शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
5
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
7
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
8
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
9
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
10
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
11
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
12
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
13
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
14
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
15
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
16
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
17
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
18
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
19
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
20
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

हजारमाचीच्या ग्रामसभेत करवसुली, प्रोसिडिंगवरुन गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:47 IST

ओगलेवाडी : हजारमाची येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा प्रचंड गोंधळात पार पडली. मासिक सभेला इतिवृत्त लिहिण्यासाठी ग्रामसेवकाकडून होणारी टाळाटाळ, थकीत ...

ओगलेवाडी : हजारमाची येथील ग्रामपंचायतीची ग्रामसभा प्रचंड गोंधळात पार पडली. मासिक सभेला इतिवृत्त लिहिण्यासाठी ग्रामसेवकाकडून होणारी टाळाटाळ, थकीत कर वसुली, बोगस नळ कनेक्शन, सरपंच प्रतिनिधी नेमणे, रखडलेली विकासकामे आदी विषयांवरुन जोरदार खडाजंगी झाली. तब्बल दीड वर्षांच्या लॉकडाऊननंतर प्रथमच प्रत्यक्ष पार पडलेली ही ग्रामसभा तब्बल तीन तास चालली.

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विद्या घबाडे होत्या. यावेळी उपसरपंच प्रशांत यादव, ग्रामसेवक एन. व्ही. चिंचकर, तलाठी श्रीकृष्ण मर्ढेकर, सदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी मैथली मिरज उपस्थित होत्या. सभेच्या सुरूवातीपासूनच विरोधी सदस्य शरद कदम यांनी ग्रामसभेचे निमंत्रण बहुतांश ग्रामस्थांना मिळाले नसल्याची तक्रार केली.

सदस्य शरद कदम, संगीता डुबल, सारिका लिमकर यांनी सत्ताधाऱ्यांकडून विरोधी सदस्यांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने ग्रामपंचायतीचा कारभार एकाधिकाराने व मनमानीपणे होत असल्याचा आक्षेप घेतला. गटविकास अधिकाऱ्यांनी सभेत इतिवृत्त लिहिण्याचे आदेश दिले असतानाही ते लिहिले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. घरपट्टीची पूर्ण वसुली होत नसल्याने ऐंशी लाखांचे वीजबिल थकले आहे. त्यामुळे नाईलाजाने पाणीपट्टी वाढविण्याचा विषय उपसरपंच प्रशांत यादव यांनी मांडताच ग्रामस्थांनी त्याला विरोध करुन आधी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी लावून ठरली. विरोधी सदस्यांनी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांचे दीर कारभार पाहात असल्याचा आरोप केला. यावरुन जयवंत विरकायदे यांनी सरपंचांना तुम्ही प्रतिनिधीची नेमणूक केली आहे का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना एक महिला सरपंच म्हणून काम करताना मर्यादा येत असल्याने दीर मला मदत करतात, असे सांगितले. यावरुन ग्रामसभेत प्रचंड गदारोळ झाला. ग्रामपंचायतीचा सुमारे एक कोटी रुपयांचा कर थकीत आहे. अनेक बड्या लोकांनी वर्षानुवर्षे ग्रामपंचायतीचा कर थकवला आहे. काही लोकांनी इमारती बांधून वर्षानुवर्षे ते वापरत आहेत. मात्र, त्या इमारतींची नोंदही ग्रामपंचायतीकडेे नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने अशांकडून प्रथम कर वसूल करावा. २५ हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकीदारांच्या नावाचे फ्लेक्स गावातील चौकात लावावेत, अन्यथा ग्रामपंचायतीसमोर उपोषण करण्याचा इशारा सर्जेराव पानवळ यांनी दिला.

डेंग्यू व चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. गावात सहा प्रभाग आहेत. त्यांना कमी-जास्त प्रमाणात विकासनिधी दिला जातो, त्याचे निकष ठरावेत, अशी मागणी सदस्य पितांबर गुरव, विनोद डुबल, प्रकाश पवार यांनी केली. ग्रामपंचायतीने सतरा सदस्यांना विचारात घेऊन गावचा कारभार करण्याची मागणी नंदकुमार डुबल यांनी केली. पशुवैद्यकीय दवाखान्यात पैसे दिल्याशिवाय जनावरांवर उपचार होत नसल्याचा आरोप सूर्यभान माने यांनी केला.