शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

कंपनी व्यवस्थापनाविरोधात प्रतीकात्मक अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:42 IST

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील औद्योगिकीकरणामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रामीण भागात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. याला आळा ...

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील औद्योगिकीकरणामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रामीण भागात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी कंपन्या बंद ठेवण्याची मागणी करत खंडाळा तहसील कार्यालयावर अंत्ययात्रा काढून मागणीचे निवेदन देण्यात आले.

खंडाळा तालुक्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी असंवेदनशील असलेल्या प्रशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांना निवेदन देण्यात आले. दि. ७ ते २३ मेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून सर्व कारखाने बंद न ठेवल्यास तहसील कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

शासनाने लॉकडाऊनचे नियम व निर्बंध कडक केले असले तरी कंपनी प्रशासनाचे वागणे बेजबाबदार असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर तालुक्यात अनेक कंपन्यांमध्ये येणारे कामगार कोरोनाची चाचणी खासगी लॅबमध्ये करीत आहेत. अनेक जण सोयीस्कर रिपोर्ट घेत असल्याने ते इतर लोकांमध्ये वावरत असतात. त्यातीलच काही पॉझिटिव्ह झाल्यास त्याचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे कंपनी प्रशासनाने सरकारी तपासणी करणे गरजेचे आहे, अथवा कंपनीने कामगारांची स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे. पण असे घडताना दिसत नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व कंपन्या बंद ठेवाव्यात, अशी आग्रही मागणी केली आहे.

याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे, अनिरुद्ध गाढवे, प्रा. एस. वाय. पवार, प्रदीप माने, रामदास कांबळे, गणेश जाधव, सागर ढमाळ, अंकुश पवार, चंद्रकांत ढमाळ, गोविंद गाढवे, सुजीत डेरे, श्रीकांत घाटे, अजय धायगुडे, प्रमोद जाधव, राजेंद्र नेवसे, शैलेश गाढवे आदी उपस्थित होते.