शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शाळा, कॉलेज घ्या ताब्यात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:38 IST

शासनाने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, तरीही सातारकरांना कसलीही तमा नसल्याचं गेल्या दोन दिवसांत दिसत आहे. पोलीस बंदोबस्त असतानाही ...

शासनाने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला, तरीही सातारकरांना कसलीही तमा नसल्याचं गेल्या दोन दिवसांत दिसत आहे. पोलीस बंदोबस्त असतानाही अनेक तरुण दुचाकीवरून शहरात फिरत आहेत. कारवाई टाळण्यासाठी पोलीस उभे असलेल्या चौकाला वळसा घालून तरुणाई शहरातून फिरत आहे, तसेच दररोज लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी बाधितांचे नातेवाईकही शहरातून फिरत आहेत. कोरोनाची लक्षणे फारशी दिसत नसली, तरी त्यांच्या संपर्कात आल्याने संसर्ग वाढत आहे. त्यामुळेच साखळी तोडण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. ही साखळी तोडण्यासाठी आता तरी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

पहिल्या फेजमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले होते. परगांवाहून आलेले, तसेच कोरोनाबाधितांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये सक्तीने ठेवले जात होते. यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला काही प्रमाणात यश आले. मात्र, बाधितांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर हळूहळू त्या सर्व उपाययोजना थंडावत गेल्या. जिल्ह्यातील सद्यपरिस्थिती पाहता, प्रशासनाने पुन्हा त्या सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

सुदैवाने सातारा शहरामध्ये रयत शिक्षण संस्थेसह अनेक शिक्षण संस्थांच्या शाळा इमारती मोठ्या आहेत. प्रत्येक ठिकाणी स्वच्छतागृह, पाणी, वीज यांची चांगली सोय आहे, तर काही महाविद्यालयांमध्ये वसतिगृह असल्याने मुक्कामाची कसलीही अडचण भासू शकणार नाही. शहरातील बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येही स्वतंत्र स्वच्छतागृह, तसेच मूलभूत सोईसुविधा आहेत. या इमारती जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्यास, तेथे फारसे नवीन काही करण्याची गरज नाही. सध्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत, त्यामुळे या इमारतींचा योग्य कारणासाठी उपयोग होऊ शकतो.

चौकट

नव्या इमारतीचाही होऊ शकतो उपयोग

शहरात असंख्य इमारती बांधकाम व्यावसायिकांनी बांधून ठेवलेल्या आहेत. मात्र, त्यातील फ्लॅट विकले नाहीत, विकले असले, तरी त्यांचा ग्राहकांकडे ताबा दिलेला नाही किंवा इतर कारणाने पडून आहेत, अशा इमारतीही जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्यास त्या ठिकाणी विलगीकरणची चांगली सोय होऊ शकते.

हॉटेलही फायदेशीर

काही मंडळींना संस्थात्मक विलगीकरणमध्ये इतर लोकांबरोबर राहणे उचित वाटत नाही. त्यामुळे ते घरातच थांबतात. हॉटेल व्यावसायिकांनी पुढे येऊन छोट्या-छोट्या खोल्यांचे विलगीकरण कक्ष तयार केल्यास सधन कुटुंबातील मंडळी येथे आनंदाने राहतील. येथे संबंधित नागरिकांची सोय होऊ शकते. हॉटेल व्यवसाय होऊ शकतो यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने समन्वयातून हॉटेल व्यावसायिकांना काही नियम घालून दिल्यास त्याचा उपयोग होऊ शकतो.

फोटो मेल करणार आहे

शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात संस्थात्मक विलगीकरण याची सोय करण्यात आलेली आहे. (छाया : मुराद पटेल)