शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गणेशोत्सवात मिठाई जपूनच घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 20:37 IST

दुधासह दुग्धजन्य पदार्थामध्ये होणाºया भेसळीमुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. गणेशोत्सव काळात तयार खव्याचे मोदक, पेढे, बर्फी आणि खाद्यपदार्थ व मिठाईमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने भेसळ खोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देभेसळखोर होतायत सक्रीय : पेढे, बर्फी खरेदी करताना दर्जा वाढती मागणी पुरविण्यासाठी बाहेरच्या राज्यातून भेसळीचा खवा

रहिमतपूर : गणेशोत्सवात शहरी भागासह ग्रामीण भागातही मिठाईला मागणी वाढते. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारा खवा पुरेसा नसल्याने शेजारील राज्यातून खव्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेऊन भेसळीच्या माध्यमातून भेसळखोर आपले उखळ पांढरे करतात. मात्र, भेसळीच्या मिठाईमुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे. भेसळीच्या खाद्यपदार्थांपासून आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पेढे, बर्फी आदी खरेदी करताना दर्जा तपासूनच खरेदी करणे गरजेचे झाले आहे.सणासुदीच्या काळात मिठाईला मागणी वाढत असल्याने मिठाईतील विविध पदार्थांमध्ये भेसळीची दाट शक्यता निर्माण होते. रहिमतपूर शहरासह जिल्हाभर स्थानिक पातळीवर मर्यादित स्वरूपाचा खवा तयार होतो. मात्र, जिल्ह्यातील स्वीटमार्ट दुकानांची आकडेवारी पाहता हा खवा पुरेसा ठरत नाही. सणासुदीच्या कालावधी व्यतिरिक्तही जिल्ह्याबाहेरील राज्यातून खाण्याची आवक होते. मात्र, गणेशोत्सवात खव्याच्या आवकमध्ये दुप्पटीपेक्षा जास्त वाढ होते. वाढती मागणी पुरविण्यासाठी या काळात बाहेरच्या राज्यातून भेसळीचा खवा पाठविला जातो. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान अन्न व औषध प्रशासनाकडून झालेल्या कारवाईतून हे स्पष्ट झाले आहे. या भेसळीमध्ये केवळ परराज्यातील नव्हे तर जिल्ह्यातील काही लहान-मोठ्या व्यापाºयांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील अनेक नामवंत स्वीटमार्टवर भेसळ प्रकरणी यापूर्वी कारवाई झाली आहे. त्यामुळे धुतल्या तांदळासारखा मी आहे, असा कोण बडेजाव मारताना दिसत नाही. लहान-मोठे विक्रेते भेसळ करत नसले तरी त्यांना खव्यासह इतर मिठाईची उत्पादने पुरवठा करणाºयांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.दुधासह दुग्धजन्य पदार्थामध्ये होणाºया भेसळीमुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. गणेशोत्सव काळात तयार खव्याचे मोदक, पेढे, बर्फी आणि खाद्यपदार्थ व मिठाईमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने भेसळ खोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.