शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

निधीला ‘डांबर’... रस्त्यावर ‘पाणी’

By admin | Updated: February 13, 2015 22:59 IST

पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष : वाई-पसरणी रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण रखडले

वाई : वाई-पसरणी रस्त्याचे रुंदीकरण, नवीन ९० लाखांच्या निधीचे डांबरीकरण, वाई पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे व चाल ढकलीमुळे होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे पुन्हा खराब होण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, पसरणी ग्रामस्थांकडून व प्रवाशांकडून पाटबंधारे विभागाच्या या कारभाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.पसरणी ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे वाई-पसरणी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या पूर्वीही अनेकवेळा या रस्त्यासाठी लाखोंचा निधी खर्च झाला आहे. यावेळी ९० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. रस्त्याचे काम सुरू असून, नाल्याची कामे बाकी आहेत. वाई-पसरणी रोडवर धोम धरणाच्या कालव्याचे शेती पाण्यासाठी दोन ठिकाणी पाट आहेत. हे रस्त्याच्या खालून जातात. त्याचे बांधकाम अतिशय जुने झाले असून, कालव्यातून पाणी सुटल्यानंतर त्यातून पाण्याची मोठी गळती होते. त्यामुळे या रस्त्याचे काम होऊन टिकत नाही. डांबर निघून जाऊन सतत मोठ-मोठे खड्डे पडतात. यावेळी रस्त्याचे काम चालू होण्यापूर्वी पसरणी येथील माजी सरपंच व कार्यकर्त्यांनी वाई-सातारा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून व पाणी गळती ठिकाणी नेहून परिस्थिती दाखविली होती. याबाबत अनेकवेळा निवेदनेही दिली गेली आहेत. यावर पाटबंधारे विभागाकडून त्या पाण्याच्या धाऱ्यावर थोडेसे काम केले आहे. कालव्याचे पाणी सुटल्यानंतर पुन्हा त्यातून पाणी गळती होऊन रस्ता खराब होत आहे. नवीन डांबरीकरणही पाण्यात जाण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या या कामकाजाबाबत ग्रामस्थ व प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)वाई पसरणी रस्त्यासाठी यावेळी ९० लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, कालव्याच्या शेतीपाण्याच्या गळतीमुळे यापूर्वीही गेली अनेक वर्षे रस्ता खराब होत आहे. संबंधित वाईचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी चंदकांत सणस तसेच सातारा विभागाचे बी. बी. मोरे यांना प्रत्यक्ष ठिकाणी नेहून परिस्थिती दाखवली आहे. परंतु त्यांनी केवळ किरकोळ जुन्या कामाला डागडुजी केल्याने पुन्हा गळती सुरू झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम खराब होणार आहे.- राजेंद्र शिर्के, माजी सरपंच, पसरणीधोम धरणाच्या कालव्यातून येणाऱ्या शेतीसाठी पाण्याच्या दाऱ्याची कामे कालवे निर्मितीच्यावेळी ४० वर्षांपूर्वी झाली आहेत. त्याची नवीनच बांधकामे होण्याची गरज असून, यासाठी गळतीमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे व रस्ता वारंवार खराब होत आहे.- वामनराव खरात, शेतकरी