शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात कारखान्यांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाठार स्टेशन : यंदाच्या गाळप हंगामात सातारा जिल्हा साखर उत्पादनाचा आतापर्यंतचा उच्चांक मोडणार, अशी चांगली परिस्थिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाठार स्टेशन : यंदाच्या गाळप हंगामात सातारा जिल्हा साखर उत्पादनाचा आतापर्यंतचा उच्चांक मोडणार, अशी चांगली परिस्थिती असताना जिल्ह्यातील कारखानदार मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला जाहीर एफआरपी दर देताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. जिल्ह्यातील सात कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे.

सध्या जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांतून ऊस गाळप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, गाळप केलेल्या उसाचे पेमेंट देण्याबाबतीत कारखाने शेतकऱ्यांशी लपंडाव खेळत आहेत, त्यामुळे आज करोडो रुपयांची देणी कारखान्याकडे थकीत आहेत चालू हंगामात तर ऊस दराचा एफआरपी कायदाही कारखानदारांनी बासनात गुंडाळला आहे. असे असताना शासन, सरकारही या बाबतीत कोणतीही कारवाई करीत नसल्याने ऊस जाऊनही हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

याबाबत प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे साखर विभाग, पुणे यांनी सातारा जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांवर ऊस नियंत्रण आदेश १९६६ चे कलम ३(८) मधील तरतुदीनुसार महसुली वसुली प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबतची नोटीस देऊन सुनावणी घेतली. मात्र, या सुनावणीला कारखान्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना पाटण, किसनवीर सह. साखर कारखाना भुईज, शरयू, ग्रीन पाॅवर, कृष्णा, स्वराज व जरंडेश्वर या कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थकीत ठेवली असल्याने, थकीत एफआरपी रकमेच्या वसुलीसाठी सदर कारखान्यांविरुद्धचे ऊस नियंत्रण आदेश १९६६ कलम ३ (८) मधील तरतुदीनुसार महसुली वसुली प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे असा अहवाल धनंजय डोईफोडे प्रादेशिक सहसंचालक, साखर पुणे यांनी राज्याच्या साखर आयुक्तांकडे दिला आहे. त्यामुळे लवकरच राज्याचे साखर आयुक्त या बाबतीत निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे

साखर आयुक्तांची कारवाई होईल तेव्हा होईल, मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत एफआरपीचा कायदा नेहमीच मोडण्याचे काम साखर कारखानदार करीत आहेत, खरे तर या कायद्याचा धाक कारखानदारांना राहिला नाही, हीच खरी परिस्थिती आहे.

गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. नुसत्या सातारा जिल्ह्यात आजअखेर ८० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. अजून किमान अडीच ते तीन महिन्यांचा हंगाम बाकी आहे. गाळप समाधानकारक होत असले तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र ऊस दर मिळविण्यासाठी कारखान्याचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. याबाबत शासनाने कारखानाधारकांबाबतीत ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.

---------------------------

गेल्या अनेक वर्षांपासून ऊस दरासाठी कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवीत आहेत, काही मोजके कारखाने वगळता इतर सर्वच कारखाने एफआरपी देत नाहीत, त्यामुळे सरकारने एफआरपी कायद्यात सुधारणा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी.

मनोज कदम, शेतकरी, देऊर

--------------------------------