शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मावळ्यांच्या त्यागातून स्वराज्य निर्माण झाले

By admin | Updated: April 21, 2015 01:00 IST

शिवचरित्रकार रोहिदास हांडे : लक्ष्मणराव भरगुडे-पाटील व्याख्यानमाला

खंडाळा : ‘राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय आदर्श आणि राष्ट्रीय शौर्य यांचा त्रिवेणी संगम शिवशाहीत होता. कोणत्याही मोहिमेचे योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी या बळावर शिवरायांनी यश मिळविले. मावळ्यांच्या त्यागातून हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यागी जीवनाचा अंगीकार केल्याखेरीज पुन्हा सुराज्य घडणार नाही, त्यासाठीच आजच्या समाजाला शिवरायांच्या विचारांची गरज आहे म्हणूनच राष्ट्र निर्माणासाठी तरुणांनी पुढे यावे,’ असे आवाहन शिवचरित्रकार रोहिदास हांडे यांनी केले. पळशी, ता. खंडाळा येथे दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘शिवरायांचे मावळे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, मिलिंद देशपांडे, लक्ष्मण वीर, सरपंच मनीषा भरगुडे, उपसरपंच सीताबाई भरगुडे, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष अशोक भरगुडे, सदस्या उज्ज्वला चव्हाण, सुनीता भरगुडे आदी प्रमुख उपस्थित होते. हांडे म्हणाले, ‘पळशी गावाला सांस्कृतिक वारसा आहे. एकीच्या बळावर समृद्ध खेडी पाहायचे असेल तर पळशीचा आदर्श घ्यावा लागेल. मॉरिसेस दौऱ्यावरही पळशी गावच्या कामाचा प्रसार करणार आहोत. गाव आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी संस्कृतीची जोपासना गरजेची आहे. बलशाली भारत घडविण्यासठी प्रत्येकाने सहानुभूतीने जगण्यापेक्षा स्वाभिमानाने मरण आले तरी ते स्वीकारले पाहिजे.’नितीन भरगुडे-पाटील म्हणाले, ‘जीवनात प्रत्येकाला आई-वडील समजले पाहिजेत. ज्यांच्यामुळे आपले जीवन आहे. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम पळशी ग्रामस्थांनी केले आहे. व्याख्यानमालेतून विचारधारा घराघरात पोहोचली म्हणूनच गावची एकी अबाधित राहिली आहे.’यावेळी माजी सभापती दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अशोक भरगुडे यांनी स्वागत केले. रमेश भरगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)