शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

दुधात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:29 IST

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ करून कृत्रिम दूध तयार केले जात आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत ...

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ करून कृत्रिम दूध तयार केले जात आहे. गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या आहारात अविभाज्य घटक असलेल्या दुधात युरिया, पामतेल, मेलामाईन यांसारखे घातक रसायन मिसळून स्वत:चे उखळ पांढरे करण्याचा गोरखधंदा दूध संकलन करणाऱ्यांनी मांडला आहे. भेसळ करणाऱ्यांवर अंकुश ठेवता येईल, यासाठी राज्य सरकारने कायद्यामध्ये बदल करून प्रशासन अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात दूध भेसळ किंवा अन्न भेसळ झाली असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी अन्न भेसळ अधिकाऱ्यांवर निश्चित करावी. शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध उत्पादन घेतात; मात्र जिल्ह्यात खासगी दूध संस्था आणि दूध प्रक्रिया उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ करून पैसे मिळवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. जिल्ह्यात दररोज लाखो लिटर दुधाचे संकलन होत असताना गत काही वर्षात अन्न भेसळ विभागाने अपवाद वगळता कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे सर्व काही आलबेल आहे की गोलमाल आहे, हे नक्की सांगता येत नाही. दुधात भेसळ करण्याचे प्रमाण आणि संबंधित प्रशासनाच्या कार्यवाहीकडे पाहता दूध भेसळीचा हा गोरखधंदा प्रशासनाच्या वरदहस्ताने सुरू नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना साताराच्या अन्न-औषध प्रशासन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, जिल्हाध्यक्ष सुशांत गोळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोळी, तालुकाध्यक्ष किरण गोडसे, सागर शेळके आदी उपस्थित होते.