शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

खेळांना प्रोत्साहनासाठी उचलावीत पावले

By admin | Updated: July 6, 2014 00:34 IST

क्रीडातज्ज्ञांच्या अपेक्षा : स्पर्धांसाठी आर्थिक तरतुदीची गरज

क्रीडातज्ज्ञांच्या अपेक्षा : स्पर्धांसाठी आर्थिक तरतुदीची गरजसातारा : क्रीडा क्षेत्र सध्या मोठ्या संकटातून जात असल्याचे चित्र आहे. शासनाने हात झटकल्याने विविध प्रकारची अनुदाने बंद झाली असल्याने खेळाला प्रोत्साहन देण्याचे धोरणच नसल्याचे वास्तव पुढे येत आहे. क्रीडा संकुलांचे पांढरे हत्ती उभे राहत असले तरी खऱ्या अर्थाने खेळाला चालनाच मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. केंद्र शासनाकडून क्रीडाप्रेमी व क्रीडा संघटनांच्या अनेक अपेक्षा आहेत. आर्थिक तरतुदीअभावी राज्य, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा घेण्यावर मर्यादा आलेल्या आहेत. याबाबत बोलताना ज्येष्ठ क्रीडातज्ज्ञ सुरेश साधले ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘राज्य शासनाकडून पूर्वी क्रीडा संघटनांना अनुदाने मिळायची. ती अनुदाने आता बंद झाली आहेत. ज्या संघटना राज्यस्तरावरील स्पर्धा घ्यायच्या, त्यांचे अनुदान बंद केले आहे. क्रीडाप्रेमी स्वखर्चातून अशा स्पर्धा आयोजित करत असल्या तरी त्यांच्यावर मर्यादा येत आहेत. क्रीडा संघटना तितक्याशा प्रबळ नाहीत. राज्यस्तरीय स्पर्धा घेतली तर संघटनांना विशेष अनुदान मिळायचे, ते सहा-सात वर्षांपासून पूर्णपणे बंद केले आहे. क्रीडा क्षेत्रासाठी केंद्र व राज्य शासनांच्या अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करणे आवश्यक बाब आहे. दरम्यान, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी जे दानशूर पुढे येतात, त्यांना करामध्ये सवलत दिल्यास क्रीडा क्षेत्राला आर्थिक मदतीत वाढ होऊ शकेल. सातारा जिल्हा क्रीडा संकुलाचाच विचार करायचा झाल्यास येथील बॅडमिंटन कोर्ट अनेक दिवसांपासून बंद आहे. क्रीडा संघटनांनी जिल्हा क्रीडा समितीकडे या कोर्टची मागणी केली तर त्यांना ती चालवायलाही दिली जात नाही. वास्तविक या कोर्टच्या दुरुस्तीचा खर्च शासन करत नसेल तर असे पांढरे हत्ती पडून ठेवण्यात काय अर्थ आहे? क्रीडा क्षेत्राला उत्तेजन देणारी कोणतीही योजना शासन राबवत नाही, तोवर चिंता कायम राहील. क्रीडा चळवळ सध्या रोडावली आहे. जिल्हा क्रीडा समित्यांमध्ये स्थानिक क्रीडातज्ज्ञांचा समावेश असणेही आवश्यक आहे.’ पांडुरंग शिंदे म्हणाले, ‘शासनाला क्रीडा क्षेत्रात खरोखरच प्रगती करायची असेल तर प्रत्येक जिल्ह्यातील मैदानांमध्ये सिंथेटिक ट्रॅक होणे आवश्यक आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक निवासी क्रीडा शाळा असावी. कार्पोरेट सोशिएल रिस्पाँसिबिलिटी या हेतूतून क्रीडा क्षेत्रासाठी दरवर्षी किमान ३० टक्के निधी मिळावा. शासनाने यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सध्या क्रीडा संघटना व शाळा यांच्यात समन्वयाचे वातावरण नसल्याचे चित्र आहे. ते बदलायला हवे. क्रीडा संघटना तन्मयतेने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करत असतात. शाळांना त्याला पाठिंबा देणे आवश्यक आहे. दोघांमध्ये समन्वय असेल तरच मुलांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचे पाठबळ मिळू शकेल, असे मला वाटते.’ (प्रतिनिधी)