शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

घागरभर पाण्यासाठी विहिरीत बुडताना मायलेकाला वाचवले

By admin | Updated: March 4, 2016 00:57 IST

पिंंपरी येथील घटना : मुलाला वाचविण्यासाठी आईनेही घेतली उडी

कोरेगाव : कण्हेर प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या पिंंपरी, ता. कोरेगाव येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जटील बनला आहे. घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण सुरु असताना गुरुवारी सकाळी विहिरीतून पाणी आणताना दहा वर्षांचा मुलगा पडला. त्याला वाचविण्यासाठी आईने उडी टाकली आणि विहिरीच्या कठड्यावर बसलेली मुलगी ओरडल्याने आजूबाजूच्या लोकांनी बुडणाऱ्या मायलेकाला वाचविले. याबाबत अधिक माहिती अशी, की कण्हेर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पिंंपरी गावाचे रहिमतपूरपासून काही अंतरावर पुनर्वसन झाले आहे. ग्रामस्थांना येथे स्वतंत्र गावठाण अद्याप मंजूर झालेले नाही. आमदारांपासून मंत्रालयापर्यंत अनेकदा हेलपाटे मारुनही प्रशासकीय विभागांचे नाहरकतीचे दाखले गोळा करण्यात ग्रामस्थांची दमछाक झाली आहे. नगररचना विभागाच्या ना हरकतीसाठी ग्रामस्थ वाट पाहत आहेत. गेल्या २० वर्षांपासून ग्रामस्थांशी फरफट सुरु असताना घागरभर पाण्यासाठी गुरुवारी संध्या अर्जुन मर्ढेकर या दहा वर्षांचा मुलगा व सहा वर्षाच्या मुलीसह शेतातील एका विहिरीवर सकाळी गेल्या होत्या. अचानक मुलाचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला, त्याला वाचविण्यासाठी आईने विहिरीत उडी टाकली. दोघे बुडणार एवढ्यात विहिरीच्या कठड्यावर बसलेली मुलगी ओरडल्याने आजूबाजूच्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली. महादेव फडतरे या तरुणाने प्रसंगावधान राखत विहिरीत उडी टाकून मायलेकाला वाचवले. गावात घटनेची माहिती समजताच ग्रामस्थ गोळा झाले. (प्रतिनिधी)आमच्या मरणयातना संपणार कधी...महाराष्ट्राच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरलेल्या कण्हेर प्रकल्पामुळे आम्हाला विस्थापित व्हावे लागले. या प्रकल्पाचा लाभ अनेकजण घेत असतील, पण त्यासाठी आमच्या झालेल्या अन्यायाबाबत कुणीच काही बोलत नाही. प्रशासनाने आमचा कसलाही विचार न करता रहिमतपूरजवळ माळावर पुनर्वसन केले. पुनर्वसन म्हणजे केवळ त्या ठिकाणी पाठविले. त्याठिकाणी आम्हाला धड निवारा दिलेला नाही. आमच्या गावठाणाचा प्रश्न शासनदरबारी अद्याप प्रलंबित आहे. आज आमच्या मायलेकांचा केवळ नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला, अन्यथा पाण्यासाठी आमच्यातील दोघे गमावले असते. प्रशासनाने आता तरी आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि आमच्या मरणयातना कधी संपतील, हे एकदाचे सांगावे, अशी संतप्त भावना मारुती मर्ढेकर यांनी व्यक्त केली.