शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आजीबार्इंच्या बटव्यात ‘स्वाईन फ्लू’चा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:08 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘स्वाईन फ्लू’ने थैमान घातले असताना सातारा जिल्ह्यातही स्वाईन फ्लू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांत या आजाराने काही रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हा आजार टाळण्यासाठी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असताना नागरिकांनीही घरगुती उपाययोजना करण्याकडे ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘स्वाईन फ्लू’ने थैमान घातले असताना सातारा जिल्ह्यातही स्वाईन फ्लू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांत या आजाराने काही रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हा आजार टाळण्यासाठी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असताना नागरिकांनीही घरगुती उपाययोजना करण्याकडे भर दिला आहे.स्वाईन फ्लूचा संसर्ग प्रामुख्याने डुकराद्वारे होतो. संसर्गजन्य आजार असल्याने तो एका व्यक्तीला झाल्यास दुसºया व्यक्तीला होतो. स्वाईन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार हा रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम व त्याची थुंकी यांमधून होतो. राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने थैमान घातले असून, आजपर्यंत अनेक रुग्ण दगावले आहेत. सातारा जिल्ह्यातही हळूहळू हा आजार डोके वर काढू लागला आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील जावळी, कोरेगाव, कºहाड व सातारा तालुक्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू सदृश रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दगावले आहेत.स्वाईन फ्लूची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेने ठोस पावले उचलली आहेत. आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविली जात असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. एकीकडे आरोग्य विभाग हा संसर्ग टाळण्यासाठी सतर्क झाला आहे.काही घरगुती उपायतज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी. त्याचा वारंवार वास घेतल्याने स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणेही फायदेशीर ठरू शकते. लवंत, आद्रक, विलायची यांचासमावेश असलेला चहा दररोज घेतल्यास स्वाईन फ्लूपासून रक्षण होते.हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत. गर्दीत जाणे टाळावे.खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावावा. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.पौष्टिक आहार घ्यावा.सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे.आहारात पातळ पदार्थ घ्यावेत. तोंडावर मास्क लावावा.