शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

‘एफआरपी’च्या तीन तुकड्यांविरुद्ध स्वाभिमानीचा एल्गार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST

औंध : ‘एफआरपी’चे तीन तुकडे करण्याचा कट साखर कारखानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आडून केला असून, त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी ...

औंध : ‘एफआरपी’चे तीन तुकडे करण्याचा कट साखर कारखानदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आडून केला असून, त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे यांनी रविवारी दिली.

माहिती देताना घार्गे म्हणाले, ‘ऊस उत्पादकांची १२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर मिस्डकॉल मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेतून मिळालेला डेटा सुप्रीम कोर्टात या व्यापक कटाविरोधात वापरण्यात येणार आहे.

या निर्णयानुसार साठ टक्के रक्कम ऊस तुटल्यानंतर १५ दिवस ते १ महिन्यात, २० टक्के रक्कम कारखाना बंद झाल्यावर व उर्वरित २०टक्के रक्कम पुढील गळीत हंगाम सुरू झाल्यावर मिळणार आहे.

शेतकऱ्यांचे एकरकमी एफआरपीचे कायदेशीर कवचच शासन काढून घेत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या लढ्यात उतरणे आवश्यक आहे. शेतकरी मोठ्या आशेने उसाचे पीक घेऊ लागला आहे, त्यावर त्याचे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. या पद्धतीने तुकडे होऊन घामाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले तर शेतकरी कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणार नाही.

आता लढा दिला नाही तर ऊस उत्पादकांचे भविष्य अंधारात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मिस कॉल द्यावा, असे आवाहन घार्गे यांनी केले आहे.

कोट..

शेतकऱ्यांना जर उसाचे पैसे तीन टप्प्यांत घ्यावे लागतील तर बँकांच्या कर्जाचे हप्ते, दवाखान्यातील बिल, विजेचे बिल, मोबाईल रिचार्ज यांसह अनेक गोष्टींचे तीन टप्पे शेतकऱ्यांनी पाडले तर चालतील का? शेतकऱ्यांची गळचेपी बंद करा, हीच आमची मागणी आहे.

- दत्तात्रय घार्गे, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी