शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

मावळ्यांच्या त्यागातून स्वराज्य निर्माण झाले

By admin | Updated: April 21, 2015 01:00 IST

शिवचरित्रकार रोहिदास हांडे : लक्ष्मणराव भरगुडे-पाटील व्याख्यानमाला

खंडाळा : ‘राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय आदर्श आणि राष्ट्रीय शौर्य यांचा त्रिवेणी संगम शिवशाहीत होता. कोणत्याही मोहिमेचे योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी या बळावर शिवरायांनी यश मिळविले. मावळ्यांच्या त्यागातून हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यागी जीवनाचा अंगीकार केल्याखेरीज पुन्हा सुराज्य घडणार नाही, त्यासाठीच आजच्या समाजाला शिवरायांच्या विचारांची गरज आहे म्हणूनच राष्ट्र निर्माणासाठी तरुणांनी पुढे यावे,’ असे आवाहन शिवचरित्रकार रोहिदास हांडे यांनी केले. पळशी, ता. खंडाळा येथे दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘शिवरायांचे मावळे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, मिलिंद देशपांडे, लक्ष्मण वीर, सरपंच मनीषा भरगुडे, उपसरपंच सीताबाई भरगुडे, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष अशोक भरगुडे, सदस्या उज्ज्वला चव्हाण, सुनीता भरगुडे आदी प्रमुख उपस्थित होते. हांडे म्हणाले, ‘पळशी गावाला सांस्कृतिक वारसा आहे. एकीच्या बळावर समृद्ध खेडी पाहायचे असेल तर पळशीचा आदर्श घ्यावा लागेल. मॉरिसेस दौऱ्यावरही पळशी गावच्या कामाचा प्रसार करणार आहोत. गाव आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी संस्कृतीची जोपासना गरजेची आहे. बलशाली भारत घडविण्यासठी प्रत्येकाने सहानुभूतीने जगण्यापेक्षा स्वाभिमानाने मरण आले तरी ते स्वीकारले पाहिजे.’नितीन भरगुडे-पाटील म्हणाले, ‘जीवनात प्रत्येकाला आई-वडील समजले पाहिजेत. ज्यांच्यामुळे आपले जीवन आहे. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम पळशी ग्रामस्थांनी केले आहे. व्याख्यानमालेतून विचारधारा घराघरात पोहोचली म्हणूनच गावची एकी अबाधित राहिली आहे.’यावेळी माजी सभापती दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अशोक भरगुडे यांनी स्वागत केले. रमेश भरगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)