शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरपी’च्या तीन तुकड्यांविरुद्ध स्वाभिमानीचा एल्गार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST

औंध : ‘एफआरपी’चे तीन तुकडे करण्याचा कट साखर कारखानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आडून केला असून, त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी ...

औंध : ‘एफआरपी’चे तीन तुकडे करण्याचा कट साखर कारखानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आडून केला असून, त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे यांनी रविवारी दिली.

माहिती देताना घार्गे म्हणाले, ‘ऊस उत्पादकांची १२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर मिस्डकॉल मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेतून मिळालेला डेटा सुप्रीम कोर्टात या व्यापक कटाविरोधात वापरण्यात येणार आहे.

या निर्णयानुसार साठ टक्के रक्कम ऊस तुटल्यानंतर १५ दिवस ते १ महिन्यात, २० टक्के रक्कम कारखाना बंद झाल्यावर व उर्वरित २०टक्के रक्कम पुढील गळीत हंगाम सुरू झाल्यावर मिळणार आहे.

शेतकऱ्यांचे एकरकमी एफआरपीचे कायदेशीर कवचच शासन काढून घेत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या लढ्यात उतरणे आवश्यक आहे. शेतकरी मोठ्या आशेने उसाचे पीक घेऊ लागला आहे, त्यावर त्याचे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. या पद्धतीने तुकडे होऊन घामाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही.

आता लढा दिला नाही तर ऊस उत्पादकांचे भविष्य अंधारात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मिस कॉल द्यावा, असे आवाहन घार्गे यांनी केले आहे.

कोट..

शेतकऱ्यांना जर उसाचे पैसे तीन टप्प्यांत घ्यावे लागतील तर बँकांच्या कर्जाचे हप्ते, दवाखान्यातील बिल, विजेचे बिल, मोबाईल रिचार्ज यांसह अनेक गोष्टींचे तीन टप्पे शेतकऱ्यांनी पाडले तर चालतील का? शेतकऱ्यांची गळचेपी बंद करा, हीच आमची मागणी आहे.

- दत्तात्रय घार्गे, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी