शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वानरवाडी,बामणवाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:39 IST

प्रमोद सुकरे कराड कराड तालुक्याला सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. अनेक गावात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण ...

प्रमोद सुकरे

कराड

कराड तालुक्याला सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. अनेक गावात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर वानरवाडी ,बामणवाडी या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत गेल्यास आणखी काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागणार आहे .

कृष्णा- कोयना नदी काठावर वसलेला कराड तालुका खरं तर सधन म्हणून ओळखला जातो. पण भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर तालुक्यातील काही भागात पाणी टंचाई जाणवते. शेतीच्या पाण्यासाठी या दोन्ही नदीतून उपसा जलसिंचन योजना राबविल्याने बराचसा भाग ओलिताखाली आला आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या घरात समृद्धी निर्माण झाल्याचे दिसते.

मात्र कराड दक्षिण मध्ये उंडाळे खोऱ्यातील डोंगरी भाग, ढेबेवाडी खोऱ्यातील काही गावे यांना पाणी टंचाई भासते. कराड उत्तर मधील काही गावांनाही टंचाईचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यात १ एप्रिल ते ३० जून अखेरचा कालावधी गृहीत धरुन तालुक्यातील २७ गावांचा समावेश केलेला दिसतो. तर यापूर्वी १ जानेवारी ते ३१ मार्च अखेर साठी केलेल्या आराखड्यात २७ गावांचा समावेश होता.

दरम्यान पंचायत समितीने पाणीटंचाईच्या अनुषंगाने योग्य पावले उचलली आहेत. टंचाई भासणाऱ्या गावांचा आढावा घेऊन त्याचा आराखडा तयार केला आहे. लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

चौकट

या गावांचा आहे समावेश ..

बामणवाडी ,पवारवाडी(नां), गोसावेवाडी ,खोडजाईवाडी, घोलपवाडी, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, अंतवडी, काले टेक, किवळ, वडोली भिकेश्वर, रिसवड ,शिवडे, कोरिवळे, डफळवाडी, नांदलापूर, सुरली, कामती ,संजयनगर ,तासवडे, वानरवाडी या गावांचा टंचाईच्या यादीत समावेश आहे.

चौकट

काय केले आहे नियोजन ..

नवीन विंधन विहिरी- ५

नळ पाणीपुरवठा दुरुस्‍ती -३

तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना - ३

टँकरने पाणीपुरवठा- १०

खाजगी विहीर अधिग्रहण -५

विहीर खोदणे, गाळ काढणे- १६

चौकट

वाकुर्डेच्या पाण्याने मिळतो दिलासा ..

कराड दक्षिणच्या उंडाळे खोऱ्यात, डोंगरी भागात पाणी टंचाई भासते. यावर पर्याय म्हणून वाकुर्डे योजनेचे माध्यमातून वारणा नदीचे पाणी दक्षिण मांड नदी पात्रात सोडले जाते. माजी मंत्री विलासराव पाटील यांच्या प्रयत्नातून देशातील पहिला नदीजोड प्रकल्प येथे साकारला गेला आहे . यावर्षीही नुकतेच वाकुर्डे योजनेतून या नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून ते पाणी शेवटपर्यंत पोचल्यानंतर शेती व पिण्याच्या पाण्याकरिता या भागाला दिलासा मिळणार आहे.

कोट

तालुक्याच्या पाणीटंचाईचा आराखडा तयार आहे. सध्या वानरवाडी व बामणवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यानुसार दोन्ही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढली तर अजून काही गावांना पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील. त्याची दक्षता आम्ही घेत आहोत.

डॉ. आबासाहेब पवार

गटविकास अधिकारी

पंचायत समिती कराड