शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सातबाराच्या संगणकीकरणामुळे तलाठी तहसील कार्यालयात

By admin | Updated: June 7, 2017 14:42 IST

गावपाळीवर अडचणी निर्माण : महसूल विभागाच्या कारभाराने शेतकरी त्रस्त

आॅनलाईन लोकमतखंडाळा (जि. सातारा), दि. 0७ : खंडाळा तालुक्यात सात बारा संगणकीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. यासाठी सर्वच गावांचे तलाठी तहसील कार्यालयात अडकून पडले आहेत. त्यामुळे तलाठ्यांअभावी गावपातळीवरील कामे ठप्प आहेत. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींमुळे सध्या तलाठी आहेत का ? अशी म्हणण्याची वेळ गावोगावच्या ग्रामस्थांवर आली आहे. महसूल विभागाच्या या अनागोंदी कारभाराने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

सातबारा संगणकीकरणाचे काम तालुक्यात सर्वत्र सुरु असल्याने गावातून तलाठी गायब आहेत. त्यामुळे सातबारा काढणे, वारस नोंदी करणे यासह अनेक कामांसाठी तलाठी कार्यालयात खेटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे या संगणकीकृत सातबारामध्ये अनेक त्रुटी आढळून येत आहेत. जमीन खरेदी विक्री करण्यासाठी संगणकीय सातबाराच ग्राह्य धरला जात आहे. मात्र, त्यामध्ये त्रुटी असल्याने त्या दूर करण्यासाठी स्टँम्प व्हेंडरना त्रास घ्यावा लागत आहे. यासाठी तलाठ्यांची मनधरणी करावी लागत आहे. याचा आर्थिक भूर्दंड मात्र शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तरीही हा खेळ राजरोसपणे सुरुच आहे.

आठवड्यातून चार-चार दिवस गावात तलाठ्यांचे दर्शन नसल्याने तलाठी कार्यालयातील छोट्या कामांसाठी लोकांना तहसील कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. तरीही आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण नसल्याने शेतकऱ्यांना सातबारा मिळणे जिकरीचेच होत आहे.प्रत्येक गावात तलाठ्यांना कार्यालयात बसण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे लोकांची कामे खोळंबली आहेत. तलाठ्यांना शोधत तालुक्यापर्यंत जावे लागत आहे. तरीही लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. तलाठ्यांनी संगणकीकरणाच्या कामाबरोबरच गावातील कार्यालयातही वेळ द्यावा ही सर्वांची अपेक्षा आहे.

- राजेंद्र भोसले, 

उपसरपंच, शिवाजीनगर