शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

‘स्वाभिमानी’च्या नेत्यांची न्यायालयात हजेरी

By admin | Updated: August 25, 2015 23:46 IST

कोरेगावात गुरुवारी पुन्हा सुनावणी : शेट्टी, खोत, शिंदे यांची जामिनावर सुटका

कोरेगाव : तालुक्यात २०१३ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनातील तीन गुन्ह्यांमध्ये वॉरंट निघाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत व जिल्हाध्यक्ष शंकर शिंंदे हे मंगळवारी कोरेगाव न्यायालयात हजर झाले. तिघांनी जामीन दिला असून, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. हिंगसे यांनी याप्रकरणी गुरुवार, दि. ४ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. उसाला एफआरपीप्रमाणे दर द्यावा आदींसह शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी २०१३ साली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोरेगाव आणि परिसरात तीव्र आंदोलने केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे नोंद झाले होते. पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याच अनुषंगाने न्यायालयाने चौघांच्या विरोधात पकड वॉरंट काढले होते. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या परवानगीने खा. शेट्टी यांच्या विरोधातील वॉरंटची बजावणी करण्याचे निर्देश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एन. पाटील यांनी दिले होते. या प्रकरणाची दि. २५ आॅगस्ट २०१५ रोजी सुनावणी ठेवण्यात आली होती. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास खा. राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत व जिल्हाध्यक्ष शंकर शिंंदे हे जिल्हा संघटक संजय भगत, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय सुतार व तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह न्यायालयाच्या आवारात दाखल झाले. न्या. एस. एन. पाटील हे रजेवर असल्याने न्या. एस. एम. हिंगसे यांच्या न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे अ‍ॅड. कदम यांनी तिघांना सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या तीन गुन्ह्यांसाठी तिघांनी स्वतंत्रपणे जामीन दिल्यानंतर न्यायालयाने गुरुवारी सुनावणी ठेवली आहे. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी शेतकरी आंदोलनात आमच्या विरोधात हजारो खटले दाखल झाल्याचे सांगितले. आम्ही संविधान, न्यायव्यवस्थेचा आदर करुन त्यांचे पालन करत असल्याचे सांगितले. सध्या कांद्याच्या दराबाबत विनाकारण आदळआपट होत आहे. बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली आणि पुरवठा कमी झाल्यावर दरवाढ होणार, हे लक्षात घेतले पाहिजे. आज शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतात, म्हणून आरडाओरड करणे योग्य नाही. यापूर्वी शेतकऱ्यांना कांदा पिकात तोटा आला अगदी दोन रुपये किलो दराने कांदा विकावा लागला, काहींनी तर आर्थिक अडचणीत आल्याने आत्महत्या केल्या, त्यावेळी ओरड करणारे कोठे गेले होते, असा सवाल खा. शेट्टी यांनी केला. (प्रतिनिधी)भाई पंजाबराव पाटील यांनी अगोदरच घेतला जामीनन्यायालयाने चौघांच्या विरोधात वॉरंट काढल्यानंतर ज्येष्ठ नेते भाई पंजाबराव पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच स्वतंत्ररीत्या न्यायालयात येऊन जामीन घेतला आहे. ते आता वेगळ्या संघटनेत काम करत असल्याने त्यांनी आजच्या सुनावणी अगोदरच जामीन घेतला आहे.