शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

घ्या कांदाऽ बटाटाऽऽ आवाजाने दुमदुमली मंडई

By admin | Updated: December 2, 2014 23:29 IST

नवीन भाजी मार्केट सुरू : अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली

सातारा : राजवाडा येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्रतापसिंह भाजी मंडई व फ्रूट मार्केट आजपासून सुरू झाले. गेले कित्येक वर्ष विक्रेत्यांनी पाहिलेली प्रतिक्षा आज सत्कारर्णी लागली. अत्याधुनिक अशा नव्या जागेत विक्रेत्यांना जागा उपलब्ध झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणीत झाला होता.वर्षानुवर्ष उन्हातान्हात बसून सातारकरांना ताज्या भाज्या देणारे विक्रेते दुर्लक्षीत झाले होते. त्यामुळे पालिकेने या विक्रेत्यांची दखल घेऊन अत्याधुनिक अशी प्रतापसिंह भाजी मंडई उभारली. या नव्या मंडईमध्ये एकूण १०२ कट्टे बांधण्यात आले. काही दिवसांपूर्वी लीलाव पद्धतीने ८५ कट्टे विक्रेत्यांना देण्यात आले. मात्र अद्याप काहीजणांना कट्टे मिळाले नाहीत. त्यामुळे काही विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. दरम्यान मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी मंगळवारी या नव्या मंडईमध्ये विक्रेत्यांना बसण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर विक्रेत्यांनी भाजी विकण्यास सुरूवात केली. मुभलक जागा, हवेशीर ठिकाण, स्वच्छता आणि उन, वारा, पाऊस यापासून सुरक्षा मिळाल्याने विक्रेत्यांमधील उत्साह बघण्याजोगा होता. मोठ-मोठ्याने आवाज देत गिऱ्हाईकांना आकर्षीत करण्यासाठी विक्रेत्यांची अक्षरश: चढाओढ सुरू होती. मंडईच्या प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढून गिऱ्हाईकांचे स्वागत करण्यात आले. मंडईच्या एका कोपऱ्यामध्ये सत्यनारायणची पुजा मांडण्यात आली. मंडईत येणाऱ्या प्रत्येका प्रसाद दिला जात होता.काही विक्रेत्यांनी कट्यावर अगरबत्ती लावल्यामुळे वातावरण प्रसन्न झाले होते. (प्रतिनिधी)काही विक्रेते नाराज मंडईमध्ये काही विक्रेत्यांना अद्याप जागा मिळाली नाही. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये नाराजी आहे. ज्या लोकांनी नातेवाईकांच्या नावावर कट्टे घेतले आहेत. तसेच ज्यांकडे डबल कट्टे आहेत, अशा लोकांचे कट्टे काढून घेऊन इतरांना द्यावेत, अशी चर्चा विक्रेत्यांमधून सुरू होती.