शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात कारखान्यांवर टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाठार स्टेशन : यंदाच्या गाळप हंगामात सातारा जिल्हा साखर उत्पादनाचा आतापर्यंतचा उच्चांक मोडणार, अशी चांगली परिस्थिती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वाठार स्टेशन : यंदाच्या गाळप हंगामात सातारा जिल्हा साखर उत्पादनाचा आतापर्यंतचा उच्चांक मोडणार, अशी चांगली परिस्थिती असताना जिल्ह्यातील कारखानदार मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला जाहीर एफआरपी दर देताना त्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहेत. जिल्ह्यातील सात कारखान्यांवर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे.

सध्या जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांतून ऊस गाळप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, गाळप केलेल्या उसाचे पेमेंट देण्याबाबतीत कारखाने शेतकऱ्यांशी लपंडाव खेळत आहेत, त्यामुळे आज करोडो रुपयांची देणी कारखान्याकडे थकीत आहेत चालू हंगामात तर ऊस दराचा एफआरपी कायदाही कारखानदारांनी बासनात गुंडाळला आहे. असे असताना शासन, सरकारही या बाबतीत कोणतीही कारवाई करीत नसल्याने ऊस जाऊनही हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

याबाबत प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे साखर विभाग, पुणे यांनी सातारा जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांवर ऊस नियंत्रण आदेश १९६६ चे कलम ३(८) मधील तरतुदीनुसार महसुली वसुली प्रमाणपत्र निर्गमित करण्याबाबतची नोटीस देऊन सुनावणी घेतली. मात्र, या सुनावणीला कारखान्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना पाटण, किसनवीर सह. साखर कारखाना भुईज, शरयू, ग्रीन पाॅवर, कृष्णा, स्वराज व जरंडेश्वर या कारखान्यांनी एफआरपीची रक्कम थकीत ठेवली असल्याने, थकीत एफआरपी रकमेच्या वसुलीसाठी सदर कारखान्यांविरुद्धचे ऊस नियंत्रण आदेश १९६६ कलम ३ (८) मधील तरतुदीनुसार महसुली वसुली प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे असा अहवाल धनंजय डोईफोडे प्रादेशिक सहसंचालक, साखर पुणे यांनी राज्याच्या साखर आयुक्तांकडे दिला आहे. त्यामुळे लवकरच राज्याचे साखर आयुक्त या बाबतीत निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे

साखर आयुक्तांची कारवाई होईल तेव्हा होईल, मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांबाबत एफआरपीचा कायदा नेहमीच मोडण्याचे काम साखर कारखानदार करीत आहेत, खरे तर या कायद्याचा धाक कारखानदारांना राहिला नाही, हीच खरी परिस्थिती आहे.

गाळप हंगाम सुरू होऊन जवळपास चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. नुसत्या सातारा जिल्ह्यात आजअखेर ८० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. अजून किमान अडीच ते तीन महिन्यांचा हंगाम बाकी आहे. गाळप समाधानकारक होत असले तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र ऊस दर मिळविण्यासाठी कारखान्याचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. याबाबत शासनाने कारखानाधारकांबाबतीत ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.

---------------------------

गेल्या अनेक वर्षांपासून ऊस दरासाठी कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फसवीत आहेत, काही मोजके कारखाने वगळता इतर सर्वच कारखाने एफआरपी देत नाहीत, त्यामुळे सरकारने एफआरपी कायद्यात सुधारणा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी.

मनोज कदम, शेतकरी, देऊर

--------------------------------