शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST

वाई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून वाई तालुका शिवसेनेच्या संपर्क नेत्यांनी व पदाधिकारी पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन ...

वाई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून वाई तालुका शिवसेनेच्या संपर्क नेत्यांनी व पदाधिकारी पश्चिम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या भागाचा दौरा करून आपत्तीग्रस्त लोकांना अन्नधान्याच्या माध्यमातून मदतसुध्दा केली आहे.

त्यावेळी नैसर्गिक आपत्तीसंदर्भात अनेक गोष्टी समोर आल्या असून, त्यांचे योग्य निवारण झाल्यास दरवर्षी भूस्खलनासारखी परिस्थिती ओढावणार नाही. महाराष्ट्रातील सह्याद्री रांगा कोकणसह अर्ध्या महाराष्ट्राचे संरक्षण करण्याचे काम करीत असताना त्याच डोंगररांगा आपल्या काळ बनून उभ्या राहिल्याने वाई पश्चिम भागातील अनेक गावे नामशेष होतायत की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला मानवाच्या अनेक चुका कारणीभूत असून, यातून काही तरी शिकण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे. या भागात प्रत्येक विभागाने सतर्क राहण्याची गरज आहे. खालील उपाययोजना कराव्यात, अशा आशयाचे लेखी निवेदन शिवसेनेच्यावतीने तहसीलदार रणजित भोसले यांना देण्यात आले आहे.

निवेदनात असेही म्हटले आहे, वाईच्या पश्चिम भागात दरवर्षी लावण्यात येणाऱ्या वणव्यावर १०० टक्के बंदी घाला, त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला कारणीभूत ठरविण्यात येऊन दंड आकारण्यात यावा, या भागात पशुपालन कमी झाले असून, त्यांची सख्या मर्यादित झाल्याने डोंगरातील गवत खाणारी जनावरेच संपल्याने, वाढलेले गवत वणवा लावण्यास प्रवृत्त करते, उघड्या डोंगरावर झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात यावीत, शेताच्या बांधावर तणनाशक फवारणी करणे बंद करण्यात यावे, तणनाशकामुळे बांध निर्जीव होऊन शेती वाहून जाण्यास मदत मिळत आहे, या भागातील ओढ्यांवर कमानीचे पूल बांधण्यात यावेत, पाईप टाकल्यास पाण्याबरोबर झाडे-झुडपे वाहून आल्यास पाईपच्या तोंडाशी ती अडकून राहतात व पुलाशेजारील जमिनीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

जांभळी व जोर या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असावे, तसेच प्रत्येक उपकेंद्राला हक्काची रुग्णवाहिका असावी, जेणेकरून एखादी दुर्घटना घडल्यास जीविताला धोका निर्माण होण्यापासून वाचू शकते. वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार व्हावा, अशी मागणी वाई तालुका शिवसेनेने निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे. निवेदनावर तालुकाप्रमुख अनिल शेंडे, उपतालुकाप्रमुख विवेक भोसले, शहरप्रमुख गणेश जाधव, योगेश चंद्रस, किरण खामकर, गौतम यादव, नितीन पानसे, सोमनाथ अवसरे, सुरेश चव्हाण, संतोष पोफळे यांच्या सह्या आहेत.