शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

मंदिरे "लॉक" अवलंबून लोकांचे पोट "डाऊन"!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST

सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य शासनाने सर्वप्रकारची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले ...

सागर गुजर

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य शासनाने सर्वप्रकारची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या पावणेदोन वर्षांपासून मंदिरे बंद असून, त्यावर अवलंबून असणारे लोक अडचणीत सापडले आहेत. मंदिरे लवकरात लवकर उघडावीत, अशी त्यांची मागणी आहे. मंदिरे उघडण्याबाबत मात्र राजकीय पक्षांमध्ये मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.

१) कोरोनाला परतवल्यानंतच मंदिरे उघडावीत

कोरोनाच्या काळात सर्वात मोठी जबाबदारी ही लोकांचा जीव वाचवणे आहे. खुळचट संकल्पना घेऊन काही लोक मंदिरे उघडण्याची मागणी करत आहेत. कोरोना काळात डॉक्टरांनी व सफाई कामगारांनी देवाची भूमिका बजावलेली आहे. मताचे राजकारण करण्यासाठी देवाचा उपयोग भाजपवाल्यांनी थांबवावा.

- चंद्रकांत जाधव, जिल्हाप्रमुख, शिवसेना

कोरोना संपल्यावर शासन निर्णय घेईलच

कोरोना महामारी हा प्रश्न कुठल्याही पक्षाचा नसून, सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाशी संबंधित आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या सूचनेनुसार तिसरी लाट कधीही येऊ शकते. त्यामुळे सरकार त्याप्रमाणे निर्णय घेत आहे. केरळमध्ये १ लाख पॉझिटिव्ह लोक आढळले होते. मंदिरे सुरू करायला विरोध नाही. कोरोना संपल्यावर शासन तसा निर्णय घेईलच.

- सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

लोकांच्या काळजीपोटीच मंदिरे बंद

केंद्र सरकारनेच ज्या सूचना केल्या आहेत, त्याप्रमाणे राज्य शासन अंमलबजावणी करत आहे. वास्तविक मंदिरांमध्ये वयोवृध्द, महिला आणि लहान मुले श्रध्देने येत असतात. त्यातून गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने मंदिरे बंद ठेवलेली आहेत.

- डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

लोकांच्या श्रध्देवरच राज्य शासनाचा घाला

राज्य शासनाने मंदिरे बंद ठेवून लोकांच्या श्रध्देवरच घाला घातला आहे. लोक संकटाच्या काळामध्ये देवाची आराधना करतात. मंदिरात अभिषेक केला जातो. आता श्रावण महिना सुरू असतानाही लोकांना या गोष्टी करता येत नाहीत. मंदिरावर उपजीविका असलेल्या लोकांची तर उपासमारच सुरू आहे.

- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप

२) हजार कोटींची उलाढाल ठप्प

श्रावण महिन्यात मंदिर आणि परिसरातील व्यावसायिक असा जिल्ह्यातील एकूण दोन कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे. मंदिराच्या बाहेर असलेले व्यावसायिक तसेच किरकोळ फुले विकून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे तर हालच सुरू आहेत.

३) विश्वस्त म्हणतात...

कोट..

अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर बंद आहे. या मंदिरावर सर्व सेवाधारी व छोटे-मोठे व्यावसायिक मिळून जवळपास २०० कुटुंबांचा चरितार्थ चालतो. त्यांची उपासमार होत असून, शासनाने त्वरित सर्व मंदिरे पूर्ववत सुरू करावीत, अशी मागणी केली आहे.

- दीपकराव बडवे, पुजारी शिखर शिंगणापूर, माण

कोट...

क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील स्थानिक जनतेचा उदरनिर्वाह मंदिरावर अवलंबून असलेल्या पर्यटनावर आहे. मंदिरे अनेक महिन्यांपासून बंद राहिल्याने या लोकांवर उपासमारीची वेळ आले आहे. शासनाने मंदिरे लवकरात लवकर सुरू करून गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा.

- सुनील बिरामणे, सरपंच, क्षेत्र महाबळेश्वर