शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

तासगावकरांवर गुन्हे असल्याने कारखान्याची भागिदारी तोडली

By admin | Updated: October 5, 2014 00:18 IST

फलटण : रामराजे नाईक-निंबाळकर यांची माहिती

फलटण : ‘आमच्या नावावर ऊस व विश्वास संपादन करून साखर कारखान्याच्या माध्यमातून डॉ. नंदकुमार तासगावकर राजकारणात येणार, अशी कुणकुण लागल्यामुळे आणि त्यांच्याच आर्थिक व्यवहाराबाबतही ४२० कलमाखालील गुन्हे दाखल असल्याचे लक्षात आल्यावर कारखान्याची भागीदारी तोडली,’ अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.पत्रकार परिषदेस संजीवराजे नाईक-निंबाळकर, बाजार समिती अध्यक्ष रघुनाथ नाईक-निंबाळकर उपस्थित होते. रामराजे म्हणाले, ‘बरड, ता. फलटण येथे साखर कारखाना उभारणीबाबत डॉ. नंदकुमार तासगावकर यांच्याशी सहा महिन्यांपूर्वी ठरले होते. व त्या पद्धतीने चर्चा सुरू होती. डॉ. तासगावकरांशी माझे बोलणे पण झाले की, तुम्हाला राजकारणात यायचं का? कारखाना काढायचा? तेव्हा डॉ. तासगावकर म्हणाले, ‘मी राजकाणार येणार नाही.’ परंतु ते राजकारणात येणार ही कुणकुण लागली होती. तासगावकरांच्या आर्थिक व्यवहाराबाबतही काही गोष्टी कानावर आल्या होत्या. ४२० सारखे गंभीर फौजदारी आठ गुन्हे तासगावकर यांच्यावर दाखल आहेत. कुणाला पाहायचे असेल, तर त्यांनी उमेदवारी दाखल करताना जे प्रतिज्ञापत्र दिले आहे. ते कुणालाही पाहण्यास सहज उपलब्ध होते. त्यात पाहू शकतात. आम्ही तालुक्यात तीन पिढ्या राजकारण केले. तालुक्याबाहेरील व्यक्ती राजकारण करावे हे न पटणारे आहे. तासगावकराना फक्त एवढ्यापुरताच वापर डॉ. तासगावकरांना करायचा होता. म्हणून कारखाना भागीदारी तोडली आहे.’ यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)