शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाला पाठीवर घेऊन कैक मैल पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 22:59 IST

पेट्री : तालुक्यातील परळी खोºयामध्ये अत्यंत दुर्गम भाग म्हणून समजल्या जाणाºया सांडवलीमधील ग्रामस्थांना आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. ना रस्ता ना वाट, अशा परिस्थितीतही येथील ग्रामस्थ तब्बल बारा किलोमीटर पायपीट करून आजारी व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवत आहेत

ठळक मुद्दे♦सांडवलीला ना रस्ता ना पायवाट♦गावकºयांना नेमके कसे जगावे, असा प्रश्न पडला आहे♦अशा हालअपेष्टा अजून किती दिवस सुरू राहणार♦प्रशासनाकडूनही या गावात कसल्याच सुविधा देण्यात आल्या नाहीत

पावसाळ्यात पुरातून वाट काढत रुग्णांचा जीवघेणा प्रवास; दुर्लक्षाचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कपेट्री : तालुक्यातील परळी खोºयामध्ये अत्यंत दुर्गम भाग म्हणून समजल्या जाणाºया सांडवलीमधील ग्रामस्थांना आजही मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे. ना रस्ता ना वाट, अशा परिस्थितीतही येथील ग्रामस्थ तब्बल बारा किलोमीटर पायपीट करून आजारी व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवत आहेत. हे विदारक चित्र पाहून प्रशासनाला जाग कशी येत नाही, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.सांडवलीपासून पांगारीपर्यंत नागरिकांना चालत यावे लागते. दहा ते बारा किलोमीटरचे हे अंतर पार करताना येथील ग्रामस्थांचा जीव कासावीस होत असतो. एवढेच नव्हे तर रात्री-अपरात्री एखादी व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी ग्रामस्थांना जिवाचे रान करावे लागत आहे. पाठीवर डोली करून रुग्णाला बसविले जाते. त्यानंतर या डोलीतून संबंधित रुग्णाला कसेबसे रुग्णालयात पोहोचविले जाते. एका रुग्णाला पोहोचविण्यासाठी कमीत कमी सहा लोकांची गरज भासत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज कोणाला तरी या ओढ्यातून वाट काढत पांगारीपर्यंत आणावे लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.दोन तास आजारी व्यक्ती पाठीवरसांडवलीपासून पांगारीपर्यंत चालत येण्यासाठी दोन तास लागतात. आजारी व्यक्तीला पाठीवर घेऊन येथील गावकºयांना रुग्णालयात यावे लागते. तब्बल दोन तास आजारी व्यक्ती पाठीवर असल्यामुळे अनेकांना पाठदुखीचे त्रासही सुरू झाले आहेत. असे असतानाही एक माणुसकी म्हणून लोक एकमेकांना सहकार्य करत आहेत. परंतु अशा हालअपेष्टा अजून किती दिवस सुरू राहणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने उन्हाळ्यामध्येच या परिसरातील रस्त्यावर पूल आणि डांबरीकरण करणे आवश्यक आहे. तरच पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टळेल.गावच्या बाजूने पाणीच पाणीसांडवलीला जाण्यासाठी मोठी कसरत करावे लागते. पांगारी गावापर्यंत एकही वाहन गावाला जात नाही. कारण गावच्या दोन्ही बाजूंने मोठाले ओढे आहेत. हे ओढे पावसाळ्यात तुडुंब भरून वाहत असतात. अशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून ओढ्यातून रस्ता पार करत रुग्णालयात वेळेत रुग्णाला पोहोचवावे लागते. त्यातच रस्त्याची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मोठाले खड्डे आणि खचलेला रस्ता, अशी स्थिती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावकºयांना नेमके कसे जगावे, असा प्रश्न पडला आहे. प्रशासनाकडूनही या गावात कसल्याच सुविधा देण्यात आल्या नाहीत.अचानक पूर आला तर.सांडवलीहून पांगारीला येताना दोन्ही बाजुंनी ओढे आहेत. पावसाळ्यात या ओढ्यांना पूर येत असतो. तर कधी पाणी कमी असल्याने गावकरी ओढ्यातून मार्ग काढत पांगारीपर्यंत पोहोचतात. परंतु या ओढ्यातून जात असताना अचानक पूर आला तर. या विचाराने गावकºयांच्या मनात धडकी भरते. वर्षानुवर्षे सांडवलीचे गावकरी या संकटाचा सामना करत आहेत. मात्र, तरीही प्रशासन गप्प का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. यंदाचा पावसाळा संपल्यानंतर तरी रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.