शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अंत्ययात्रा रोखल्याने मालगावात तणाव तहसीलदारांची मध्यस्थी : पोलीस बंदोबस्तात कुंपण काढून मार्ग खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:30 IST

तालुक्यातील मालगाव येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुंपण घालून अंत्ययात्रा रोखण्याचा प्रयत्न झाल्याने शुक्रवारी सकाळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या

सातारा : तालुक्यातील मालगाव येथे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कुंपण घालून अंत्ययात्रा रोखण्याचा प्रयत्न झाल्याने शुक्रवारी सकाळी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या मध्यस्थीनंतर तब्बल ५० फूट तारेचे कुंपण पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मालगाव येथील संतोष उघडे यांच्या वडिलांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या स्मशानभूमीचा रस्ता तारेचे कुंपण घालून अडविण्यात आला होता. पाचशे फुटांवर स्मशानभूमी असताना तारेच्या कुंपणामुळे तब्बल दोन किलोमीटर अंतर पार करून स्मशानभूमीकडे जावे लागणार होते. तारेच्या कुंपनामुळे गावातील नागरिक संतप्त झाले.

तणावाची परिस्थिती ओळखून तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी पोलीस फौज फाट्यासह मालगावात धाव घेतली.स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता फार पूर्वीपासून आहे. मात्र, संबंधित मालकाने काही दिवसांपूर्वी सिमेंटचे पोल रोवून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद केला होता.

त्यामुळे तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी संबंधित मालकाला ‘तुमचा जो काय वाद असेल तो न्यायालयात दावा दाखल करून रितसर कब्जा घ्या, अत्यंविधी रोखून समाजात तेढ निर्माण करू नका,’ अशी त्यांची समजूत घातली. महसूल विभागाकडेही रितसर जागेचा प्रस्ताव पाठविण्यास संबंधितांना सांगण्यात आले. काहीवेळातच स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने ५० फुटांपर्यंत असलेले तारेचे कुंपण काढण्यात आले. त्यानंतर संतोष उघडे यांच्या वडिलांवर अधिकाºयांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर तणाव निवळला.सामाजिक सलोख्यासाठी वृक्षारोपणही..तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी मालगावमध्ये सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी अंत्यविधी झाल्यानंतर गावात वृक्षारोपणही केले. वृक्षारोपणावेळी गावातील सरपंच, तंटामुक्ती अध्यक्षांसह युवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.सातारा तालुक्यातील मालगाव येथे तारेचे कुंपण घालून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता अडविण्यात आला होता. तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांनी हे कुंपण शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात काढले.