शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अजिंक्यताऱ्यावर स्वाभिमान दिन साजरा-सनईच्या सुरात कार्यक्रमाला रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:45 IST

किल्ले अजिंक्यताºयाचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले होते. राजसदरही सजवण्यात आली होती. सकाळच्या गार वाºयाला राजसदरेवर मंजुळ सनईच्या सुरात स्वाभिमान दिवसाच्या कार्यक्रमाला आणखी रंगत आणली गेली. उपस्थित मान्यवरांना भगवे पेठे परिधान केल्याने सगळीकडे भगवामय वातावरण झाले होते.

ठळक मुद्देसातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य प्रवेशद्वार फुलांनी सजवले- : मान्यवरांची उपस्थिती

सातारा : किल्ले अजिंक्यताºयाचे प्रवेशद्वार फुलांनी सजवण्यात आले होते. राजसदरही सजवण्यात आली होती. सकाळच्या गार वाºयाला राजसदरेवर मंजुळ सनईच्या सुरात स्वाभिमान दिवसाच्या कार्यक्रमाला आणखी रंगत आणली गेली. उपस्थित मान्यवरांना भगवे पेठे परिधान केल्याने सगळीकडे भगवामय वातावरण झाले होते.

हिंदुस्थानच्या इतिहासात सर्वात मोठा राज्यविस्तार झाला तो म्हणजे मराठ्यांचे झेंडे अटकेपार फडकले. हाच आदेश किल्ले अजिंक्यताºयावरून देण्यात आला. राजधानी साताºयाचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती संभाजी महाराज यांचे सुपूत्र शाहू महाराज यांचा राज्यभिषेक झाला तो म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा जन्मदिवस. १२ जानेवारीला सातारा स्वाभिमान दिनाचे महत्त्व आहे. स्वाभिमान दिवस सोहळ्याचे निमित्ताने ही एक चळवळ सुरू राहावी, हा उद्देश ठेवून राजसदरेवर कायमस्वरूपी प्रतिमा ठेवण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.

या स्वाभिमान दिन सोहळ्यास प्रा. के. एन. देसाई, अजय जाधवराव, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण, नगरसेवक धनंजय जांभळे, नगरसेवक शेखर मोरे-पाटील, विजय काळोखे, हेमंत गुजर, उद्योजक कन्हैय्यालाल राजपुरोहित, बी. एन. केवटे, युवराज पवार, धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे संस्थापक सुदामदादा गायकवाड, शरद पवार, मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, मनसेचे सातारा शहर प्रमुख राहुल पवार, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभिजित बारटक्के यांच्यासह अनेक मावळे उपस्थित होते.

यावेळी प्रा. के. एन.देसाई म्हणाले, ‘शाहू महाराजांची कारकीर्द कशी झाली?, सर्व संपले असताना अटकेपार झेंडे रोवले हे माहिती पडले पाहिजे.इतिहासाचा आंधळा अभिमान शाप आहे. घोर अज्ञान हा एक गुन्हा आहे. त्याकरिता वाचन केल्याने तो गुन्हा दूर होतो. कोट्यवधी कागदपत्रे वाचनाविना पडून आहेत. जो समाज भूतकाळ विसरतो त्यास भविष्य उज्ज्वल नसते. होणारी अधोगती टाळता येत नाही, असे सांगत ते म्हणाले, ‘छत्रपती संभाजी महाराज यांचीही ससेहोलपट झाली होती. औरंगजेबाने हाल करून त्यांना मारल्यानंतर झुल्फीकार खानाने रायगडाला वेढा दिला होता. त्याचवेळी येसूबार्इंनी राजाराम महाराजांना जिंजीला पाठवलं. रायगड खानाने घेतला. साडेसहा वर्षे किल्ला मराठ्यांनी लढवला होता. मराठे रसदमध्येच हाणत होते.

पेशव्यांनी किल्ले अजिंक्यताºयावरून वस्त्र नेलीत. शाहू महाराजांचा राज्यभिषेक १२ जानेवारी १७०८ रोजी झाला. त्यांनी वतन दिली. १७१३ मध्ये पेशवे पद दिले. पेशव्यांना कर्ज कोण देत नव्हते. सावकारांकडे राव रंभा निंबाळकर गेले तेव्हा कर्ज दिलं. त्यांनी तेथे तारण म्हणून मिशी दिली. जाणत्याच्या हातात सूत्रे दिली. साताºयाच्या गादीचे कर्तृत्व मोठे आहे. पिकनिकचं ठिकाण नाही तर नतमस्तक होण्याची ठिकाण हे नागरिकांनी जाणलं पाहिजे.’

दीपक प्रभावळकर म्हणाले, ‘किल्ले अजिंक्यताºयाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गेली तीन वर्षे सातारा पालिकेला विनंती करूनही पालिका एक विशेष सभा स्वाभिमान दिनावेळी राजसदरेवर घेत नाही. गेली आठ वर्र्षे हा कार्यक्रम होत आहे. ही एक चळवळ आहे. दीर्घकालीन हा कार्यक्रम व्हावा म्हणून हळूहळू सुरुवात होत आहे. हिंदुस्थानाला मोठा इतिहास आहे. अटकेपार झेंडे फडकवले गेले ते याच राजसदरेवरून दिलेल्या आदेशावरून साताºयाचा अभिमान हा असला पाहिजे. शहरात हा स्वाभिमान दिन साजरा झाला पाहिजे, असे सांगत सातारा पंचायत समितीची मासिक सभा पुढच्या वर्षी राजसदरेवर होईल, स्वाभिमान दिवस साजरा होईल,’ असे त्यांनी सांगितले.भोसले घराण्यातील सर्वांची पावले लागलीइतिहासातील एकमेव अजिंक्यतारा किल्ला आहे. जेथे भोसले घराण्यातील सर्वांचे पावले लागली आहेत. १६६३ मध्ये शहाजीराजे या किल्लावर आले होते. शिवाजी महाराज आजारपणाच्या काळात राहिले होते. शाहू महाराजांनी तर राजधानीच जाहीर केली. भोसले कुळाचा इतिहास केवळ ढाल-तलवारीपुरताच मर्यादित नाही. तर मातृभक्तीचा इतिहास आहे, असे मत इतिहास तज्ज्ञ अजय जाधवराव यांनी व्यक्त केले. 

उत्साह वाखाण्यजोगाकिल्ले अजिंक्यताºयावर स्वाभिमान दिनाच्या कार्यक्रमाला युवकांची संख्या लक्षणीय होती. पहाटे सहा वाजल्यापासून युवक किल्ल्यावर येत होते. त्यामध्ये युवतींचाही सहभाग होता. सकाळच्या सुमारास गडावर सनईचा सूर ऐकून मावळ्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचत होता.वयोवृद्धांना पाणी वाटपस्वाभिमान दिनाला गडावर चालत आलेल्या काही वयोवृद्धांना धाप लागली होती. अशा वृद्धांना मावळ्यांकडून पाणी दिले जात होते. एवढेच नव्हे तर त्यांना हात देऊन गडावर येण्यास मदत केली जात होती. या कार्यक्रमाला परजिल्ह्यातूनही नागरिक उपस्थित होते.सातारा येथे शनिवारी किल्ले अजिंक्यताºयावर स्वाभिमान दिनानिमित्त प्रा. के. एन. देसाई, अजय जाधवराव, कन्हैय्यालाल राजपुरोहित, दीपक प्रभावळकर, सुदामदादा गायकवाड, राहुल पवार, धर्मवीर युवा मंचचे प्रशांत नलावडे उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAjinkytara Fortअजिंक्यतारा किल्ला