शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

८० वर्षांनंतर निवळला सातारा तालुक्यातील दोन गावांतील तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 17:25 IST

सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या  जळकेवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यास प्रशासनाला यश आले. या गावाने रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. ८० वर्षांनंतर या गावाला हक्काचा रस्ता मिळणार आहे.

ठळक मुद्देसातारा तहसीलदारांची शिष्टाई जळकेवाडी ग्रामस्थांचे उपोषण मागेरस्त्याबाबत सामोपचाराने निघाला तोडगा

सातारा  , दि. २६ : तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या  जळकेवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यास प्रशासनाला यश आले. या गावाने रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. ८० वर्षांनंतर या गावाला हक्काचा रस्ता मिळणार आहे.

गावात जाण्यासाठी रस्ता खुला करावा, या मागणीसाठी जळकेवाडी (वरची), ता. सातारा येथील ग्रामस्थांनी मंगळवार (दि.२४ आॅक्टोबर) पासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बेमुदत उपोषण सुरू केले होते. धावली फाटा ते जळकेवाडी हा रस्ता ७० ते ८० वर्षांपासून अस्तित्वात आहे. परंतु सध्याच्या रस्त्यावर जुंगटी ग्रामस्थांनी ६ फूट उंचीचा बांध घातला आहे. त्यामुळे रस्ता बंद झाला आहे, असा आरोप जळकेवाडी ग्रामस्थांनी केला होता.

ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम विभाग, तहसीलदार यांना निवेदन दिले होते. त्यानंतरही जुंगटी ग्रामस्थांनी बेकायदा रस्त्यावरील खडी जेसीबीने काढली आहेत. हा रस्ता बंद झाल्याने जळकेवाडी ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता.

रस्त्यावरून या दोन गावांत प्रचंड तणाव होता. जळकेवाडीला जाणारा रस्ता जुंगटी गावच्या हद्दीतून जातो. मात्र, ५०० मीटरच्या अंतरात जुंगटी गावच्या शेतकऱ्यांची शेतजमीन आहे. रस्त्यासाठी जमीन दिली गेल्यास शेताचे दोन तुकडे पडतात, तसेच आधीच कमी शेती क्षेत्र असताना रस्त्यासाठी जमीन दिली गेल्यास अत्यंत तुटपुंजी जमीन कसण्यासाठी राहणार, असे जुंगटी येथील शेतकऱ्यांचे म्हणणे होेते.

साताºयाचे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी याबाबत दोन्ही गावांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये दोन्ही गावांतील लोकांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले. पूर्वी खेडेगावांमध्ये रस्ते दिले गेलेत त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन आनंदाने दिली आहे.

रस्ता नसल्याने अनेक समस्या उभ्या राहतात. एखाद्या व्यक्तीचा अपघात झाल्यास किंवा आपत्कालीन संकट उभे राहिल्यास रस्ता नसेल तर संबंधित गावकऱ्यांनी जायचे कुठून? रस्ता ही गरजेची बाब असल्याने जुंगटी ग्रामस्थांनी अडून न राहता रस्त्यासाठी जागा द्यावी, असे तहसीलदारांनी सूचविले.

शेतामधून जाणारा रस्ता गहू पेरल्यानंतर बंद होणार आहे. त्याआधीच रस्त्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्यावर शेताच्या कडेने रस्ता देण्याचे या ग्रामस्थांनी मान्य केले. तसेच १०० रुपयांच्या स्टँपवरही या शेतकऱ्यांनी सह्या करून रस्त्याची अडवणूक करणार नसल्याचे लिहून दिल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. रस्त्याबाबत तोडगा निघाल्याने जळकेवाडी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत गुरुवारी उपोषण मागे घेतले.

जळकेवाडीला जाणारा रस्ता जुंगटी गावच्या शेतातून जातो. शेतामध्ये पेरणी केल्यास जळकेवाडीच्या ग्रामस्थांची अडचण निर्माण होत होती. या समस्येवर सामोपचाराने तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गावांची एकत्रित बैठक घेऊन चर्चा केली. शेताच्या कडेने रस्ता तयार करण्यास जुंगटी ग्रामस्थांनी तयारी दाखविल्याने या दोन गावांतील तणाव दूर होण्यास मदत झाली आहे.- नीलप्रसाद चव्हाण, तहसीलदार

टॅग्स :talukaतालुकाgram panchayatग्राम पंचायत