शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

शिक्षक बदल्यांबाबत वाद!

By admin | Updated: April 25, 2017 22:46 IST

दावे-प्रतिदावे सुरू : समन्वय समिती; रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन

सातारा : शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या अनुषंगाने शिक्षक संघटनांमध्येच वाद चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. सुगम-दुर्गमच्या अनुषंगाने शासन व प्रशासन राज्य समन्वय समितीशी सहमत असल्याचा दावा करण्यात आला असला तरी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने याला फारकत घेतली आहे. समन्वय समितीने सर्व शिक्षक संघटनांना सोबत न घेताच निर्णय घेतला असल्याचा आरोप या रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनर्फे करण्यात आला आहे. शिक्षक बदल्यांच्या अनुषंगाने राज्य समन्वय समितीतर्फे शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील, अध्यक्ष राजाराम वरुटे, सचिव केशव जाधव, मधुकर काठोळे, तुकाराम कदम आदींनी तसेच शिक्षक समितीचे सरचिटणीस उदय शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व सचिव असिम गुप्ता यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच शिक्षकांवर अन्याय होऊ नये, यासाठी सकारात्मक धोरण ठरल्याचे सांगितले जात आहे. मात्र, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने याला फारकत घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत शासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. तो असंतोष व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचा एकत्रितरीत्या २५ एप्रिल २०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार होता. परंतु राज्य समन्वय समिती व पंकजा मुंडे यांच्या बैठकीनंतर अचानक मोर्चा स्थगित करण्यात आला. या बैठकीत लेखी आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य शिक्षक अचंबित झाले. तसेच मोर्चा रद्द करताना संघ समितीने रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनला अजिबात विश्वासात घेतले नाही, असा आरोप केला आहे. सातारा जिल्हा समन्वय समिती व राज्य समन्वय समिती यांचा काहीही संबंध नव्हता. ही समन्वय समिती फक्त सातारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत गठीत झाली होती. परंतु प्रत्येक गोष्टीकडे राजकारण व स्वत:च्या फायद्याचा विचार करणाऱ्या नेत्यांच्यामुळे शिक्षकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. येणाऱ्या काही दिवसांत संघटनांच्या प्रतिनिधी बदलीमध्ये सूट असे शुद्धीपत्रक निघण्याची दाट शक्यता आहे. यामुळेच मोर्चा स्थगित झाला काय?, अशी शंकाही उपस्थित केली आहे. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने मंगळवारी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी) बदलाकडे डोळे...समन्वय समितीने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी सविस्तर चर्चा करून अडीअडचणी मांडल्या. या अडीअचणींना ग्रामविकास खात्याने सकारात्मक प्रतिसाद दिला. या चर्चेमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तरी देखील अद्याप लेखी आदेश किंवा शासन निर्णयामध्ये कोणतेही बदल केले नसल्याने शिक्षक संघटना व राज्यातील शिक्षक शासन निर्णयातील प्रस्तावित बदलाकडे डोळे लावून बसले आहेत.