शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सहा तालुक्यात पाण्यासाठी धावू लागले टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला तसेच जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या ...

सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला तसेच जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात टँकर सुरू झाला असला तरी टंचाई वाढू लागली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सहा तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, १७ गावे आणि २३ वाड्यांतील १४ हजारांवर नागरिक अवलंबून आहेत. यामध्ये माणमध्ये अधिक टंचाई आहे.

जिल्ह्यात तीन-चार वर्षातून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस होऊनही माण, खटावसारख्या तालुक्यात डिसेंबर, जानेवारी महिना उजाडताच टँकर सुरू करावे लागायचे. पण, गेल्या काही वर्षात हे चित्र बदललंय. याला कारण म्हणजे जलसंधारणाची झालेली कामे. त्याचबरोबर वॉटर कप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचं तुफान आलेलं. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यात जलसंधारणाची मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे पावसाचं पडलेलं पाणी अडून राहिलं व त्याचा फायदाही टंचाई निवारणासाठी झाला आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहणार असल्याचे समोर येऊ लागले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केला आहे. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील १६९ गावांना आणि २२६ वाड्यांत टंचाई भासू शकते. पण यामधील १३८ गावांनाच टंचाईचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. यासाठी ४६ टँकर लागू शकतात. त्यासाठी जवळपास अडीच कोटीचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, उन्हाळा संपत आलातरी अजूनही मोठ्या प्रमाणात टँकर सुरू नाहीत.

गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरू झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तालुक्यात टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या; मात्र, यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत टँकर उशिरा सुरू झाला आहे. वाई तालुक्यातील दोन गावे आणि तीन वाड्यांसाठी प्रथम टँकर सुरू झाला. आतातर जिल्ह्यातील सहा तालुक्यात टँकर सुरू झाला आहे. या सहा तालुक्यांतील १७ गावे आणि २३ वाड्यांवरील लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी १२ टँकर सुरू आहेत. तसेच पाणीपुरवठ्यासाठी १९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

चौकट :

वाई, माण, पाटण तालुक्यात टँकर...

वाई तालुक्यातील तीन गावे आणि दोन वाड्यांसाठी दोन टँकर सुरू आहेत. यावर २९३१ नागरिक आणि १००५ पशुधन अवलंबून आहे. माण तालुक्यात सहा गावे आणि १४ वाड्या तहानल्या आहेत. यासाठी दोन टँकर मंजूर आहे. तालुक्यातील ४८६३ लोकसंख्या बाधित झाली आहे. पाटण तालुक्यातील दोन वाड्यांसाठी टँकर सुरू आहेत. त्याचबरोबर कऱ्हाड तालुक्यात दोन गावांसाठी, सातारा तालुक्यात १ गाव व ४ वाड्या आणि महाबळेश्वर तालुक्यातील दोन गावांसाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला आहे. या सहा तालुक्यातील १४,५७५ नागरिक आणि ४४४८ पशुधन टँकरवर अवलंबून आहेत.