शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरे "लॉक" अवलंबून लोकांचे पोट "डाऊन"!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST

सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य शासनाने सर्वप्रकारची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले ...

सागर गुजर

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य शासनाने सर्वप्रकारची प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या पावणेदोन वर्षांपासून मंदिरे बंद असून, त्यावर अवलंबून असणारे लोक अडचणीत सापडले आहेत. मंदिरे लवकरात लवकर उघडावीत, अशी त्यांची मागणी आहे. मंदिरे उघडण्याबाबत मात्र राजकीय पक्षांमध्ये मतमतांतरे पाहायला मिळत आहेत.

१) कोरोनाला परतवल्यानंतच मंदिरे उघडावीत

कोरोनाच्या काळात सर्वात मोठी जबाबदारी ही लोकांचा जीव वाचवणे आहे. खुळचट संकल्पना घेऊन काही लोक मंदिरे उघडण्याची मागणी करत आहेत. कोरोना काळात डॉक्टरांनी व सफाई कामगारांनी देवाची भूमिका बजावलेली आहे. मताचे राजकारण करण्यासाठी देवाचा उपयोग भाजपवाल्यांनी थांबवावा.

- चंद्रकांत जाधव, जिल्हाप्रमुख, शिवसेना

कोरोना संपल्यावर शासन निर्णय घेईलच

कोरोना महामारी हा प्रश्न कुठल्याही पक्षाचा नसून, सर्वसामान्यांच्या जीवन-मरणाशी संबंधित आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या सूचनेनुसार तिसरी लाट कधीही येऊ शकते. त्यामुळे सरकार त्याप्रमाणे निर्णय घेत आहे. केरळमध्ये १ लाख पॉझिटिव्ह लोक आढळले होते. मंदिरे सुरू करायला विरोध नाही. कोरोना संपल्यावर शासन तसा निर्णय घेईलच.

- सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

लोकांच्या काळजीपोटीच मंदिरे बंद

केंद्र सरकारनेच ज्या सूचना केल्या आहेत, त्याप्रमाणे राज्य शासन अंमलबजावणी करत आहे. वास्तविक मंदिरांमध्ये वयोवृध्द, महिला आणि लहान मुले श्रध्देने येत असतात. त्यातून गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने मंदिरे बंद ठेवलेली आहेत.

- डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

लोकांच्या श्रध्देवरच राज्य शासनाचा घाला

राज्य शासनाने मंदिरे बंद ठेवून लोकांच्या श्रध्देवरच घाला घातला आहे. लोक संकटाच्या काळामध्ये देवाची आराधना करतात. मंदिरात अभिषेक केला जातो. आता श्रावण महिना सुरू असतानाही लोकांना या गोष्टी करता येत नाहीत. मंदिरावर उपजीविका असलेल्या लोकांची तर उपासमारच सुरू आहे.

- विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप

२) हजार कोटींची उलाढाल ठप्प

श्रावण महिन्यात मंदिर आणि परिसरातील व्यावसायिक असा जिल्ह्यातील एकूण दोन कोटी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला आहे. मंदिराच्या बाहेर असलेले व्यावसायिक तसेच किरकोळ फुले विकून उदरनिर्वाह करणाऱ्यांचे तर हालच सुरू आहेत.

३) विश्वस्त म्हणतात...

कोट..

अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर बंद आहे. या मंदिरावर सर्व सेवाधारी व छोटे-मोठे व्यावसायिक मिळून जवळपास २०० कुटुंबांचा चरितार्थ चालतो. त्यांची उपासमार होत असून, शासनाने त्वरित सर्व मंदिरे पूर्ववत सुरू करावीत, अशी मागणी केली आहे.

- दीपकराव बडवे, पुजारी शिखर शिंगणापूर, माण

कोट...

क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील स्थानिक जनतेचा उदरनिर्वाह मंदिरावर अवलंबून असलेल्या पर्यटनावर आहे. मंदिरे अनेक महिन्यांपासून बंद राहिल्याने या लोकांवर उपासमारीची वेळ आले आहे. शासनाने मंदिरे लवकरात लवकर सुरू करून गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा.

- सुनील बिरामणे, सरपंच, क्षेत्र महाबळेश्वर