शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मातब्बरांकडून तलवारी म्यान

By admin | Updated: February 13, 2017 22:47 IST

कोरेगाव तालुक्यात अनपेक्षित घडामोडी : ६७ उमेदवारांनी घेतली माघार

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच गटांसाठी ४९ उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांपैकी २७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे आता २२ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. पंचायत समितीच्या दहा गणांसाठी ७६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० जणांनी माघार घेतल्याने आता ३६ जण आपले नशीब आजमावत आहेत. गट व गणासाठी होणाऱ्या संघर्षपूर्ण लढतीकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे किन्हई पंचायत समिती गणातील उमेदवार तुकाराम वाघ यांनी अनपेक्षितरीत्या माघार घेतली, त्यानंतर काँग्रेसने लागोलाग अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असलेल्या अ‍ॅड. अमोल राशीनकर यांचा पक्ष प्रवेश घडवत त्यांची उमेदवारी पुरस्कृत केली आहे. एकंदरीत तालुक्यात काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारी (दि. १३) सकाळी ११ ते दुपारी ३ ही वेळ ठेवली होती. त्यामुळे सकाळपासून तहसीलदार कार्यालय आवारात गर्दी होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापासून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी व पदाधिकाऱ्यांनी नाराजांची समजूत काढत त्यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी राजी केले होते, त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांची फौज या परिसरात तैनात होती. राजकीयदृष्ट्या धगधगत्या पिंपोडे बुद्रुक गटात सर्वाधिक अर्ज दाखल झाले होते. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस होती. मतदारसंघ पुनर्रचनेनुसार हा गट फलटण विधानसभा मतदार संघात मोडत असल्याने तेथील निर्णय फलटणमधून होत होते. सकाळी या गटातून विद्यमान सदस्य सतीश धुमाळ, राहुल कदम, लालासाहेब शिंदे, सुधीर धुमाळ, शहाजी भोईटे, संभाजी शिंदे, आनंद भोईटे यांनी माघार घेतली. या गटात आता पंचरंगी लढत होणार आहे. वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटातून ७ जणांनी माघार घेतल्याने आता तिरंगी लढत होत आहे. सातारारोड गटातून २, ल्हासुर्णे गटातून ६ तर वाठार किरोली गटातून ४ अर्ज माघारी घेण्यात आले.पंचायत समिती गणांमध्ये सर्वाधिक अर्ज पिंपोडे बुद्रुक गणात दाखल झाले होते. तेथे ८ जणांनी माघार घेतली असून, तेथे चौघेजण निवडणूक रिंगणात राहिले आहेत. देऊर गणामध्ये ३, वाठार स्टेशन गणामध्ये ४, किन्हई गणामध्ये ६, सातारारोड गणामध्ये ३, कुमठे गणामध्ये १, ल्हासुर्णे गणामध्ये २, एकंबे गणामध्ये ५, साप गणामध्ये ३ तर वाठार किरोली गणामध्ये ५जणांनी माघार घेतली. एकंदरीतकाही गणांमध्ये दुरंगी, काही ठिकाणी तिरंगी व चौरंगी लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)