शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बदल्यांबाबत वाद!

By admin | Updated: April 25, 2017 22:46 IST

दावे-प्रतिदावे सुरू : समन्वय समिती; रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन

सातारा : शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या अनुषंगाने शिक्षक संघटनांमध्येच वाद चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. सुगम-दुर्गमच्या अनुषंगाने शासन व प्रशासन राज्य समन्वय समितीशी सहमत असल्याचा दावा करण्यात आला असला तरी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने याला फारकत घेतली आहे. समन्वय समितीने सर्व शिक्षक संघटनांना सोबत न घेताच निर्णय घेतला असल्याचा आरोप या रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनर्फे करण्यात आला आहे. शिक्षक बदल्यांच्या अनुषंगाने राज्य समन्वय समितीतर्फे शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील, अध्यक्ष राजाराम वरुटे, सचिव केशव जाधव, मधुकर काठोळे, तुकाराम कदम आदींनी तसेच शिक्षक समितीचे सरचिटणीस उदय शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व सचिव असिम गुप्ता यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच शिक्षकांवर अन्याय होऊ नये, यासाठी सकारात्मक धोरण ठरल्याचे सांगितले जात आहे. मात्र, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने याला फारकत घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत शासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. तो असंतोष व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचा एकत्रितरीत्या २५ एप्रिल २०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार होता. परंतु राज्य समन्वय समिती व पंकजा मुंडे यांच्या बैठकीनंतर अचानक मोर्चा स्थगित करण्यात आला. या बैठकीत लेखी आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य शिक्षक अचंबित झाले. तसेच मोर्चा रद्द करताना संघ समितीने रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनला अजिबात विश्वासात घेतले नाही, असा आरोप केला आहे. सातारा जिल्हा समन्वय समिती व राज्य समन्वय समिती यांचा काहीही संबंध नव्हता. ही समन्वय समिती फक्त सातारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत गठीत झाली होती. परंतु प्रत्येक गोष्टीकडे राजकारण व स्वत:च्या फायद्याचा विचार करणाऱ्या नेत्यांच्यामुळे शिक्षकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. येणाऱ्या काही दिवसांत संघटनांच्या प्रतिनिधी बदलीमध्ये सूट असे शुद्धीपत्रक निघण्याची दाट शक्यता आहे. यामुळेच मोर्चा स्थगित झाला काय?, अशी शंकाही उपस्थित केली आहे. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने मंगळवारी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी) बदलाकडे डोळे...समन्वय समितीने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी सविस्तर चर्चा करून अडीअडचणी मांडल्या. या अडीअचणींना ग्रामविकास खात्याने सकारात्मक प्रतिसाद दिला. या चर्चेमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तरी देखील अद्याप लेखी आदेश किंवा शासन निर्णयामध्ये कोणतेही बदल केले नसल्याने शिक्षक संघटना व राज्यातील शिक्षक शासन निर्णयातील प्रस्तावित बदलाकडे डोळे लावून बसले आहेत.