यांचा उपयोग अन्य विद्यार्थ्यांना होणं खूप आवश्यक आहे. पण शाळा बंद असल्याने ती परत करता आली नाहीत.

- वैशाली फरांदे, पालक

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोविड काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संच घरपोच केले आहेत. आता ते परत आणणं शक्य नाही. कोविडची परिस्थती लक्षात घेता १५ जूननंतर ही पुस्तके पुन्हा घेणं शक्य आहे. सध्या नवी पुस्तकं नसल्याने विद्यार्थी यावर सरावही करू शकतील.

- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, सातारा

जिल्हा परिषद शाळेत जमा होणारे पाठ्यपुस्तक संच

पहिली : २११९१

दुसरी : २३९६४

तिसरी : २४८५२

चौथी : २५२४७

पाचवी : १२०१३

सहावी : ९८९६

सातवी : ९३८९

आठवी : ७८९

मागील वर्षी संच वाटप : १ लाख २७ हजार ३४१