शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

महिलांच्या आरोग्यासाठी शाश्वत आणि कृतिशील उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:36 IST

संडे मुलाखत इंडिया पोस्ट हे जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क आहे, जे देशभरात विशेषत: ग्रामीण भारतात प्रत्येकापर्यंत जोडले गेलेय. ...

संडे मुलाखत

इंडिया पोस्ट हे जगातील सर्वात मोठे टपाल नेटवर्क आहे, जे देशभरात विशेषत: ग्रामीण भारतात प्रत्येकापर्यंत जोडले गेलेय. महिलांच्या मासिक पाळीत समाजाला सामावून घ्यायचे असेल, तर पोस्ट कार्यालयांशिवाय पर्याय नाही. महिलांच्या आरोग्यासाठी शासकीय पातळीवर घेतलेल्या या पावलाला सातारकर साथ देतील, याची खात्री आहे.

- अपराजिता म्रिधा, प्रवर अधीक्षिका, सातारा डाक विभाग

प्रगती जाधव-पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा डाक विभाग महिलांच्या सुरक्षित आरोग्यासाठी पूरक अशा सॅनिटरी नॅपकिन ग्राहकांसाठी १ सप्टेंबरपासून डाक कार्यालयात उपलब्ध करून देत आहे. महिलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कृतिशील उपक्रम राबविणाऱ्या सातारा डाक विभागाच्या प्रवर अधीक्षिका अपराजिता म्रिधा यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न : पोस्टात नॅपकिन विक्री ही संकल्पना डोक्यात कशी आली?

उत्तर : सातारा जिल्ह्यात डाक कार्यालयांच्या दौऱ्यांच्या वेळी स्थानिक महिलांच्या आरोग्याविषयी विचार यायचे. जिथे स्वच्छ आंघोळीची सोय नाही, तिथे मासिक पाळीविषयी जागृतीचा विषयच खूप लांब आहे. हे ओळखून दिल्लीच्या संस्थांशी बोलून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला.

प्रश्न : मासिक पाळीचे गांभीर्य समाजात आहे असे वाटते?

उत्तर : मासिक पाळी हा अजूनही महिलांचाच विषय वाटतो. पाळी काळात मुलींची शाळेत गैरसोय होत असल्याने, त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडावे लागणे, हे एकविसाव्या शतकातही आढळणे खेदाचे आहे. सामान्यांपासून ही चळवळ सुरू करण्यासाठी पोस्टातही सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

प्रश्न : ग्रामीण भागातील महिलांना नॅपकिन खरेदीसाठी पैसे मिळणार का?

उत्तर : महिलांमध्ये योनीमार्गाचा संसर्ग ही मोठी समस्या आहे. याचे मूळ कारण मासिक पाळीतील अस्वच्छता हेच आहे. ग्रामीण भागातील महिलांना नॅपकिन खरेदी नाही जमलं, तर स्वयंसेवी संस्थांना हाताशी घेऊन काही प्रायोजक बघून आम्ही हे महिलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करू.

३६ टक्के महिलाच वापरतात नॅपकिन

राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण २०१५-२०१६ नुसार भारतात सुमारे ३३६ दशलक्ष मासिक पाळीधारक स्त्रियांपैकी फक्त ३६ टक्के स्त्रिया सॅनिटरी नॅपकिनचा वापरतात. उर्वरित महिला घरगुती पर्यायांवर अवलंबून राहत असल्याने त्यांच्यात आरोग्य समस्या वाढतात. समाजाचा घटक म्हणून ही संवेदनशीलता दाखविणे आवश्यक असल्याचे अपराजिता मानतात.

या ठिकाणी सुरू होणार उपक्रम

महिलांच्या स्वच्छतेच्या बाजूने प्रभावी भूमिका घेताना हा प्रकल्प सातारा प्रधान डाकघर, कऱ्हाड प्रधान डाकघर, वडूज, फलटण, पांचगणी, कोरेगाव, मेढा, पाटण, ढेबेवाडी येथे सुरू करण्यात येणार आहे.

...............