शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वानरवाडी,बामणवाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:39 IST

प्रमोद सुकरे कराड कराड तालुक्याला सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. अनेक गावात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण ...

प्रमोद सुकरे

कराड

कराड तालुक्याला सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. अनेक गावात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर वानरवाडी ,बामणवाडी या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत गेल्यास आणखी काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागणार आहे .

कृष्णा- कोयना नदी काठावर वसलेला कराड तालुका खरं तर सधन म्हणून ओळखला जातो. पण भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर तालुक्यातील काही भागात पाणी टंचाई जाणवते. शेतीच्या पाण्यासाठी या दोन्ही नदीतून उपसा जलसिंचन योजना राबविल्याने बराचसा भाग ओलिताखाली आला आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या घरात समृद्धी निर्माण झाल्याचे दिसते.

मात्र कराड दक्षिण मध्ये उंडाळे खोऱ्यातील डोंगरी भाग, ढेबेवाडी खोऱ्यातील काही गावे यांना पाणी टंचाई भासते. कराड उत्तर मधील काही गावांनाही टंचाईचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यात १ एप्रिल ते ३० जून अखेरचा कालावधी गृहीत धरुन तालुक्यातील २७ गावांचा समावेश केलेला दिसतो. तर यापूर्वी १ जानेवारी ते ३१ मार्च अखेर साठी केलेल्या आराखड्यात २७ गावांचा समावेश होता.

दरम्यान पंचायत समितीने पाणीटंचाईच्या अनुषंगाने योग्य पावले उचलली आहेत. टंचाई भासणाऱ्या गावांचा आढावा घेऊन त्याचा आराखडा तयार केला आहे. लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

चौकट

या गावांचा आहे समावेश ..

बामणवाडी ,पवारवाडी(नां), गोसावेवाडी ,खोडजाईवाडी, घोलपवाडी, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, अंतवडी, काले टेक, किवळ, वडोली भिकेश्वर, रिसवड ,शिवडे, कोरिवळे, डफळवाडी, नांदलापूर, सुरली, कामती ,संजयनगर ,तासवडे, वानरवाडी या गावांचा टंचाईच्या यादीत समावेश आहे.

चौकट

काय केले आहे नियोजन ..

नवीन विंधन विहिरी- ५

नळ पाणीपुरवठा दुरुस्‍ती -३

तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना - ३

टँकरने पाणीपुरवठा- १०

खाजगी विहीर अधिग्रहण -५

विहीर खोदणे, गाळ काढणे- १६

चौकट

वाकुर्डेच्या पाण्याने मिळतो दिलासा ..

कराड दक्षिणच्या उंडाळे खोऱ्यात, डोंगरी भागात पाणी टंचाई भासते. यावर पर्याय म्हणून वाकुर्डे योजनेचे माध्यमातून वारणा नदीचे पाणी दक्षिण मांड नदी पात्रात सोडले जाते. माजी मंत्री विलासराव पाटील यांच्या प्रयत्नातून देशातील पहिला नदीजोड प्रकल्प येथे साकारला गेला आहे . यावर्षीही नुकतेच वाकुर्डे योजनेतून या नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून ते पाणी शेवटपर्यंत पोचल्यानंतर शेती व पिण्याच्या पाण्याकरिता या भागाला दिलासा मिळणार आहे.

कोट

तालुक्याच्या पाणीटंचाईचा आराखडा तयार आहे. सध्या वानरवाडी व बामणवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यानुसार दोन्ही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढली तर अजून काही गावांना पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील. त्याची दक्षता आम्ही घेत आहोत.

डॉ. आबासाहेब पवार

गटविकास अधिकारी

पंचायत समिती कराड