शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या निर्णयाचे मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून स्वागत आहे. मात्र, मागील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाच्या निर्णयाचे मुलांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून स्वागत आहे. मात्र, मागील शासनाची दोन सर्वेक्षणे फसली. त्यामुळे हे सर्वेक्षण अधिक चांगले होण्यासाठी काही सूचना आहेत. त्यावर विचार व्हावा, असे पत्र राज्यातील काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविण्यात आले आहे.

याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, मागील सर्वेक्षणात पटावर गैरहजर असलेली मुले शाळाबाह्य धरायची की नाही? याबाबत स्पष्टता नसल्याने खूप गोंधळ निर्माण झाला होता, तर ३० दिवसांपेक्षा जास्त विद्यार्थी गैरहजर असल्यास त्याला शाळाबाह्य असे आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. मात्र, प्राथमिक शाळा वर्षभर बंद आहेत. त्यामुळे ही सर्वच मुले शाळाबाह्य धरायची का, असा प्रश्न उपस्थित होईल. त्याचप्रमाणे अनेक माध्यमिक शाळा, आश्रमशाळांमध्ये सतत गैरहजर मुलांची अनेक ठिकाणी गैरहजेरी मांडली जात नाही. त्यामुळे कागदावर ३० दिवस पूर्ण होत नसल्याने ते विद्यार्थी शाळाबाह्य ठरत नाहीत, अशी अडचण आहे. त्यामुळे याबाबतही स्पष्टता असायला हवी.

सुरुवातीला वंचित मुलांसाठी राज्यस्तरीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ऑनलाइन बैठक घ्यावी. त्यानंतर अशाच बैठका प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकारी व तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्वयंसेवी संस्था व कार्यकर्त्यांची घ्यावी. त्यांना या समितीत सहभागी करून नियोजन करणे आवश्यक वाटते, तर वंचित वर्गातील मोठा समूह दिवाळीनंतर ऊसतोड व वीटभट्टी, दगडखाणीवर गेलेला आहे. त्याचप्रमाणे शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे ऊसतोडणी कामगार व वीटभट्टी मजूर यांचे सर्वेक्षण ते राहतात त्या ठिकाणी व्यवस्थित होईल, यासाठी स्वतंत्र सूचना देण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात इतर राज्यांतून आलेल्या इतर भाषिक मुलांची संख्या मोठी आहे. या शाळाबाह्य सर्वेक्षणात ही संख्या योग्य समजली जावी. त्यामधून त्यांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करता येईल. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्याही व्यवस्थित मोजली जाणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अन्य काही सूचनाही पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत.

हे पत्र हेरंब कुलकर्णी, रेणू गावस्कर, दीपक नागरगोजे, इंदवी तुळपुळे, प्रतिभा शिंदे, पारोमिता गोस्वामी, सूर्यकांत कुलकर्णी, बस्तू रेगे, अनुराधा भोसले, दिनानाथ वाघमारे, मुकुंद आडेवार, सुधाकर क्षीरसागर, राजेंद्र धारणकर, हेमांगी जोशी, बी. पी. सूर्यवंशी, वैशाली भांडवलकर, रूपेश किर यांच्या वतीने पाठविण्यात आले आहे.

चौकट :

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी धोरण असावे...

राज्यात ५६ समाजकार्य महाविद्यालये आहेत. त्यांचीही मदत घ्यायला हवी. त्याचप्रमाणे टाटा रिसर्चसारख्या संस्थेकडून सर्वेक्षण प्रारूप नक्की करायला हवे, असे आम्हाला वाटते. त्याचबरोबर या सर्वेक्षणानंतर विद्यार्थी शाळेत दाखल करणे आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कृती कार्यक्रम काय? याबाबत धोरण जाहीर करावे, अशी विनंतीही संस्थांच्या वतीने पत्राद्वारे करण्यात आलेली आहे.

.........................................................