शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: September 1, 2014 23:06 IST

वजराई धबधबा : पर्यटकांकडून पुन्हा विनापावत्या शुल्कवसुली केल्याची तक्रार

सातारा : भारतातील सर्वांत उंच वजराई धबधबा सातारा तालुक्यातील भांबवली गावाच्या हद्दीत असताना कासला येणाऱ्या पर्यटकांकडून विनापावत्या शुल्क घेण्यास पुन्हा एकदा प्रारंभ झाला असल्याची तक्रार भांबवली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भांबवलीच्या सरपंच नवाबाई मोरे आणि ग्रामस्थ मंडळ यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी शुल्कवसुली बंद करण्याचे आदेश कास येथील संबंधितांना देण्यात आले असूनही पुन्हा एकदा ‘कास-वजराई धबधबा’ असे फलक लावून विनापावत्या शुल्कवसुली सुरू झाली आहे. हा धबधबा भांबवली गावच्या हद्दीत असून, ‘विकिपीडिया’नेही त्याची दखल घेतली आहे. माध्यमांमुळे हा धबधबा प्रसिद्ध झाल्यानंतर गेल्या वर्षी त्याचा गैरफायदा घेण्यासाठी ‘कास-वजराई धबधबा’ असे फलक लावून कासला आलेल्या पर्यटकांना धबधब्याचे वरचे टोक दाखवून दिशाभूल आणि फसवणूक केली जात होती. पावतीपुस्तकाद्वारे पैसे गोळा केले जात होते.भांबवली वन हक्क समितीने या बेकायदा गोष्टी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. कास गाव जावली तालुक्यात असल्याने जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांनी जावलीच्या तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. तहसीलदारांनी मेढा पोलिसांना आदेश देऊन कासमधील संबंधितांना त्यांच्यासमोर हजर करण्यास सांगितले. तहसीलदारांनी कास ग्रामस्थांना बेकायदा वसुली बंद करण्याचे तसेच ‘कास-वजराई धबधबा’ हा अनधिकृत फलक काढून टाकण्याचे आदेश दिले. असे अनधिकृत कृत्य केल्यास कारावास व पुन्हा असे कृत्य केल्यास कारावास व दंडठोठावण्यात येईल, अशी तंबी दिली. ग्रामस्थांनी अजाणतेपणी झालेल्या चुकीची माफी मागितली आणि आदेशाचे पालन करण्याचे मान्य केले. तथापि, यंदाच्या हंगामातही ‘कास-वजराई धबधबा’ असा अनधिकृत फलक कास मंदिराजवळ लावून काही ग्रामस्थ पर्यटकांची फसवणूक करीत आहेत आणि विनापावत्या पैसे लुबाडले जात आहेत.’ (प्रतिनिधी)कायमची बंदी घालाजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या अदेशाची पायमल्ली झालेली असल्यानेमुळे कारवाईची गरज आहे. पर्यटकांची दिशाभूल, फसवणूक आणि लुबाडणुकीबद्दल कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करावी. संबंधितांवर भारतीय दंडविधानाच्या कलम ४१५ आणि ४२० अंतर्गत कारवाई करावी. तसेच वन विभागाच्या नोंदीप्रमाणे वजराई धबधबा भांबवली गावच्या हद्दीत येत असल्याने ‘कास-वजराई धबधबा’ हे नाव वापरण्यास कायमची बंदी घालावी, अशा मागण्या ग्रामस्थ मंडळाने केल्या आहेत.