शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

मातब्बरांकडून तलवारी म्यान

By admin | Updated: February 13, 2017 22:47 IST

कोरेगाव तालुक्यात अनपेक्षित घडामोडी : ६७ उमेदवारांनी घेतली माघार

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी ४९ उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांपैकी २७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता २२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. पंचायत समितीच्या दहा गणांसाठी ७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० जणांनी माघार घेतल्याने आता ३६ जण आपले नशीब आजमावत आहेत. गट व गणासाठी होणाऱ्या संघर्षपूर्ण लढतीकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे किन्हई पंचायत समिती गणातील उमेदवार तुकाराम वाघ यांनी अनपेक्षितरीत्या माघार घेतली, त्यानंतर काँग्रेसने लागोलाग अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या अ‍ॅड. अमोल राशीनकर यांचा पक्ष प्रवेश घडवत त्यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे. एकंदरीत तालुक्यात काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारी (दि. १३) सकाळी ११ ते दुपारी ३ ही वेळ ठेवली होती. त्यामुळे सकाळपासून तहसीलदार कार्यालय आवारात गर्दी होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापासून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी व पदाधिकाऱ्यांनी नाराजांची समजूत काढत त्यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राजी केले होते, त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांची फौज या परिसरात तैनात होती. राजकीयदृष्ट्या धगधगत्या पिंपोडे बुद्रुक गटात सर्वाधिक अर्ज दाखल झाले होते. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस होती. मतदारसंघ पुनर्रचनेनुसार हा गट फलटण विधानसभा मतदार संघात मोडत असल्याने तेथील निर्णय फलटणमधून होत होते. सकाळी या गटातून विद्यमान सदस्य सतीश धुमाळ, राहुल कदम, लालासाहेब शिंदे, सुधीर धुमाळ, शहाजी भोईटे, संभाजी शिंदे, आनंद भोईटे यांनी माघार घेतली. या गटात आता पंचरंगी लढत होणार आहे. वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातून ७ जणांनी माघार घेतल्याने आता तिरंगी लढत होत आहे. सातारारोड गटातून २, ल्हासुर्णे गटातून ६ तर वाठार किरोली गटातून ४ अर्ज माघारी घेण्यात आले.पंचायत समिती गणांमध्ये सर्वाधिक अर्ज पिंपोडे बुद्रुक गणात दाखल झाले होते. तेथे ८ जणांनी माघार घेतली असून, तेथे चौघेजण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. देऊर गणामध्ये ३, वाठार स्टेशन गणामध्ये ४, किन्हई गणामध्ये ६, सातारारोड गणामध्ये ३, कुमठे गणामध्ये १, ल्हासुर्णे गणामध्ये २, एकंबे गणामध्ये ५, साप गणामध्ये ३ तर वाठार किरोली गणामध्ये ५जणांनी माघार घेतली. एकंदरीतकाही गणांमध्ये दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)