शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हयातीचा दाखला बदलला; निराधार लाभार्थी बॅंकांमध्येही विनाआधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST

सातारा : प्रशासनाने हयातीचा दाखला बदलून शासनाच्या योजनांचा लाभ घेत असलेल्या लोकांना निराधार केल्याचे समोर येत आहे. प्रशासनाच्या विहित ...

सातारा : प्रशासनाने हयातीचा दाखला बदलून शासनाच्या योजनांचा लाभ घेत असलेल्या लोकांना निराधार केल्याचे समोर येत आहे. प्रशासनाच्या विहित नमुन्यातील अर्ज बँका स्वीकारत नसल्याने त्यांची कोंडी झालेली आहे.

लहरी राजा प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, असे म्हणण्याची वेळ निराधार लोकांवर आलेली आहे. राज्य शासनाच्या श्रावणबाळ निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून वृद्ध लोक, विधवा, आदी लोक आर्थिक स्थैर्य मिळवत आहेत.

या लाभार्थ्यांना जगण्याचे दुसरे कुठलेच साधन नसल्याने त्यांना शासनाच्या पेन्शनवर अवलंबून राहावे लागते. यापैकी असे अनेकजण आहेत की, त्यांची चूल या पैशांशिवाय चालूच शकत नाही. हयातीचा दाखला दिला नाही तर या पैशांपासून त्यांना वंचित राहावे लागणार आहे. शासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे.

हयातीच्या दाखल्याचा प्रशासनाने जो अर्ज तयार केला आहे, तो अर्ज बँका स्वीकारत नाहीत, त्यामुळे निराधारांना या कार्यालयातून त्या कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहे. कोरोना महामारीच्या काळात योजनेच्या लामार्थ्यांना सर्वत्र पायपीट करावी लागत आहे. विशेष म्हणजे यापैकी अनेक लाभार्थी हे कुठल्या ना कुठल्या व्याधीने ग्रस्त आहेत. वयस्कर लोकांची कुचंबणा शासनाने लवकर थांबवण्याची मागणी होत आहे.

हयातीचा दाखला असूनही निराधारांची कसरत

या लाभार्थ्यांना वर्षाच्या शेवटी हयातीचा दाखला जमा करावा लागतो. प्रशासनाने दाखल्यांचे स्वरूप बदलल्याने बॅंका ते स्वीकारण्यास नकार देत आहेत. यामुळे या योजनेच्या लाभधारकांची कोंडी होऊन बसलेली आहे. कोरोनाच्या काळात देखील त्यांना धावपळ करून या कार्यालयातून त्या कार्यालयात जावे लागत असल्याचे पहायला मिळत आहे.

बँकेचे कामकाज हे रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनेनुसार चालते. निराधारांना शासन योजनेचे पैसे बँक खात्यावर जमा करते. हयातीचा दाखला हा योग्य नमुन्यात नसेल, तर कर्मचारी तो स्वीकारत नाही.

- सुरेश पवार, बॅंक अधिकारी

आर्थिक विवंचनेत असलेले लोक शासनाच्या योजनेच्या आधारावर जगतात. एक तर त्यांच्याकडे पैसा नसतो. अशावेळी शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे काम प्रशासनाने करायला हवे.

- नीलेश शिर्के, नागरिक