शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

भाजीबरोबर जिवाचीही काळजी घ्या..!

By admin | Updated: December 5, 2014 23:39 IST

साताऱ्यातील चित्र : मंडईच्या संघटनांचा वाद बेततोय जिवावर

सातारा : येथील जुना मोटार स्टँड व महात्मा फुले भाजी मंडई यांच्या वादात मंडई रस्त्यावर आली आहे. मुळातच जुना मोटार स्टँडचा रस्ता अरूंद असून यामध्येच भाजी विक्रेते बसत असून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना लागूनच वाहने जात असल्याने ग्राहकांना जीव मुठीत घेऊनच येथे भाजी खरेदी करावी लागत आहे. या दोन्ही संघटना जागेच्या वादावरून कोर्टात गेले असले तरी ग्राहकांच्या संरक्षणासंदर्भात पालिका व संघटना यांनी हात वर केले आहेत.शहरातील नावाजलेली मंडई म्हणून जुना मोटार स्टँडवरील मंडईकडे बघितले जाते. आजही या मंडईत ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग भाजी विक्रीसाठी येत आहे तर ग्राहकांचाही कल या मंडईकडे मोठा असल्याने रविवार आणि गुरुवारी मंडईत मोठी गर्दी असते तर याच मंडई परिसरात अवजड वाहने दुरुस्तीची दुकाने, पेट्रोल दवाखाने यांचाही समावेश असल्याने वाहनांची वर्दळ येथे सतत असते. बाजारादिवशीतर येथील वाहतुकच ठप्प होत आहे.दरम्यान महात्मा फुले भाजी मंडईही मागील दहा वर्षांपूर्वी बांधण्यात आली. पाणी, लाईट, कट्टे, शौचालय अशा सर्व सोयीनियुक्त ही भाजी मंडई बांधली असून जुनी मंडई याठिकाणी स्थलांतरीत करण्यात आली. परंतु अनेक वर्षांपासून काही भाजी विक्रेते सध्या मंडईतच बसत आहेत. यावरून दोन्ही मंडईतील संघटनांनी कोर्टात धाव घेतली आहे. ही मंडई कोठे भरवायची याचा निकाल लागला नसल्याने विक्रेते आता जुन्या मोटार स्टँड रस्त्यावर बसतात. त्यामुळे संपूर्ण रहदारीच ठप्प झाली आहे. काही मद्यपीही येथे बेधडक वाहने वालवित आहेत अनेकदा वाहनधारक व ग्राहकांची हमरीतुमरी झाली आहे. स्टँडवर अवडज वाहनांची मोठी संख्या आहे. यामुळे येथून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागते. आज यामुळे येथे कोणताही अनर्थ होऊ शकतो. याची कल्पना देऊनही वाहतुक पोलीस, पालिका आणि मंडईची संघटना गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे ग्राहक मंडईत काळजी घेत भाजी घेत आहेत. (प्रतिनिधी)बाजारादिवशी धोका अधिकगुरुवार व रविवार या मंडईच्या बाजारादिवशी अनेक विक्रेते रस्त्याच्या मधोमध आपली दुकाने लावून विक्री करतात. अनेकवेळा भाजी घेताना ग्राहकांना वाहनांचा धक्का लागत आहे. बाजारदिवशी अनेक विक्रेत्यांनी रस्त्यावर भाजीपाल्याच्या पाट्या ठेवल्याने यात वाहने यात अडकून राहत होती तर काही वेळा वाहने ग्राहकांना धक्का देऊन पुढे जात होती.बाजारादिवशी धोका अधिकगुरुवार व रविवार या मंडईच्या बाजारादिवशी अनेक विक्रेते रस्त्याच्या मधोमध आपली दुकाने लावून विक्री करतात. अनेकवेळा भाजी घेताना ग्राहकांना वाहनांचा धक्का लागत आहे. बाजारदिवशी अनेक विक्रेत्यांनी रस्त्यावर भाजीपाल्याच्या पाट्या ठेवल्याने यात वाहने यात अडकून राहत होती तर काही वेळा वाहने ग्राहकांना धक्का देऊन पुढे जात होती.