शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

आदेशातील तरतुदीमुळेच मंदिरे वाचली!

By admin | Updated: February 6, 2015 00:43 IST

पालिकेने दिला अभिप्राय : सातारा शहरातील सर्व मंदिरांचे बांधकाम २००९ सालापूर्वीचेच

सातारा : ज्या अवैध धार्मिकस्थळांचे बांधकाम २००९ नंतर झाले आहे, अशी धार्मिकस्थळे तत्काळ पाडावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील मंदिरांचा पालिकेने सर्व्हे केला असता शहरातील बहुतांश मंदिरे २००९ पूर्वी बांधण्यात आली आहेत, असा अभिप्राय पालिकेने प्रशासनाला दिल्यामुळे साहजिकच साताऱ्यातील मंदिरे सुरक्षित झाली आहेत. गेल्या महिन्यात एका याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयामध्ये अवैध धार्मिक स्थळांबाबत याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अवैध धार्मिक स्थळांबाबत चिंता व्यक्त करून अशी बांधकामे काढून टाकावीत, असा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने शहरातील मंदिराबाबत सर्व्हे केला. त्यामध्ये बरीच मंदिरे ही फार पूर्वी बांधल्याचे निदर्शनास आले. ज्या मंदिरांचा वाहतुकीस अडथळा ठरत आहे. त्या काही मोजक्याच मंदिरांची पालिकेने यादी तयार केली आहे. बहुतांश मंदिरांचा सभामंडप अतिक्रमणामध्ये येत आहे. तो काढल्यास रस्ता वाहतुकीस मोकळा होईल, असा अभिप्राय पालिकेने प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे सातारा शहरातील मंदिरे सुरक्षित झाली आहेत. धार्मिकस्थळे ही लोकांच्या भावनिकतेचा आणि श्रद्धेचा विषय असतो. त्यामुळे तितक्याच संवेदनशीलतेने हा विषय हातळण्याची गरज असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली आहे. या कमिटीमध्ये पोलीस, सरपंच, ग्रामसेवक, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कमिटीच्या माध्यमातून प्रशासनाला धार्मिकस्थळांबाबत अभिप्राय कळवायचा आहे. मंदिरे अडथळा ठरत आहेत किंवा अवैध मंदिरे कायम करावीत का, यासंदर्भात आपले मत मांडणार आहेत. त्यानंतरच मंदिरांबाबत निर्णय होणार आहे, असे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी) अतिक्रमण काढावेच लागणार कुबेर गणेश मंदिर, मारुती मंदिर, दुर्गादेवी मंदिर, अजिंक्य गणपती मंदिर, दत्त मंदिर, सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती ठेवण्याचे शेड (मंगळवार पेठ), पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिर आदी मंदिरे २००९ पूर्वी बांधली असल्याचे पालिकेने प्रशासनाला अभिप्राय दिला आहे. मात्र, काही मंदिरांचे सभामंडप पुढे आले आहे. त्याचा वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे त्याचे अतिक्रमण काढले पाहिजे, असेही पालिकेने त्यामध्ये म्हटले आहे. पण मंजूर आराखडा नाही न्यायालयाच्या आदेशानुसार २००९ नंतरची जी अवैध धार्मिक स्थळे असतील, त्यांच्यावर हातोडा पडणार होता. मात्र, सातारा शहरामध्ये सर्वच मंदिरे ही २००९ पूर्वी म्हणजे २००३, २००४ मध्ये बांधण्यात आली आहेत. मात्र, यातील एकाही मंदिराला मंजूर आराखडा नाही, असे पालिकेकडूनच सांगण्यात आले. त्यामुळे ही मंदिरे आता कायम होणार का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.