शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या निर्णयाचे मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून स्वागत आहे. मात्र, मागील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या निर्णयाचे मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून स्वागत आहे. मात्र, मागील शासनाची दोन सर्वेक्षणे फसली. त्यामुळे हे सर्वेक्षण अधिक चांगले होण्यासाठी काही सूचना आहेत. त्यावर विचार व्हावा, असे पत्र राज्यातील काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविण्यात आले आहे.

याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, मागील सर्वेक्षणात पटावर गैरहजर असलेली मुले शाळाबाह्य धरायची की नाही? याबाबत स्पष्टता नसल्याने खूप गोंधळ निर्माण झाला होता, तर ३० दिवसांपेक्षा जास्त विद्यार्थी गैरहजर असल्यास त्याला शाळाबाह्य असे आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. मात्र, प्राथमिक शाळा वर्षभर बंद आहेत. त्यामुळे ही सर्वच मुले शाळाबाह्य धरायची का, असा प्रश्न उपस्थित होईल. त्याचप्रमाणे अनेक माध्यमिक शाळा, आश्रमशाळांमध्ये सतत गैरहजर मुलांची अनेक ठिकाणी गैरहजेरी मांडली जात नाही. त्यामुळे कागदावर ३० दिवस पूर्ण होत नसल्याने ते विद्यार्थी शाळाबाह्य ठरत नाहीत, अशी अडचण आहे. त्यामुळे याबाबतही स्पष्टता असायला हवी.

सुरुवातीला वंचित मुलांसाठी राज्यस्तरीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ऑनलाइन बैठक घ्यावी. त्यानंतर अशाच बैठका प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकारी व तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्यांची घ्यावी. त्यांना या समितीत सहभागी करून नियोजन करणे आवश्यक वाटते, तर वंचित वर्गातील मोठा समूह दिवाळीनंतर ऊसतोड व वीटभट्टी, दगडखाणीवर गेलेला आहे. त्याचप्रमाणे शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामगार व वीटभट्टी मजूर यांचे सर्वेक्षण ते राहतात त्या ठिकाणी व्यवस्थित होईल, यासाठी स्वतंत्र सूचना देण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात इतर राज्यांतून आलेल्या इतर भाषिक मुलांची संख्या मोठी आहे. या शाळाबाह्य सर्वेक्षणात ही संख्या योग्य समजली जावी. त्यामधून त्यांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करता येईल. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्याही व्यवस्थित मोजली जाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अन्य काही सूचनाही पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.

हे पत्र हेरंब कुलकर्णी, रेणू गावस्कर, दीपक नागरगोजे, इंदवी तुळपुळे, प्रतिभा शिंदे, पारोमिता गोस्वामी, सूर्यकांत कुलकर्णी, बस्तू रेगे, अनुराधा भोसले, दिनानाथ वाघमारे, मुकुंद आडेवार, सुधाकर क्षीरसागर, राजेंद्र धारणकर, हेमांगी जोशी, बी. पी. सूर्यवंशी, वैशाली भांडवलकर, रूपेश किर यांच्या वतीने पाठविण्यात आले आहे.

चौकट :

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी धोरण असावे...

राज्यात ५६ समाजकार्य महाविद्यालये आहेत. त्यांचीही मदत घ्यायला हवी. त्याचप्रमाणे टाटा रिसर्चसारख्या संस्थेकडून सर्वेक्षण प्रारूप नक्की करायला हवे, असे आम्हाला वाटते. त्याचबरोबर या सर्वेक्षणानंतर विद्यार्थी शाळेत दाखल करणे आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कृती कार्यक्रम काय? याबाबत धोरण जाहीर करावे, अशी विनंतीही संस्थांच्या वतीने पत्राद्वारे करण्यात आलेली आहे.

.........................................................