शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आजीबार्इंच्या बटव्यात ‘स्वाईन फ्लू’चा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 23:08 IST

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘स्वाईन फ्लू’ने थैमान घातले असताना सातारा जिल्ह्यातही स्वाईन फ्लू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांत या आजाराने काही रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हा आजार टाळण्यासाठी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असताना नागरिकांनीही घरगुती उपाययोजना करण्याकडे ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ‘स्वाईन फ्लू’ने थैमान घातले असताना सातारा जिल्ह्यातही स्वाईन फ्लू सदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पंधरा दिवसांत या आजाराने काही रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. हा आजार टाळण्यासाठी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असताना नागरिकांनीही घरगुती उपाययोजना करण्याकडे भर दिला आहे.स्वाईन फ्लूचा संसर्ग प्रामुख्याने डुकराद्वारे होतो. संसर्गजन्य आजार असल्याने तो एका व्यक्तीला झाल्यास दुसºया व्यक्तीला होतो. स्वाईन फ्लूच्या विषाणूंचा प्रसार हा रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम व त्याची थुंकी यांमधून होतो. राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूने थैमान घातले असून, आजपर्यंत अनेक रुग्ण दगावले आहेत. सातारा जिल्ह्यातही हळूहळू हा आजार डोके वर काढू लागला आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील जावळी, कोरेगाव, कºहाड व सातारा तालुक्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू सदृश रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दगावले आहेत.स्वाईन फ्लूची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेने ठोस पावले उचलली आहेत. आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविली जात असून, जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. एकीकडे आरोग्य विभाग हा संसर्ग टाळण्यासाठी सतर्क झाला आहे.काही घरगुती उपायतज्ज्ञांच्या मते कापूर आणि विलायची बारीक करून कपड्यात छोटी पुरचुंडी बांधून ठेवावी. त्याचा वारंवार वास घेतल्याने स्वाइन फ्लूसह इतर ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखीपासून आपण स्वत:चा बचाव करू शकतो. तसेच नीलगिरीच्या तेलाची वाफ घेणेही फायदेशीर ठरू शकते. लवंत, आद्रक, विलायची यांचासमावेश असलेला चहा दररोज घेतल्यास स्वाईन फ्लूपासून रक्षण होते.हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत. गर्दीत जाणे टाळावे.खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावावा. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.पौष्टिक आहार घ्यावा.सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे.आहारात पातळ पदार्थ घ्यावेत. तोंडावर मास्क लावावा.