शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

मावळ्यांच्या त्यागातून स्वराज्य निर्माण झाले

By admin | Updated: April 21, 2015 01:00 IST

शिवचरित्रकार रोहिदास हांडे : लक्ष्मणराव भरगुडे-पाटील व्याख्यानमाला

खंडाळा : ‘राष्ट्रीय एकता, राष्ट्रीय आदर्श आणि राष्ट्रीय शौर्य यांचा त्रिवेणी संगम शिवशाहीत होता. कोणत्याही मोहिमेचे योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी या बळावर शिवरायांनी यश मिळविले. मावळ्यांच्या त्यागातून हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. त्यागी जीवनाचा अंगीकार केल्याखेरीज पुन्हा सुराज्य घडणार नाही, त्यासाठीच आजच्या समाजाला शिवरायांच्या विचारांची गरज आहे म्हणूनच राष्ट्र निर्माणासाठी तरुणांनी पुढे यावे,’ असे आवाहन शिवचरित्रकार रोहिदास हांडे यांनी केले. पळशी, ता. खंडाळा येथे दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘शिवरायांचे मावळे’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, मिलिंद देशपांडे, लक्ष्मण वीर, सरपंच मनीषा भरगुडे, उपसरपंच सीताबाई भरगुडे, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष अशोक भरगुडे, सदस्या उज्ज्वला चव्हाण, सुनीता भरगुडे आदी प्रमुख उपस्थित होते. हांडे म्हणाले, ‘पळशी गावाला सांस्कृतिक वारसा आहे. एकीच्या बळावर समृद्ध खेडी पाहायचे असेल तर पळशीचा आदर्श घ्यावा लागेल. मॉरिसेस दौऱ्यावरही पळशी गावच्या कामाचा प्रसार करणार आहोत. गाव आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी संस्कृतीची जोपासना गरजेची आहे. बलशाली भारत घडविण्यासठी प्रत्येकाने सहानुभूतीने जगण्यापेक्षा स्वाभिमानाने मरण आले तरी ते स्वीकारले पाहिजे.’नितीन भरगुडे-पाटील म्हणाले, ‘जीवनात प्रत्येकाला आई-वडील समजले पाहिजेत. ज्यांच्यामुळे आपले जीवन आहे. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे काम पळशी ग्रामस्थांनी केले आहे. व्याख्यानमालेतून विचारधारा घराघरात पोहोचली म्हणूनच गावची एकी अबाधित राहिली आहे.’यावेळी माजी सभापती दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अशोक भरगुडे यांनी स्वागत केले. रमेश भरगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)